लेख-समिक्षण

खर्‍या अर्थाने स्वच्छता दूत

शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पुढे त्या कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. कचरावेचक स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोयात टाकून हाच कचरा साफ करताना दिसतात. यांची समाजात केवळ ‘कचरावाला’ किंवा ‘कचरा कामगार’ एवढीच एक दुर्दैवी ओळख. मग तो दारूच पितो, तो बेवडाच आहे, तो तंबाखूच खातो, तो …

Read More »

चौंसष्ट घरांची नवीन ‘महाराणी’

नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जॉर्जियात आयोजित जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकत इतिहास घडविला. त्याचवेळी भारतासाठी असा गौरव प्राप्त करणारी पहिली पहिली महिला ठरली. तिच्या वयापेक्षा दुप्पट मोठी असलेल्या कोनरू हम्पीला पराभूत करत जागतिक मान मिळवण्याची बाब दिव्यासाठी महत्त्वाची ठरली. या विजयासह ती ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला खेळाडू ठरली आहे. तत्पूर्वी ग्रँडमास्टरचा मान तिच्याअगोदर कोनरु हम्पी, डी. हरिका आणि …

Read More »

अमेरिकेचा भारतावर ‘टॅरिफ बाँब’

अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाक्तया उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. बुधवारी त्यांनी ‘ट्रुथ’ या सोशल प्लॅटफफॉर्मवर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, …

Read More »

‘फेक नॅरेटिव्ह’ ला चपराक

मालेगावच्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल नुकताच लागला असून राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने (एनआयए) या खटल्यातील सर्व सातही आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी घडलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणाचा निकाल १७ वर्षांनी येणे हे आपल्या न्यायप्रणालीचे अपयशच असून अशा प्रकारे इतक्या वर्षांनी आरोपी निर्दोष असल्याचे समोर येत असेल तर ती बाब अधिक गंभीर आहे. पण या निकालामध्ये सर्व …

Read More »

आमिरचा ’महाभारत’ ऑगस्टपासून सुरु

आपल्या अनेक मुलाखतीतून ’महाभारत’ यावर सिनेमा काढण्याचे बोलणार्‍या आमिर खानने येत्या ऑगस्टपासून त्यावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे ’रामयण’ तयार होत असताना ’महाभारता’च्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शयता आहे. थोडयात लवकरच भारतीय चित्ररसिकांना या दोन्ही महाकाव्यांना रुपेरी पडद्यावर पहाता येणार आहे. मनिष मल्होत्रा यांच्या ’रामायण’ या चित्रपटाचे दोन भाग येणार आहेत. आमिर खान याच्या …

Read More »

वैवाहिक नातेसंबंधांचे रुपेरी दर्शन

अग्निला साक्षी ठेवून घेतलेल्या सात फेर्‍यांनंतर बनलेले पती-पत्नी हे जीवनसाथी म्हणवले जातात. पण त्यांच्यातील नातेसंबंधांना असंख्य पदर असतात. ते बहुतांश वेळा उंबरठ्याआडच असतात. त्यांचा बोभाटा केला जात नाही. पण सिनेदिग्दर्शक-कथाकारांनी या हळूवार नात्यातील कंगोरे चित्रपटांच्या माध्यमातून विविध रुपांत मांडले आणि पाहता पाहता याच कथानकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती लाभली. कधी पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज झाले, कधी त्यांच्या नात्यात तिसर्‍या व्यक्तीच्या अस्तित्वामुळे कथानक …

Read More »

बनावट संकेतस्थळांपासून सावध राहा

ऑनलाईन शॉपिंग आजच्या काळात आपल्या दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. आता लोक केवळ फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉनपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर थेट सोशल मीडियाच्या जाहिरातींवरूनही खरेदी करत आहेत. पण जसे हे सगळे सोपे आणि आकर्षक वाटते, तसेच ते धोका निर्माण करणारेही असते. अनेक बनावट वेबसाईटस् अगदी खर्‍यासारख्या दिसतात. आकर्षक डिझाईन, कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय आणि मोठ्या सूट अशा गोष्टींचे आमिष दाखवून …

Read More »

मुलांची सायबर सुरक्षा आणि पालक

आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या धोयांमध्येही वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये १२ टक्के वाढ झाली असून त्यात लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. युनिसेफच्या मते, भारतातील १३-१८ वयोगटातील ५९% मुलांनी ऑनलाइन छळाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेसाठी पालकांची …

Read More »

जगावेगळी कॉफी

चहाप्रमाणेच जगभरात कॉफीप्रेमींची कमतरता नाही. अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीच्या वाफाळलेल्या कपाने करतात. त्याचा सुगंध कॉफी पिणार्‍यांना वेड लावतो. एखाद्याला कॉफी पिण्याची सवय लागली तर तो त्याची वेगवेगळी चव ट्राय करतो. त्याच्या वेगवेगळ्या बीन्सची चव वेगवेगळी असते. जगातील सर्वात चविष्ट कॉफी इतकी महाग आहे की त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. या वेगवेगळ्या कॉफीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल, पण …

Read More »

विणकामात क्रांती घडवणारा अवलिया

श्री मल्लेशम् यांचा जन्म आंध्रप्रदेशातील एका गरिब विणकर कुटुंबात झाला. त्यांना इयत्ता सहावी नंतर शिक्षण सोडावे लागले आणि मोठ्यांसोबत हातमाग विणकामाच्या कामात मदत करायला सुरुवात केली. मात्र शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी खाजगीरित्या ७ वी उत्तीर्ण केली आणि १० वी सुद्धा प्रयत्नपूर्वक तिसर्‍या प्रयत्नात पूर्ण केली. पोचंपल्ली रेशीम साडी विणकामाच्या परंपरेमध्ये ‘आसू’ ही एक अनिवार्य आणि अत्यंत श्रमसाध्य प्रक्रिया असते. या …

Read More »