लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

October, 2025

  • 12 October

    तुमचंही मूल शाळेत उदास असतं?

    साधारणतः दुसरी ते चौथी इयत्तेत जाईपर्यंत मुलांच्या शिक्षणाबाबत, शाळेत जाण्याबाबत पालकांना प्रचंड काळजी असते. यातील सर्वांत मोठे आव्हान असते ते मुलाला शाळेपर्यंत पोहोचवणे. दुसरे असते न रडता. तिसरे असते घरामध्ये शांत वातावरण राखून मुलाचं सकाळचं सगळं आवरणं. यादरम्यान होणार्‍या चुका मुलांवर नकारात्मक परिणाम करतात. तुमचंही मूल शाळेतून आल्यावर उदास, गप्प आणि हरवलेलं असतं का? किंवा टीचर्सकडून वारंवार ऐकावं लागतं का …

    Read More »
  • 12 October

    जैविक शेतीची अनोखी यशोगाथा

    दीपक सभरवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम, आयसीएमए आणि एमबीए पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी टाटा, पेप्सी आणि जनरल इलेट्रिकसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केले. परंतु, कॉर्पोरेट मिटिंग्स आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधील आयुष्य त्यांना पूर्ण समाधान देत नव्हते. २०१७ मध्ये दीपक यांनी आपले वीस वर्षांचे कॉर्पोरेट करिअर सोडले आणि ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास राजस्थानातील पुष्कर येथे …

    Read More »
  • 12 October

    जड झाले ओझे

    जागतिक बँकेकडून कर्ज घेणार्या देशांच्या यादीमध्ये भारताचा आता पहिला क्रमांक लागला असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या आहेत. यावरून आता भारत जगातला सगळ्यात मोठा कर्जबाजारी देश बनला असल्याची ओरड सोशल मीडियातून सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही तीच हाकाटी पिटायला सुरुवात केली आहे. एका माहितीनुसार, जागतिक बँकेचे भारतावरील एकूण कर्ज ३९.२८ अब्ज अमेरिकन डॉलर इतके झाले आहे, भारतीय रुपयात हे …

    Read More »
  • 12 October

    ‘प्लेजर मॅरेज’ चा घातक ट्रेंड

    इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश मानला जातो, पण एकेकाळी तिथे हिंदू राजे राज्य करीत होते आणि जनतेचाही बहुतांश भाग हिंदू धर्मीय होता. पुढे काळ बदलला, इस्लामचा प्रसार झाला आणि आज तो एक प्रमुख मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या या देशात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त सामाजिक प्रथा वाढीस लागली आहे, जिला आनंद विवाह किंवा मुताह निकाह …

    Read More »
  • 12 October

    शेतकर्‍यांना ३१,६२८ कोटींचे पॅकेज

    मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. ओल्या दुष्काळाप्रमाणे ही मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची …

    Read More »
  • 12 October

    ‘औषधबळींना’ जबाबदार कोण?

    मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे दूषित किंवा भेसळयुक्त औषधांमुळे १२ बालके दगावल्याची घटना अत्यंत खेदनजक आहे. यापूर्वीही जम्मूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, गुरुग्राम, तामिळनाडू , जे.जे. रुग्णालय तसेच गांबियामध्ये दूषित औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. वास्तविक, भारतामध्ये १९४० साली तयार करण्यात आलेला औषधे आणि प्रसाधने अधिनियम १९४० हा कायदा अतिशय प्रभावी आणि परिपूर्ण आहे; परंतु या कायद्याची अमलबजावणी करणारी यंत्रणा कुचकामी …

    Read More »
  • 12 October

    एआय मुळे बुद्ध्यांक खालावतोय?

    शिकण्याचा मुद्दा येतो तेव्हा त्यात विचार करणे अणि मेहनत करणे क्रमप्राप्त ठरते. यातूनच विश्लेषणात्मक विचार करण्याचे कौशल्य विकसित होते. एखादा निबंध लिहण्यासाठी किंवा अन्य कामासाठी विद्यार्थी किंवा तरुण चॅटजीपीटीचा वापर करतात तेव्हा ते शिकण्याची क्षमता नकळतपणे कमी करतात. एआय शिकण्याच्या कामात अडचणी आणतो, तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्ध्यांकाचे होणारे नुकसान कळत नाही आणि ते नकळतपणे त्याच्या आहारी जातात. पालकांचे लक्ष मात्र …

    Read More »
  • 5 October

    महावतार नरसिम्हाचा विक्रम

    नुकताच प्रदर्शित झालेला ‘महावतार नरसिम्हा’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाने आतापर्यंत ३२० कोटींचा गल्ला जमवला आहे. एकट्या भारतातून २६८ कोटींची कमाईने चित्रपटाने केली. यात थ्रीडीची कमाई जोडल्यास हा आकडा २९६ कोटींच्या घरात जातो. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी सुरुवात काहीशी रडतखडत झाली. परंतु उत्तरोत्तर चित्रपटाने चांगलीच गती मिवली. खास करुन शाळाशाळांंतून या चित्रपटाचा प्रचार झाला. दाक्षिणात्य प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच हात दिला. तेलूगू पट्ट्यातून …

    Read More »
  • 5 October

    मल्याळम सिनेमातील अमिताभ

    अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. भारतीय सिनेमावर मोहनलाल यांचा प्रभाव अनुपम मानला जातो. पडद्यावर प्रभावी उपस्थितीमुळेच ते नेहमीच इतरांहून वेगळे भासतात. ते देशातील सर्वाधिक सन्मानित अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन अशी उपाधी दिली गेली आहे. संवादफेक आणि भावनांचे चित्रण यांत त्यांची खासियत …

    Read More »
  • 5 October

    स्पर्धेच्या युगातील सक्सेस मंत्र

    अधिक माहिती मिळवावी ः ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रातील प्रस्थापित लोकांकडून त्यातील चांगल्या-वाईट आणि प्रारंभी येणार्‍या अडचींबाबत संपूर्ण माहिती एकत्र करावी. ग्लॅमरला प्राधान्य नको ः ग्लॅमरप्रधान करिअर तरुणाईला भुरळ घालत असतात. अभिनय, मॉडेलिंग, एअर हॉस्टेस, पत्रकार किंवा पंचतारांकित हॉटेलमधील फ्रंट ऑफिसचे काम दिसायला खूप ग्लॅमरस दिसते; पण या करिअरमध्ये अपार मेहनत, निराशा, शॉर्ट टर्म मागणी, इतर अनेक गोष्टींच्या अडचणी …

    Read More »