लेख-समिक्षण

संगणकविश्वातील ‘बग’ शोधणारी जननी

ग्रेस हॉपर या अमेरिकन संगणकतज्ज्ञ आणि नौदलातील अधिकारी होत्या. आज आपण कंप्यूटर प्रोग्रामिंग ही जी गोष्ट सहज मानतो, त्याचा पाया घालण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्याशी निगडित एक आगळावेगळा प्रसंग संगणक क्षेत्रातील संज्ञाचक्र बदलून गेला. १९४७ साली हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात मार्क-२ नावाचा एक भला मोठा संगणक वापरात होता. हा संगणक खोलीभर जागा व्यापून बसलेला, हजारो व्हॅयूम ट्यूब्सनी चालणारा …

Read More »

अधिकारी संवेदनशील का नसतात?

कोणत्याही बांधकाम स्थळी सुरक्षेची खात्री करणे ही सर्वात मूलभूत जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात तिथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचारी या जबाबदारीबाबत सजग आणि संवेदनशील का नसतात, हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला उघडे ठेवलेले गटार, खड्डे किंवा मॅनहोल यात जर एखादा व्यक्ती चुकून पडला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात असे खड्डे वा गटार पाण्याने भरून जातात आणि त्यांचा …

Read More »

दिलासा कर्करोगावरील लसीचा

र्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी कर्करोगासाठी लस तयार केल्याचा दावा केला असून तिचा पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. या नव्या घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. रशियाने तयार केलेल्या या नव्या लसीचे नाव एंटरॉमिस असे असून ती एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक …

Read More »

सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती!

महाष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांची देशाच्या नव्या उपराष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली आहे. संसदेतील निवडणूक प्रक्रियेत त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांना ४५२ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. राधाकृष्णन यांनी त्यांचा १५२ मतांनी पराभव केला. त्यानंतर, त्यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एनडीएचे उमेदवार …

Read More »

सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ‘विक्रम-३२’ ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडटर चिप प्रदान करण्यात आली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. परंतु आता सेमीकंडटर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे. आजची दुनिया एका प्रचंड तांत्रिक क्रांतीच्या …

Read More »

नेपाळमधील अराजकाच्या मुळाशी

भारताचा शेजारी देश असणारा नेपाळ हा गेल्या जवळपास दशकभरापासून अस्थिरता-अस्वस्थता आणि अशांतता यांच्या मगरमिठीत सापडला आहे. राजेशाही व्यवस्थेचा त्याग करुन नेपाळने लोकशाहीची कास धरली खरी; पण दहा वर्षेउलटूनही तेथे लोकशाही व्यवस्था खर्‍या अर्थाने नावारुपाला आलीच नाही. सुरुवातीला राज्यघटना निर्मितीसाठी प्रचंड खल झाला. त्यानंतर राजकीय अस्थिरतेचे ग्रहण नेपाळला लागले ते कायमचेच. आज नेपाळ राजकीय आणि सामाजिक संकटाच्या नव्या वळणावर पोहोचला आहे. …

Read More »

अरशद, अक्षयची वकिली वादात

न्यायालयीन व्यवस्थेवर तिरकस भाष्य करणार्‍या ‘जॉनी एलएलबी’ चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली. अक्षयच्या पहिल्या भागानंतर अरशदच्या दुसर्‍या भागानेही तेवढेच मनोरंजन केले. त्यामुळेच निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग आणायचा ठरवला. यात दोन्ही जॉली म्हणजे अक्षय आणि अरशद दिसणार आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्याने वादंग निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘जॉली एलएलबी’च्या तिसर्‍या भागाची माहिती सांगणारा टिझर प्रदर्शित झाला. दोन जॉलीची जुगलबंदी …

Read More »

रामकथांची मोहिनी

हिंदी सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही एक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात अनेक विषय, कथानके, व्यक्तिरेखा पडद्यावर आल्या; पण त्यांत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले विषय म्हणजे रामायण व महाभारतासारख्या पौराणिक कथा. यातही रामकथा ही प्रेक्षकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेली कथा आहे. कारण प्रभू श्रीराम हे केवळ देवता म्हणून नव्हे तर मर्यादा, धर्मपालन, …

Read More »

बना बहुभाषिक

सध्याच्या स्पर्धेच्या युगात अशा प्रकारचे एखादे वैशिष्ट्य आपल्याकडे असणे आवश्यक असते. आपल्या क्षेत्रातील पदवीबरोबरच तुम्हाला मातृभाषेव्यतिरित अन्य एखादी भाषाही अवगत आहे असे दिसले तर तुम्हाला नोकरी मिळण्यात प्राधान्य दिले जाते. पूर्वी म्हणजे साधारण ४०-५० वर्षापूर्वी एकापेक्षा अधिक भाषा जाणून घेणे हे लहान मुलांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते असे बोलले जात असे. लहान वयात मुलांना एकापेक्षा अधिक भाषा शिकायला लावल्या तर …

Read More »

पालक-शिक्षक मीटिंगला जाताना…

ळांच्या शिक्षणावर आणि त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे हे प्रत्येक पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य असते. शाळेमध्ये मुलांच्या कामगिरीची योग्य माहिती मिळवण्यासाठी पालक-शिक्षक बैठक हा एक उत्तम पर्याय असतो. मात्र, अनेकदा पालकांना हे समजत नाही की शिक्षकांना कोणते प्रश्न विचारावेत जेणेकरून त्यांच्या मुलाच्या अभ्यास आणि वर्तनाची संपूर्ण माहिती मिळू शकेल. माझ्या मुलाची अभ्यासातील कामगिरी कशी आहे? या प्रश्नामुळे तुम्हाला हे समजू शकेल की …

Read More »