सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या बळावर असामान्य बनू शकतो, हे चेन्नईच्या जे हजा फुन्यामिन यांनी दाखवून दिले आहे. तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या व्यक्तींने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यशाची शिखरे गाठलेली असतात. मग ते बॉलिवूडचे बेताज बादशाह अमिताभ बच्चन असो की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. जे हजा फुन्यामिन यांनी चेन्नईच्या रस्त्यावरून सामोसे विकत आज आलिशान वातानुकुलीत …
Read More »व्यक्ति विकास
आकाश दुभंगते तेव्हा
निसर्गही कधी कधी अनोखी दृश्ये दाखवत असतो. आकाश कधी विभागले गेल्याचे तुम्ही पाहिले आहे का? असेही दृश्य आता पाहायला मिळाले आहे. आकाशाचा एक भाग केशरी रंगाचा आणि दुसरा काळवंडलेला असे दोन उभे भाग नुकतेच अमेरिकेत फ्लोरिडामध्ये पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला …
Read More »रियल हिरो
कारगिल युद्धाचे नायक म्हणून ओळखल्या जाणार्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी तमाम तरुणांसह देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते. कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली. तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, आता तू लष्करात आहेस. काळजी …
Read More »रसगुल्ले आरोग्यदायी?
लोकांची जेवण गोडाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्थातच तिकडे अनेक प्रकारच्या मिठाया पाहायला मिळतात. मिष्टी दोही (बासुंदीचे दही!) असो किंवा रसगुल्ले, हे पदार्थ आता देशभरात आवडीने खाल्ले जातात. मधुमेह असलेल्या लोकांचा अपवाद सोडला तर हे रसगुल्लेही अनेक कारणांसाठी हितकारक ठरू शकतात. याबाबतची आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती… जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता, याचा …
Read More »कष्टातून फूल वले यशाचे अंगण
श्रीकांत बोल्लापल्ली यांची कथा केवळ एक यशस्वी उद्योजकाची नाही, तर ती एका अशा व्यक्तीची आहे ज्याने कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या स्वप्नांना वास्तवात आणले. तेलंगणाच्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या श्रीकांत यांना लहानपणापासूनच शेतीविषयी विशेष आवड होती. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांच्या कुटुंबाकडे फारशी जमीन नव्हती, आणि त्यांना लहानपणापासूनच कष्ट करावे लागत होते. वयाच्या 16 …
Read More »केसांसाठी मोहरीचे तेल !
मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा – 3 फॅटी अॅसिडचे अधिक प्रमाण आढळते, जे केसांची वाढ वेगाने करण्यासाठी आणि केसांना अधिक निरोगी राखण्यासाठी मदत करते. या तेलामुळे केस अधिक घनदाट, मजबूत आणि चमकदार बनतात. यामध्ये असणारे प्रोटीन आणि बीटा-कॅराटिन केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतात. यातील जीवाणूविरोधी आणि अँटीफंगल गुण स्काल्पमध्ये फंगल इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात आणि कोंड्यापासून दूर ठेवते. आजकाल एका घरात किंवा कार्यालयांमध्ये …
Read More »कोट्याधिश कृषीसखी
दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकर्यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धानं हे शिवधनुष्य पेललं. आज ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. …
Read More »बुध्दीमत्तेला कष्टाची जोड
ब्लेझ पास्कल हे फ्रेंच गणित तज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होते. त्यांनी आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरून द्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपादलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. ब्लेझ पास्कल यांचा जन्म 19 जून 1623 रोजी झाला. ब्लेझचा …
Read More »खाल्ल्यानंतर पाणी पिताय?
बरेच लोक जेवल्यानंतर जास्त पाणी पितात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी पाणी प्यावे. जेवताना किंवा नंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. काही पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. अशा पदार्थांची ही माहिती… मसालेदार अन्न : मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर अनेक लोक लगेच जास्त पाणी पितात. त्यामुळे तोंडात जळजळते. तसेच सूज येण्याचाही त्रास …
Read More »डॉ.साराभाईंची शिकवणूक
डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणार्या साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी 1937 मध्ये ब्रिटन गाठले, मात्र त्याचवेळी दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. त्यामुळे तिथून ते …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र