जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खेळणं म्हणजे वडिलांची क्रिकेटची बॅट होती. ती बॅट माझ्यापेक्षा उंच, जड आणि मला हाताळायलाही अवघड वाटायची. पण तीच बॅट माझं पहिलं स्वप्न बनली. मला अजून आठवतं, मी अंगणात उभी राहून ती बॅट दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करायचे आणि वडिलांना म्हणायचे की मी सुद्धा भारतासाठी खेळणार आहे. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की …
Read More »अखेर नगरपालिकांची निवडणूक घोषित
राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य …
Read More »उत्कंठा शिगेला
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे. उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन …
Read More »न्यायविलंबाचे आव्हान
आरोप निश्चिती ही न्यायाची पहिली पायरी आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहणार्या खटल्यामुळे आरोपींना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षेकच्चे कैदी म्हणून तुरुंगात राहणार्यांची स्थिती तर या प्रलंबित प्रकरणांमुळे आणखीच बिकट होते. भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार देशातील तुरुंगात ७६ टक्के कैदी कच्चे आहेत. ‘जस कॉर्पस लॉ जर्नल’मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, कच्च्या कैद्यांची संख्या वाढण्यामागचे कारण म्हणजे अपुरी कायदेशीर मदत …
Read More »आलिया झळकणार ‘चामुंडा’मध्ये
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एकामागून एक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या दोन भव्य चित्रपटांचे शूटिंग ती सध्या करत आहे. मात्र, या दोन्ही प्रोजेट्सच्या दरम्यान आलिया आता आणखी एका मोठ्या चित्रपटाशी जोडली जाऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. असं सांगितलं जातंय की, स्पाय यूनिव्हर्सनंतर आलिया आता …
Read More »असरानी नावाचे हास्यपर्व
हिंदी चित्रपटसृष्टीतील चालतीबोलती दंतकथा ठरलेल्या शोले चित्रपटात लहानशी, परंतु अविस्मरणीय भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे नुकतेच निधन झाले. केवळ शोलेच नाही, तर त्यापूर्वी व त्यानंतर असंख्य चित्रपटांत लहान-मोठ्या व सर्व छटांच्या भूमिका साकारणारे असरानी काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते. ‘हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं’ व हमारे जेलमें सुरंग?’ हे विशिष्ट लकबीत त्यांनी उच्चारलेले संवाद चित्रपटप्रेमींच्या कायम …
Read More »इंडक्शन कूकर वापरताय?
इंडक्शन कूकर हे उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तंत्रावर कार्य करते. त्यात गरम होणारी हॉट प्लेट स्वतः तापत नाही, तर त्यावर ठेवलेल्या लोहयुक्त भांड्यांना गरम करतो. यामुळे ऊर्जा थेट अन्नात वापरली जाते आणि हीट लॉस कमी होतो. फायदे काय आहेत? पारंपरिक गॅसच्या तुलनेत हीटिंग प्रोसेस जलद होते. कारण यामध्ये उर्जा वाया जात नाही. उघडी ज्योत नसल्यामुळे जळण्याचा धोका कमी. …
Read More »मुलांचा किशोरवयीन टप्पा हाताळताना…
किशोरवय ही मुलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक अवस्था असते. वयाच्या १२ ते १८ वर्षांदरम्यान शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर झपाट्याने बदल घडत असतात. या बदलांचा प्रभाव त्यांच्या वागणुकीवर, विचारसरणीवर आणि नातेसंबंधांवरही दिसून येतो. या टप्प्यावर मुलं अधिक स्वतंत्रतेकडे झुकणारी, मतप्रदर्शन करणारी, आणि सामाजिकदृष्ट्या जाणीवपूर्वक वागणारी होतात. पण याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन, समजून घेणे आणि सुसंवाद साधणे गरजेचे …
Read More »कृषीक्रांतीचा सुहानपी पॅटर्न
सुहानी चौहान या १७-१८ वर्षांच्या सर्जनशील तरुणीच्या प्रतिभेतून साकार झालेलं सो अॅप्ट अॅग्रोे हे सौरऊर्जेवर चालणारे शेतीवाहन शेतकर्यांसाठी एक वरदान ठरत आहे. हे वाहन शेतकर्यांचा उत्पादनखर्च कमी करुन पीक उत्पादनात वाढ करण्यास लाभदायक ठरत आहे. इयत्ता सातवीत असताना मानेसर येथील एका शैक्षणिक सहलीदरम्यान शेतकर्यांचे कष्ट पाहून सुहानी ढवळून निघाली. याबाबत ती सांगते की, शेतकरी दिवसभर राबताना पाहिलं आणि त्यांच्या आत्महत्या …
Read More »सफाई कामगार ते असिस्टंट मॅनेजर
जीवनात परिस्थिती जेव्हा माणसाला झुकवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा धैर्यच इतिहास लिहितं. महाराष्ट्रातील प्रतीक्षा तोंडवलकर यांची कहाणी हेच सिद्ध करते. ज्या बँकेत त्यांनी कधी काळी झाडू हातात घेतला होता, त्याच भारतीय स्टेट बँकेत त्या आज असिस्टंट रीजनल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. प्रतीक्षा यांचा जन्म पुण्याजवळील एका अतिशय गरिब कुटुंबात झाला. वडील मजुरी करत होते. त्यांच्या उत्पन्नावर कसंबसं घर चालायचं. त्यामुळे शिक्षण …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र