लेख-समिक्षण

चिंतन – प्रबोधन

प्रयत्न सोडू नका

‘रील्स‌’ बनवणाऱ्या असहाब अहमद अन्सारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत अपयश आल्यानंतरही जिद्द न हारता कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी सीजीएल) परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशातील टांडा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या असहाब यांनी शालेय शिक्षणात उत्तम गुण मिळवले होते. त्यानंतर कोटा येथे जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीची (बीटेक) पदवी पूर्ण …

Read More »

आयआयटी पासआऊट चिकन व्यवसायातून कोट्याधीश

तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत …

Read More »

गरिबीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी

आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात …

Read More »

सेंद्रीय उद्योगातून बनले कोट्यधीश

जयपूर येथील प्रतीक तिवारी यांनी आपली लठ्ठ पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून ‌‘रुफटॉप ऑरगॅनिक फार्मिंग‌’ क्षेत्रात पाऊल टाकले आणि आज ते कोट्यवधींची उलाढाल करणारे यशस्वी उद्योजक बनले आहेत. प्रतीक यांचे शिक्षण 1998 मध्ये कृषी अभियांत्रिकी विषयात झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत महिंद्रा, रिलायन्स फ्रेश, आयटीसी आणि वॉलमार्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये पुरवठा साखळी आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. मात्र, त्यांच्या …

Read More »

शून्यातून बनला कोट्याधीश…

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‌’ऑटो बेस्ट एम्पेरिओ‌’चे संस्थापक अवनीत सिंह कोहली उर्फ सन्नी. दिल्लीतील एका सुखवस्तू व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या सन्नी यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. 1996 मध्ये ते जेव्हा आठवीत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचा भीषण अपघात झाला आणि पुढील तीन वर्षे ते अंथरुणाला …

Read More »

दहावीत शाळा सोडलेला अब्जाधिश

झिरेोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच थक्क करणारा आहे. अवघ्या 17 व्या वर्षी शाळा सोडलेला एक तरुण आज 23 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा अधिपती बनला आहे, ही किमया त्यांच्या जिद्दीच्या आणि वेगळ्या वाटेने जाण्याच्या वृत्तीमुळे साध्य झाली आहे. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1986 मध्ये जन्मलेल्या निखिल यांना शालेय शिक्षणात कधीच रस …

Read More »

एका स्वप्नाचा ध्यास

आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‌‘ब्लूम‌’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …

Read More »

एका स्वप्नाचा ध्यास

आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‌‘ब्लूम‌’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …

Read More »

शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम

आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आजीच्या शाश्वत जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन मान्याने ‌‘ग्रँडमाज्‌‍ ग्रीन वीव्ह‌’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 1.2 टन कापडी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून वाचवण्यात तिला यश आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मान्याच्या आजीचे, व्ही. रुद्रम्मा यांचे निधन झाले. आजीच्या …

Read More »

अंतरीच्या जिद्दीने गाठले यशाचे शिखर

वाराणसीच्या मातीतील एका सामान्य ट्रक चालकाच्या कन्येने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. 17 वर्षांच्या रंजना यादवची ही कथा केवळ एका खेळाडूची यशोगाथा नसून, ती एका मुलीने आपल्या दिवंगत आईला दिलेल्या वचनाची आणि वडिलांच्या कष्टाला दिलेल्या उत्तराची साक्ष आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत रंजनाने 5,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. या …

Read More »