लेख-समिक्षण

पालकत्वातील भीती आणि वास्तव

माणूस बहुधा त्याच गोष्टींना जास्त भीत असतो ज्या त्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे पालकांना आणि विशेषतः आयांना संगोपनादरम्यान सतत मुलांविषयीच्या काही भीती मनात असतात. पालकत्व हा चिंतेचा विषय असला तरी वास्तवाचा योग्य विचार करून आणि आवश्यक ती पावले उचलून, या भीतींवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी त्यांच्या कृतींमध्ये संतुलन …

Read More »

जहाजबुडीची चिंता मिटली!

कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून निघालेले टायटॅनिक हे महाकाय जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर अटलांटिक महासागरात हिमनगाला धडकून बुडाले होते. शंभर वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेनंतर तंत्रज्ञानात बरीच सुधारणा झाली आहे आणि अधिक सुरक्षित जहाजे, नावा तयारही होत आहेत; मात्र तरीही जहाज, नौका बुडून अनेक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात; पण आता बोटींवर आघात झाल्यानंतरही त्या बुडणार …

Read More »

सायकल चोरीला गेली नसती तर….

१९५४ मध्ये जेव्हा कॅसियस फक्त बारा वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत लुईव्हिल येथील कोलंबिया सभागृहात ‘होम शो’ पाहायला गेला होता. प्रदर्शनात फर्निचर आणि घरगुती उपकरणांबरोबरच मुलांना मोफत पॉपकॉर्नसारख्या लहानसहान आनंददायी गोष्टी देखील मिळाल्या. पण जेव्हा कॅसियस बाहेर आला तेव्हा त्याची लाडकी लाल-पांढरी सायकल चोरीस गेली होती. हताश आणि रागावलेला कॅसियस तक्रार करण्यासाठी एका पोलिसाकडे गेला. त्याने रागाने त्या पोलिसाला …

Read More »

ग्राहकहितैषी निर्णय

शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये हॉटेल-रेस्तराँमध्ये जाऊन जेवणे हा आजकालच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. कुटुंबीय वा मित्रांसोबत बाहेर खाणे ही केवळ सामाजिक सवय नसून प्रतिष्ठेची बाब मानली जाते. परंतु या प्रवृत्तीचा फायदा घेत अनेक महागडे रेस्तराँ आपल्या मनमानी पद्धतीने दर ठरवतात. जेवणातील पदार्थांच्या मूळ किंमतीपेक्षा बरेच जास्त पैसे आकारणे ही आधीच ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी बाब आहे. त्यातही एकूण खर्चावर आणखी वेगळा …

Read More »

‘टिकटॉक’ परतणार?

टिकटॉकची भारतात पुन्हा एंट्री होणार का, याबाबतच्या चर्चा अलीकडेच जोर धरू लागल्या आहेत. असा दावा केला जात आहे की, भारतात या अ‍ॅपवरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते. मात्र, चीनी अ‍ॅपवरील बंदी इतया सहजपणे उठणार नाही. यात अनेक आव्हाने आहेत. टिकटॉक पुन्हा चर्चेत का आले? : खरं तर, टिकटॉकची वेबसाइट भारतात पुन्हा सुरू होऊ लागली. यानंतर सोशल मीडियावर ही अफवा पसरली …

Read More »

लाडया बाप्पांचे आगमन

राज्यात बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाचा पहिला दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला असून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात लाडया बाप्पांचे आगमन ठिकठिकाणी झाले. त्यानिमित्ताने घराघरांत तसेच विविध गणेश मंडळांत उत्साह ओसंडून वाहतो आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, असा गजर करीत मानाच्या गणपतींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. वाजत-गाजत गणरायांच्या आगमनाने भाविक भक्तिभावात न्हाऊन निघाले आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमधील संती गणपतीची सकाळी …

Read More »

राहुल-तेजस्वींची यात्रा फलदायी ठरेल?

बिहारमध्ये येणार्‍या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकांची पूर्वतयारी सध्या जोमाने सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बिहारी जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काँग्रेस पक्षाने गेल्या काही वर्षांत बिहारमधील जनाधार मोठ्या प्रमाणावर गमावला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी आणि ‘इंडिया’ आघाडीला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत ‘मतदार अधिकार यात्रे’स …

Read More »

एआय आणि भारतीय निवडणुकीचे भवितव्य

आर्टिफिशियल इंटिलिजन्स हळूहळू भारत आणि जगातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम करत आहे. त्याचा वाढता प्रभाव पाहता एआय शाप की वरदान याभोवती चर्चा फिरत आहे. आजघडीला विविध क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला असताना निवडणूक प्रक्रिया देखील त्यापासून अपवाद राहिली नाही. या माध्यमातून राजकीय पक्ष, उमेदवार हे मतदारांना आकर्षित करत आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत एआयचा …

Read More »

‘महावतार नरसिंम्हा कसा बनला?

जुलै महिन्यात रिलीज झालेल्या महावतार नरसिंह या अ‍ॅनिमेटेड सिनेमाने नवा इतिहास रचत बॉस ऑफिसवर धूमाकूळ घातला. कालच कुली आणि वॉर २ हे मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत. मात्र, महावतार नरसिंह सिनेमाचे शो सुरू आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड सिनेमा ठरला आहे. पण सिनेमा तयार करण्यामागे घेण्यात आलेली मेहनत आणि आलेल्या संकटांना कशा पद्धतीने तोंड दिलं याविषयी या …

Read More »

आठवणी ‘शोले’च्या

बॉलिवुडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट म्हणून रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाचा उल्लेख करावा लागतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झाली. आजही या चित्रपटातील पात्र, गाणे, संवाद, दृश्य प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. तीन कोटी रुपयांत तयार झालेल्या चित्रपटाचे प्रारंभिक बजेट एक कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने तत्कालिन काळात ३५ कोटी रुपयांची कमाई केली. मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमध्ये सलग …

Read More »