गुलाब जल हे त्वचेसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. गुलाब जल लावल्याने चेहरा तजेलदार आणि स्वच्छ दिसतो. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघेही याचा नियमित वापर करु शकतात. गुलाब जलाचा वापर करुन आपण घरच्या घरी स्किन केअर प्रॉडट्सही बनवू शकतो. गुलाबजल मिश्रीत ही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते आणि नैसर्गिक चमक येते. सर्वांत महत्त्वाचे …
Read More »TimeLine Layout
August, 2025
-
17 August
आरोग्यवर्धक ‘लाल सोने ’
जगातील सर्वात महागडा मसाला म्हणजे केशर. इराणमधून अतिशय चांगल्या दर्जाचे केशर जगभर निर्यात केले जात असते. आपल्याकडे काश्मीरमध्येही केशराची शेती होते. हे ‘लाल सोने’ स्वाद व सुगंधासोबतच आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक असते. आहारात केशरचा नियमित समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते, असे …
Read More » -
17 August
अफाट चिकाटी,अपार यश
जुलिया चाइल्ड यांना लहानपणापासूनच विविध प्रकारच्या पदार्थांची आवड होती. त्यांच्या नव्या प्रयोगांमुळे पदार्थ अत्यंत चविष्ट बनत. एकेदिवशी त्यांनी ठरवले की त्यांनी शोधून काढलेल्या रेसिपी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्यांनी आपल्या दोन महिला सहकार्यांसोबत मिळून एका पुस्तकाची योजना आखली. त्या पुस्तकाचे शीर्षक ठेवले ‘फ्रेंच कुकिंग फॉर द अमेरिकन किचन’ सहकार्यांसोबत त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून त्या पुस्तकावर पाच वर्षेकाम केले आणि ते …
Read More » -
17 August
समृद्ध राज्यातले आक्रित
कधीकाळी देशाच्या शेतीसाठी आदर्श मानल्या गेलेल्या पंजाबमधील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याने दबून पिचले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सध्याच्या परिस्थितीत कृषी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याची नितांत गरज आहे. अलीकडेच लोकसभेत सादर झालेल्या नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या अहवालाने पंजाबमधील शेतकर्यांची गंभीर आर्थिक अवस्था उघड केली आहे. या अहवालानुसार देशातील …
Read More » -
17 August
तेलापलीकडचा संदेश
सध्या सुरू असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि अमेरिका एक अतिशय गुंतागुंतीच्या परराष्ट्र धोरणात्मक नात्याच्या टप्प्यावर आहेत. एकतर्फी वर्चस्वापासून मुक्त असणार्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारताच्या स्वायत्त, स्वतंत्र धोरणांचे समर्थन करत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ दडपशाहीसमोर भारताने झुकण्यास नकार देत आपली आर्थिक आणि धोरणात्मक स्वायत्तता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू केवळ …
Read More » -
17 August
राज्यात १५ हजार पोलीस भरती
महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार कर्मचारी भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाने मांडलेल्या १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत होते. या निर्णयाद्वारे त्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार निर्णय घेण्यात आले …
Read More » -
17 August
‘पिरियड शेमिंग’ चा डाग
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणार्या राज्यातील ठाणे जिल्ह्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींशी करण्यात आलेली वर्तणूक ही अमानवी आणि घृणास्पद आहे. मासिक पाळीविषयीची लाज ही मासिक पाळीला एक अनावश्यक शारीरिक घटना मानण्याच्या सामाजिक धारणेचा परिणाम आहे. वास्तविक पाहता तो शरीरधर्म आहे. असे असूनही मासिक पाळीकडे नकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाणे, ही घृणास्पद आणि वीट आणणारी मानसिकता आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील …
Read More » -
17 August
इंटरनेट सुविधा धोक्यात?
डिजिटल युगातील अदृश्य जीवनवाहिन्या म्हणजे समुद्रात खोल तळाशी असणार्या ऑप्टिकल केबल्स. या इंटरनेट केबल्समधून दररोज अब्जावधी संदेश, डेटा आणि व्यवहार जगाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहोचतात. पण या जीवनवाहिन्या जागतिक सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू बनत आहे. अमेरिकेच्या नव्या सुरक्षा नियमांपासून ते रेड सी परिसरातील अस्थिरतेपर्यंत, या केबल्सवर घोंगावणारे धोके हे राष्ट्रांच्या आर्थिक स्थैर्यापासून लष्करी क्षमतेपर्यंत सर्वकाही प्रभावित करू शकतात. या पार्श्वभूमीवर भारताने …
Read More » -
10 August
१०० सरले, ९० उरले
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘राम लिला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘गंगुबाई’सारखे चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपट ५० टक्के पूर्ण झाला आहे. १०० दिवसांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ९० दिवसांचे शिल्लक आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. आठ महिने सलग चित्रीकरण सुरु होते. ऑगस्टपासून रणबीर …
Read More » -
10 August
‘सैयारा’च्या यशाचे वेगळेपण
प्रकाश मंदावलेला, प्रेक्षकांच्या डोळ्यांत उत्कंठा. स्क्रीनवर पहिली फ्रेम झळकते एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर हलकासा पाऊस, नायकाच्या डोळ्यांत एक अनामिक शोध, आणि त्याच वेळी समोरून येणारी ती! पडद्यावर क्षणभर थांबलेला श्वास, थरार आणि कोमलतेचा संगम. ही आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ची प्रेमकथा जी जणू काळाला वळसा घालून आली आहे. हिंसा, डार्क कंटेंट आणि ओटीटीच्या जगात हरवलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाशी जोडणारी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







