लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

कोट्याधिश कृषीसखी

दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकर्‍यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धानं हे शिवधनुष्य पेललं. आज ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. …

Read More »

बुध्दीमत्तेला कष्टाची जोड

ब्लेझ पास्कल हे फ्रेंच गणित तज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होते. त्यांनी आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरून द्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपादलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. ब्लेझ पास्कल यांचा जन्म 19 जून 1623 रोजी झाला. ब्लेझचा …

Read More »

खाल्ल्यानंतर पाणी पिताय?

बरेच लोक जेवल्यानंतर जास्त पाणी पितात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी पाणी प्यावे. जेवताना किंवा नंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. काही पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. अशा पदार्थांची ही माहिती… मसालेदार अन्न : मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर अनेक लोक लगेच जास्त पाणी पितात. त्यामुळे तोंडात जळजळते. तसेच सूज येण्याचाही त्रास …

Read More »

डॉ.साराभाईंची शिकवणूक

डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणार्‍या साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी 1937 मध्ये ब्रिटन गाठले, मात्र त्याचवेळी दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. त्यामुळे तिथून ते …

Read More »

समुद्रतळाशी एलियन?

एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही हे अद्याप विज्ञानाने ठामपणे सांगितलेले नाही. मात्र अंतराळाच्या या अनादी अनंत पसार्‍यात केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच जीवसृष्टी असेल असे मानणे हे ‘कूपमंडुक’ वृत्तीसारखेच आहे. विहिरीतील बेडकाला विहीर म्हणजेच सर्व जग आहे असे वाटत असते, तसाच हा प्रकार होईल. एलियन्सबाबत अनेक दावे केले जात असतात. जगभरातून अनेकांनी ‘युफो’ म्हणजेच उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केलेले …

Read More »

कहाणी जगावेगळ्या अब्जाधिशाची

रिचर्ड चार्ल्स निकोलस ब्रॅनसन 1970 सालात वीस वर्षाचा होता. पण डोक्यात स्वतःच व्यवसाय करायचा असे वारे शिरले होते. त्यांनी लोकांच्या घरी पार्सलने रेकॉर्ड पोहोचवण्याचा व्यवसाय करून पाहायचा असे ठरवले. त्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीट वर एक दुकान उघडले. तेव्हा निर्यातीच्या दर्जाच्या रेकॉर्डस विकण्याच्या प्रयत्नात चौकशी करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाता-जाता राहिले कारण ब्रॅनसनने 33 टक्के कर चुकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी …

Read More »

सूर्याचा प्रवासवेग किती?

अंअतराळाच्या अनंत पसार्‍यात आपण कुठे आहे हे पाहायला गेलो तर कुणीही थक्क होऊ शकते. आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे अशा लाखो सौरमालिका ‘मिल्की वे’ नावाच्या एकाच आकाशगंगेत आहेत. ब्रह्मांडात अशा ‘मिल्की वे’सारख्या अब्जावधी आकाशगंगा आहेत! ’मिल्की वे’ मध्ये आपला सूर्य किती वेगाने प्रवास करीत असतो हे जाणून घेणेही रंजक ठरेल. तुम्हाला माहिती आहे का, आपली पृथ्वी एकाच वेळी …

Read More »

टॉलस्टॉय आणि ती

जगप्रसिद्ध रशियन लेखक आणि तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म 9 सप्टेंबर 1828 या दिवशी एका श्रीमंत घराण्यात झाला. त्यांची जगभर गाजलेली साहित्यकृती म्हणजे ‘वॉर अँड पीस.’ मास्कोतील साहित्यप्रेमींना वाटते, की लिओ टॉलस्टॉय यांचा आपण मोठा सन्मान करावा. साहित्यप्रेमी त्यांच्या गावी जातात आणि निमंत्रण देतात. मॉस्कोला येण्यासाठी रेल्वेच्या तृतीय शेणीच्या डब्यात टॉलस्टॉय बसतात. अंगावर साधा कोट, साधेच कपडे आणि रेल्वे मास्कोच्या …

Read More »

हरभर्‍याची भाजी आरोग्यदायी

थंडीत उत्तरेकडील लोक जेवणात सरसो का साग, पालक का साग या भाज्या आवर्जून खातात. थंडीत तापमानात घट होत असताना त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. अशावेळी हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास हरभर्‍याच्या हिरव्या पाल्याची व चण्याच्या हिरव्या पाल्याच्या भाजीत अनेक पौष्टिक गुणधर्म आढळतात. मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हरभर्‍याच्या …

Read More »

झुंजार रणरागिणी

आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म डॉ. एस. स्वामीनाथन व अम्मू या दाम्पत्यापोटी 24 ऑक्टोबर 1914 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते. आई काँग्रेसच्या एक आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. 1928 मध्ये लक्ष्मी आईबरोबर कोलकाता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या. अधिवेशनावेळी सुभाषचंद्र बोस यांनी दोनशे स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन सादर केले होते. …

Read More »