भारतीय उद्योग विश्वामध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणार्या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. पण त्यांच्या निधनानंतरही अजरामर झालेली त्यांची काही वाक्यं ही फक्त नव्या पिढीसाठीच नाही, तर त्यांच्या समकालीन आणि पुढे येणार्या कित्येक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. उद्योगासोबतच रतन टाटांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेले अखंड प्रयत्न यातूनच …
Read More »व्यक्ति विकास
सर्वात मोठा शॉपिंग मॉल
जगभरात अनेक भव्य मॉल पाहायला मिळतात. एकाच छताखाली अनेक वस्तू, किराणा आणि भाजीपालाही खरेदी करण्याची सोय अशा मॉलमुळे होत असते; मात्र जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? असा मॉल इराणमध्ये असून त्याचे नावच ‘इराण मॉल’ असे आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हा मॉल आहे. या मॉलची इमारत सात मजली आहे. 3 लाख 17 हजार चौरस मीटरच्या …
Read More »आदर्श राष्ट्रनिष्ठेचा
शिरीषकुमार हे बाल क्रांतिकारक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता.अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे नाव शिरीषकुमार. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1926 रोजी नंदूरबार याठिकाणी झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा …
Read More »हिरा बनणार 15 मिनिटांत?
जगातील सर्वात महागडे रत्न म्हणजे हिरा, साहजिकच हिर्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमतीदेखील अन्य सर्व दागिन्यांच्या तुलनेत अधिकच असतात. नैसर्गिकरित्या हिरे तयार होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कार्बन अणूंचे हिर्यात रूपांतर होण्यासाठी कित्येक गिगापास्कल्सचा प्रचंड दाब आणि हजारो वर्षांतील 1500 अंश सेल्सिअसची तीव्र उष्णता लागते. म्हणूनच बहुतांशी हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली गाडलेले आढळतात. पण, उच्च दाब आणि उच्च तापमानाची गरज …
Read More »निरीक्षणशक्ती महत्वाची
जगप्रसिद्ध शास्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1747 रोजी इंग्लडमधील बर्कले येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी ते एका सर्जनकडे सात वर्षे शिकले. जिथे त्यांनी स्वतः शल्यचिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेला बहुतेक अनुभव मिळविला. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या …
Read More »अभ्यास करताना झोप का येते?
कोणी अभ्यास करताना किंवा पुस्तक वाचताना मध्येच झोपलं तर आपण काय म्हणतो, अरे हा तर किंवा ही तर किती आळशी आहे! असं लेबल लावून आपण मोकळं होतो. परंतु, जरा विचार केलाय का की, त्या व्यक्तीला नक्की अभ्यास करताना झोप का लागत असेल? हा विचार तुम्ही नक्कीच केला नसेल कारण आपण अशावेळी एवढा गंभीर विचार करत नाही. परंतु, तुम्हाला यामागचे कारण …
Read More »शिक्षण सहावी, पण कमाई कोटीत…
सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या बळावर असामान्य बनू शकतो, हे चेन्नईच्या जे हजा फुन्यामिन यांनी दाखवून दिले आहे. तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या व्यक्तींने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यशाची शिखरे गाठलेली असतात. मग ते बॉलिवूडचे बेताज बादशाह अमिताभ बच्चन असो की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. जे हजा फुन्यामिन यांनी चेन्नईच्या रस्त्यावरून सामोसे विकत आज आलिशान वातानुकुलीत …
Read More »आकाश दुभंगते तेव्हा
निसर्गही कधी कधी अनोखी दृश्ये दाखवत असतो. आकाश कधी विभागले गेल्याचे तुम्ही पाहिले आहे का? असेही दृश्य आता पाहायला मिळाले आहे. आकाशाचा एक भाग केशरी रंगाचा आणि दुसरा काळवंडलेला असे दोन उभे भाग नुकतेच अमेरिकेत फ्लोरिडामध्ये पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला …
Read More »रियल हिरो
कारगिल युद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी तमाम तरुणांसह देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते. कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, आता तू लष्करात आहेस. काळजी …
Read More »रसगुल्ले आरोग्यदायी?
लोकांची जेवण गोडाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्थातच तिकडे अनेक प्रकारच्या मिठाया पाहायला मिळतात. मिष्टी दोही (बासुंदीचे दही!) असो किंवा रसगुल्ले, हे पदार्थ आता देशभरात आवडीने खाल्ले जातात. मधुमेह असलेल्या लोकांचा अपवाद सोडला तर हे रसगुल्लेही अनेक कारणांसाठी हितकारक ठरू शकतात. याबाबतची आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती… जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता, याचा …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र