इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक कलाकृती म्हणजे 3,370 वर्षांपूर्वीच्या राणी नेफरतितीचा पुतळा. या पुतळ्याचा शोध लागल्यापासून तो जर्मनीतच आहे. एका इजिप्शियन पुरातत्त्वज्ञाने बर्लिनमध्ये असलेला हा राणी नेफरतितीचा अर्धपुतळा परत करण्याची मागणी केली आहे; तर जर्मनीने तसे करण्यास नकार दिला आहे. नेफरतिती प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि …
Read More »व्यक्ति विकास
आयआयटी पासआऊट चिकन व्यवसायातून कोट्याधीश
तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत …
Read More »मंगळ का पडला कोरडा ?
आपल्या शेजारचा लाल ग्रह ‘मंगळ’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते पाणी होते, नद्या-सरोवरे होती, हे आता सिद्ध झालेले आहे. मग हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तेथील खडकांनी स्पंजाप्रमाणे हे पाणी शोषून घेतले, हे असल्याचाही दावा काही संशोधकांनी केलेला आहे. मंगळाची सध्याची भूमी ओसाड, गोठलेली आणि …
Read More »गरिबीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी
आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात …
Read More »सर्वात वेगाने वाढणारा गहू
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा नेहमीच पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही मोठा उपयोग झालेला आहे. ‘नासा’ या अमेरिकन अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजातीही विकसित केलेली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढू शकते. नासाच्या प्रयोगात रोपे सतत सूर्यप्रकाशात राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाट्याने होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की …
Read More »सेंद्रीय उद्योगातून बनले कोट्यधीश
जयपूर येथील प्रतीक तिवारी यांनी आपली लठ्ठ पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून ‘रुफटॉप ऑरगॅनिक फार्मिंग’ क्षेत्रात पाऊल टाकले आणि आज ते कोट्यवधींची उलाढाल करणारे यशस्वी उद्योजक बनले आहेत. प्रतीक यांचे शिक्षण 1998 मध्ये कृषी अभियांत्रिकी विषयात झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत महिंद्रा, रिलायन्स फ्रेश, आयटीसी आणि वॉलमार्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये पुरवठा साखळी आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. मात्र, त्यांच्या …
Read More »महाकाय ग्रहनिर्मितीबाबत नवा सिध्दांत
विज्ञानातील सिद्धांतही अनेक वेळा गृहितकेच असतात. कालौघात नवे संशोधन आधीच्या सिद्धांताला छेद देणारे व नवा सिद्धांत स्थापन करणारे असू शकते. यापूर्वी लहान मातृताऱ्याभोवती महाकाय ग्रहाची निर्मिती होऊ शकत नाही, असे मानले जात होते. मात्र, एका महाकाय ग्रहाच्या शोधाने या समजालाही असाच छेद गेला. या ग्रहाचे नाव आहे ‘एनजीटीएस-1बी’. वार्विक विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. डॅनियल बेल्लिस यांनी म्हटले होते की, या ग्रहाचा …
Read More »शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ’ऑटो बेस्ट एम्पेरिओ’चे संस्थापक अवनीत सिंह कोहली उर्फ सन्नी. दिल्लीतील एका सुखवस्तू व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या सन्नी यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. 1996 मध्ये ते जेव्हा आठवीत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचा भीषण अपघात झाला आणि पुढील तीन वर्षे ते अंथरुणाला …
Read More »शतपावली का गरजेची?
केवळ उदरभरण करण्यासाठी किंवा चवीसाठी खाऊ नये, तर आरोग्याचा विचार करून पौष्टिक आहार घ्यावा, हे जसे गरजेचे आहे तसेच जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होऊ नये, हेही समजून घेणे गरजेचे ठरते. अनेकांना जेवल्यानंतर बसून राहण्याची किंवा पहुडण्याची सवय असते. त्याचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जेवल्यानंतर अचानक कोणतेही काम करणे किंवा झोपणे टाळले तसेच जेवल्यानंतर फेरफटका मारण्याची सवय लावल्यास …
Read More »दहावीत शाळा सोडलेला अब्जाधिश
झिरेोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच थक्क करणारा आहे. अवघ्या 17 व्या वर्षी शाळा सोडलेला एक तरुण आज 23 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा अधिपती बनला आहे, ही किमया त्यांच्या जिद्दीच्या आणि वेगळ्या वाटेने जाण्याच्या वृत्तीमुळे साध्य झाली आहे. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1986 मध्ये जन्मलेल्या निखिल यांना शालेय शिक्षणात कधीच रस …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र