मेहनत करण्याची तयारी, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर आर्थिक परिस्थिती, शारिरिक व्यंग किंवा कोणतीही अडचण तुमच्या यशाच्या आड येत नाही. भव्य धर्मेश पालेजाच्या कहाणीतून आपल्याला हीच शिकवण मिळते. भव्य स्वत:च्या पायांवर उभा राहू शकत नाही. तरी देखील तो आपल्या कर्तृत्वाने लाखो तरुणांना प्रेरणा देतोय.दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या भव्य धर्मेश पालेजाने पहिल्याच टप्प्यात सनदी लेखापाल (सीए) ही परीक्षा उत्तीर्ण केली …
Read More »व्यक्ति विकास
खोबरे कोणते खावे?
नारळ पाण्याबरोबरच त्याचे खोबरेही आरोग्यासाठी लाभदायक ठरत असते. मात्र ओले खोबरे अधिक गुणकारी की सुके असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. आता तज्ज्ञांनी याचे उत्तर दिले आहे. ओल्या नारळाचा स्वाद हलका गोड आणि नटी टेस्टचा असतो. सुके खोबरेही गोड असते पण ते अधिक चावावे लागते. नारळ आतून कोरडा पडला की त्याचे खोबरे करवंटीपासून वेगळे होते. असे खोबरे वाळवून ते साठवून ठेवले …
Read More »यशाचा राजमार्ग
प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे… हे सुवचन आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. ध्येयवेड्या तरुणांना आदर्श आणि प्रेरणा देणारी आयएएस विजय वर्धन यांची ही यशोगाथा आहे. 35 वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते ’आयपीएस’ आणि मग ’आयएएस’ झाले. विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे …
Read More »आता अंतराळात डेटा सेंटर
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे डाटा सुरक्षित ठेवणे हे आव्हानात्मक ठरत चालले असून, या पार्श्वभूमीवर युरोप अंतराळात डिजिटल सेंटर उभारण्याची योजना आखत आहे. असेंड या युरोपीय कंपनीने यासाठी 2.1 लाख रुपये खर्च करत यावर अभ्यास पूर्ण केला. 16 महिन्यांच्या अथक अभ्यासानंतर याचे नियोजन केले गेले आहे. सदर डिजिटल सेंटर सूर्य प्रकाशावर संचलित असणार आहे, असे याचे प्रोजेक्ट मॅनेजर डॅमियन डॅमस्टीयर यांनी …
Read More »आईकडून दहा हजार घेवून व्यवसायाची सुरुवात आज देशात सहाशे दुकाने
रवी मोदी हे कोलकात्याच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेले रवी मोदी गणितात चांगले होते. त्यांचे वडील कोलकाता येथील एका मार्केटमध्ये किरकोळ दुकान चालवायचे. जिथे मोदी शिकत असताना त्यांच्या वडिलांना मदत करायचे. रवी मोदी इयत्ता दुसरीमध्ये असताना त्यांना गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले होते. रवी मोदी यांच्या वडिलांचे कोलकात्यात कपड्यांचे …
Read More »वातावरणरहित बाह्यग्रहाचा शोध
खगोलशास्त्रज्ञांनी आता पृथ्वीच्या आकाराच्या अशा ग्रहाचा शोध लावला आहे, ज्याचे वातावरण त्याच्या तार्यापासून येणार्या रेडिएशनने नष्ट करून टाकले आहे. अर्थातच, अशा ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, तरीही संशोधकांना या ग्रहामध्ये रस आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आपल्या सौरमालिकेबाहेरील एखाद्या ग्रहाची भूगर्भीय रचना जाणून घेण्यासाठी या ग्रहाची मदत होऊ शकते. या बाह्यग्रहाचे नाव ‘स्पेक्युलूस-3 बी’ असे आहे. हा खडकाळ पृष्ठभूमीचा ग्रह …
Read More »एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश मिळते; तर काहींना खूप मेहनत घ्यावी लागते. भवताली मेहनतीतून यशाची शिखरे गाठणार्या अनेक व्यक्ती दिसतात. त्यातून आपण प्रेरणा घ्यायची असते. अशीच एक प्रेरक गाथा आहे यंदाच्या चार्टर्ड अकौंटंट अर्थात सनदी लेखापाल या कठीण परीक्षेत यश मिळवणार्या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची…. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बेलौन या …
Read More »स्नायू बळकटीसाठी खा हेझलनट्स
निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. अनेक जण आहारात ड्रायफ्रूटस्चा समावेश करतात. पण, खूप कमी लोकांना माहिती आहे की एक ड्रायफ्रूट जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणजे हेझलनट किंवा पहाडी बदाम. त्याला कुल्ठी किंवा चिलगोजा म्हणून देखील ओळखले जाते. याला काजू आणि बदामांपेक्षाही जास्त शक्तिशाली मानले जाते. विशेषतः जेव्हा शरीराला शक्ती आणि पोषण देण्याची गरज असते, त्यावेळी त्याचे …
Read More »प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश दूर नसते, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुलीने विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवालवाडी हे गाव. या गावात अर्जुन चिखले आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्यांकडे फक्त 30 …
Read More »वार्धक्य रोखायचंय?
वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र