लेख-समिक्षण
  • 21 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

March, 2025

  • 16 March

    व्हॉट्स अ‍ॅप वापरताय?

    आतापर्यंत तुम्ही तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे अनेक बातम्या समोर येत आहेत. पत्रकार तसेच नेत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक होत आहेत. या अ‍ॅपद्वारे घोटाळा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्हीही चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आंधळेपणाने व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर काही आवश्यक सेटिंग्ज आणि खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू …

    Read More »
  • 16 March

    संघर्षातून यशाची ‘बालेकी’ यशोगाथा

    नेपाळमधील एका गावात सुमारे 37 वर्षांपूर्वी जन्मलेली रूपमणी जन्मापासूनच अपंग होती. तिला ऐकू येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. तिचे कुटुंब दार्जिलिंगला गेले तेव्हा रूपमणी सहा महिन्यांची होती. वडील तिथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. तिच्या लहानपणी रूपमणीला हे विचित्र वाटले की कुटुंबातील इतर लोक एकमेकांशी खूप बोलतात, एकमेकांशी संभाषण करतात, परंतु आपल्याला त्या संभाषणात भाग घेता येत नाही. पालक …

    Read More »
  • 16 March

    फळमाशांचाही मेंदू असतो तल्लख!

    मानवाचा मेंदू म्हणजे निसर्गाची सर्वात थक्क करणारी करामत आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरच जगात आपले सामाज्य बनवलेले आहे. मात्र मानवाशिवायही अनेक जीवांमध्ये त्यांचे जीवनयापन करण्यासाठी योग्य अशी बुद्धी असते. जी फळमाशी फळांना सडवते, तिच्याकडे नसती आफत म्हणून आपण पाहात असलो तरी ती फार चतुर असते व तिचा मेंदूही तल्लख असतो. कुठलीही कृती करण्यापूर्वी फळमाशी विचार करते, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. …

    Read More »
  • 16 March

    कल्पनातीत संघर्षातून भरारी

    कल्पना सरोज ह्या एक प्रेरणादायी भारतीय उद्योजिका आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितींवर मात करून यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचा जन्म 1961 साली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावात एका मराठी दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. 12 व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईतील झोपडपट्टीत पतीच्या कुटुंबासोबत राहत होत्या. तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा …

    Read More »
  • 16 March

    मेलेली मने

    ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांमुळे सोलापूरने स्वातंत्र्य प्राप्त केल्याचा इतिहास आजही जिवंत आहे. क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या या शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. वस्त्रोद्योगामुळे सोलापूर हे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही ज्वलंत विषयावर पेटून उठण्याची येथील मानसिकता त्यावेळच्या लोकांमध्ये होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे वैभव आणखी वाढण्याऐवजी आता उतरतीला लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर आणि परिसरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. काही …

    Read More »
  • 16 March

    चर्चेत ‘हंता’

    एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. …

    Read More »
  • 16 March

    मशिदीचे भोंगे फडणवीसांच्या निशाण्यावर

    राज्यात यापुढे मशिदींवरील भोंग्यांचा आवाज एका मर्यादेपालिकडे वाढल्यास त्यावर कारवाई होणार आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची असेल. तसेच कर्तव्यात कसुर करणार्‍या पोलिस निरीक्षकावर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पोलिसांना थेट कारवाई करण्याचे फारसे अधिकार नसल्याने संबंधित कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्राशी संपर्क साधण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. राज्यात अनेक …

    Read More »
  • 16 March

    अर्थसंकल्पातून काय मिळाले?

    महायुती सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी लोकानुनयाला थारा न देता राज्याच्या वित्तीय शिस्तीच्या चौकटीचे पालन करत विकासाला चालना देण्यासाठीचे महत्तम प्रयत्न केल्याचे दिसते. कोणत्याही अर्थसंकल्पानंतर अजून खूप काही करावयास हवे होते, हा सूर नेहमीच ऐकावयास मिळतो. परंतु समोर असणारी आव्हाने आणि उपलब्ध संसाधने यांचा ताळमेळ उत्कृष्टपणाने घालणे याला कुशल वित्तीय व्यवस्थापन म्हणतात. त्यादृष्टीने एकीकडे लाडक्या बहिणींना …

    Read More »
  • 16 March

    दीदींचे फासे, भाजपचे उसासे!

    हल्दियाचे आमदार तापसी मंडल यांचा पक्षात समावेश करून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच काळ असला तरी पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाल्याचे यावरुन दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले …

    Read More »
  • 9 March

    चर्चा गोविंदाच्या घटस्फोटाची

    अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. दोघेही लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान, झूम टीव्हीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे. गोविंदाची 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचं म्हटलं आहे. यामुळे होणार्‍या सततच्या मतभेदांमुळे हा …

    Read More »