भारतीय सिनेमाच्या इतिहासात फारच कमी चित्रपट दिग्दर्शकांनी भांडवलशाही व्यवस्थेच्या पोकळपणाला आणि त्यातून जन्माला येणार्या अधोगामी मूल्यांना तीव्रतेने, जिव्हाळ्याने आणि कलात्मकतेने दाखवले आहे. या दुर्मिळ आणि संवेदनशील दिग्दर्शकांंमध्ये गुरुदत्त यांचे स्थान अग्रक्रमावर आहे. त्यांनी जे काही केले ते त्या काळात केवळ धाडसीच नव्हे, तर सामाजिक भान जागवणारे कार्य होते. त्या काळात भारत स्वतंत्र झाला होता आणि राष्ट्र उभं करण्याची प्रक्रिया सुरू …
Read More »TimeLine Layout
August, 2025
-
3 August
नैराश्याने मेंदूचे आकुंचन
निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने लक्ष देणेही आवश्यक असते. सध्याच्या धकाधकीच्या, असुरक्षित वातावरणाच्या जीवनात अनेक लोक नैराश्यासारख्या मानसिक समस्यांच्या गर्तेत अडकत आहेत. अनेक वर्षांच्या जुन्या नैराश्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस (अश्वमीन) भागाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. मेंदूच्या याच भागात नवीन स्मृती तयार होत असतात, असे नऊ हजार लोकांचा अभ्यास करून सादर केलेल्या …
Read More » -
3 August
डास माणसाकडे का आकर्षित होतात?
डास हे त्यांचे मानवी लक्ष्य बहुसंवेदकतेने शोधतात. त्यात वास, दृश्य संकेत, शरीराचे तापमान यांचा समावेश असतो. त्यामुळेच ते माणसाजवळ येऊन रक्त पिऊ शकतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत हे संशोधन करण्यात आले आहे. डासाची मादी चावते. नर चावत नाही, डासाची मादी तिच्या पिलांना रक्त हे अन्न म्हणून देते, ती नेहमी यजमान म्हणजे माणूस रक्त पिण्यासाठी शिकार …
Read More » -
3 August
लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही!
कोरोना महामारीच्या काळात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन होते. त्याचा हवामान, पर्यावरणासाठी बराचसा अनुकूल परिणामही झाला होता. हवा आणि नद्या शुद्ध झाल्याची अनेक उदाहरणे त्यानंतरच्या काळात समोर आली होती. मात्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरही या लॉकडाऊनचा परिणाम झाला असेल याची आपण कल्पनाही करणार नाही. आता संशोधकांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात चंद्राचे तापमानही सामान्य तापमानापेक्षा कमी झाले होते! लॉकडाऊन काळात …
Read More » -
3 August
निःस्वार्थी मेहनत वाया जात नाही!
अॅलिस ऑगस्टा बॉल ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विज्ञानाच्या इतिहासात झळाळणारी संशोधिका. १८९२ मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या या तरुणीला अतिशय कमी आयुष्य मिळूनही मानवी समाजासाठी तिने अमूल्य कार्य करून दाखवले. लहानपणापासूनच ती हुशार, जिज्ञासू आणि परिश्रमी होती. रसायनशास्त्रातील तिला असलेली गोडी पाहता तिने आपल्या शिक्षणाचा संपूर्ण भर विज्ञानावरच ठेवला. हवाई विद्यापीठातून तिने मास्टर्स पदवी मिळवली आणि ती या विद्यापीठाची पहिली महिला तसेच …
Read More » -
3 August
खर्या अर्थाने स्वच्छता दूत
शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पुढे त्या कचर्याचे ढीग साचलेले दिसतात. कचरावेचक स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोयात टाकून हाच कचरा साफ करताना दिसतात. यांची समाजात केवळ ‘कचरावाला’ किंवा ‘कचरा कामगार’ एवढीच एक दुर्दैवी ओळख. मग तो दारूच पितो, तो बेवडाच आहे, तो तंबाखूच खातो, तो …
Read More » -
3 August
चौंसष्ट घरांची नवीन ‘महाराणी’
नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जॉर्जियात आयोजित जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकत इतिहास घडविला. त्याचवेळी भारतासाठी असा गौरव प्राप्त करणारी पहिली पहिली महिला ठरली. तिच्या वयापेक्षा दुप्पट मोठी असलेल्या कोनरू हम्पीला पराभूत करत जागतिक मान मिळवण्याची बाब दिव्यासाठी महत्त्वाची ठरली. या विजयासह ती ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला खेळाडू ठरली आहे. तत्पूर्वी ग्रँडमास्टरचा मान तिच्याअगोदर कोनरु हम्पी, डी. हरिका आणि …
Read More » -
3 August
अमेरिकेचा भारतावर ‘टॅरिफ बाँब’
अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाक्तया उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. बुधवारी त्यांनी ‘ट्रुथ’ या सोशल प्लॅटफफॉर्मवर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, …
Read More » -
3 August
‘फेक नॅरेटिव्ह’ ला चपराक
मालेगावच्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल नुकताच लागला असून राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने (एनआयए) या खटल्यातील सर्व सातही आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी घडलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणाचा निकाल १७ वर्षांनी येणे हे आपल्या न्यायप्रणालीचे अपयशच असून अशा प्रकारे इतक्या वर्षांनी आरोपी निर्दोष असल्याचे समोर येत असेल तर ती बाब अधिक गंभीर आहे. पण या निकालामध्ये सर्व …
Read More »
July, 2025
-
27 July
आमिरचा ’महाभारत’ ऑगस्टपासून सुरु
आपल्या अनेक मुलाखतीतून ’महाभारत’ यावर सिनेमा काढण्याचे बोलणार्या आमिर खानने येत्या ऑगस्टपासून त्यावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे ’रामयण’ तयार होत असताना ’महाभारता’च्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शयता आहे. थोडयात लवकरच भारतीय चित्ररसिकांना या दोन्ही महाकाव्यांना रुपेरी पडद्यावर पहाता येणार आहे. मनिष मल्होत्रा यांच्या ’रामायण’ या चित्रपटाचे दोन भाग येणार आहेत. आमिर खान याच्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







