गेल्या चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी मुहूर्त काढला आहे. आयोगाच्या मागणीनुसार, मुदतवाढ देत सगळ्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत व्हायला पाहिजेत, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. निवडणुका घेण्यास विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून निवडणूक …
Read More »TimeLine Layout
September, 2025
-
21 September
महती नवरात्रोत्सवाची
भारताच्या सर्वच प्रांतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरे होतात. भारतीय संस्कृतीने पुरुष देवता असतानाही शक्ती देवता म्हणून स्त्री देवतेला उभे करुन महिषासुरासारखा बलदंड राक्षस तिच्या हातून वध करवून घेतला. तिचा हा मोठा पराक्रम सांगण्यासाठी मोठी परंपरा निर्माण झाली. असुरी शक्ती जेव्हा दैवी शक्तीविरुद्ध युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरी …
Read More » -
21 September
प्रस्थापितांसाठी इशारा
नेपाळपासून श्रीलंका आणि इराणपासून म्यानमार आणि फ्रान्सपर्यंत सर्वत्र जनतेच्या असंतोषाच्या मुळाशी दैनंदिन संघर्षमय जीवन आहे. जगाची मोठी लोकसंख्या ही युवा आहे आणि आजच्या काळातील युवा सजग, जागरूक आणि प्रश्न विचारणारा आहे. त्यांच्यात त्यांच्या पालकांसारखा किंवा वडीलधार्यांसारखा धीर, संयम नाही की एखाद्या सुंदर उद्याच्या प्रतीक्षेत आयुष्य घालवण्याची त्यांची तयारी नाही. जनरेशन झेडला वचनांचे, आश्वासनांचे राजकारण नको आहे, त्यांना आज आणि आत्ताच …
Read More » -
14 September
मुख्यमंत्री योगींच्या चित्रपटाचा मार्ग मोकळा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या एकाही दृश्याला कात्री लावण्यात आलेली नाही. सेंसर बोर्डाला वारंवार आदेश देऊनही प्रदर्शन प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. त्यामुळे निर्मात्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने …
Read More » -
14 September
रजनीकांत नावाचं पर्व
रजनीकांत हे नाव केवळ चित्रपटसृष्टीतील एक चमकदार ब्रँड नाही, तर त्यामागे संघर्ष, चिकाटी आणि अस्सल माणूसपणाची कहाणी आहे. त्यांनी पडद्यावरच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थिर स्थान मिळवलेच; पण खर्या आयुष्यातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि नम्रता यामुळे त्यांना जनसामान्यांचा आदर प्राप्त झाला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय केला, आणि आजही त्यांचे नाव केवळ तमिळ सृष्टीपुरते मर्यादित नाही, तर जगभरातील चाहत्यांच्या मनात …
Read More » -
14 September
गर्दीतही करा बिनधास्त कॉलिंग!
सध्याच्या काळात मोबाईलद्वारे कॉलिंग-मेसेजिंग बरोबरच आपण पैसे भरतो, कागदपत्रे पाठवतो, मनोरंजन घेतो आणि महत्त्वाची कामे तत्काळ पार पाडतो. तरीही कॉलिंग म्हणजेच संवाद साधण्यासाठी याचा वापर अधिक प्रमाणात होतो. अनेकदा गर्दीच्या जागी किंवा आवाजाच्या गोंगाटात फोनवर बोलणे हे त्रासदायक ठरते. विशेषतः, सणासुदीच्या काळात बाजारात गर्दीत असताना, गणेश मंडळाचे स्टेरिओ सुरू असताना, मिरवणुकांदरम्यान किंवा रोजच्या आयुष्यात घराबाहेर गर्दीत असताना आजूबाजूच्या गोंगाटामुळे आपला …
Read More » -
14 September
फूड प्रोसेसर स्वच्छ करताना
फूड प्रोसेसर हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा उपकरण आहे. त्याची स्वच्छता केल्यास त्याचे आयुष्य वाढते आणि अन्न सुरक्षित राहते. खालील टिप्स फूड प्रोसेसर स्वच्छ करण्यास मदत करतील. प्रत्येक वापरानंतर स्वच्छ करा ः फूड प्रोसेसर वापरल्यानंतर लगेच स्वच्छ केल्यास अन्नाच्या होणारा डाग, दुर्गंधी टाळता येते. भाग वेगळे करून धुवा ः फूड प्रोसेसरचे ब्लेड, झाकण, बाऊल आणि इतर सुटे भाग वेगळे करा. यानंतर गरम …
Read More » -
14 September
‘या’ लोकांनी पिऊ नये नारळपाणी
नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. हे प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. व्यायामानंतर नारळ पाणी प्यायल्याने स्नायूंना खूप आराम मिळतो. हे सर्व आहेत नारळाच्या पाण्याचे फायदे पण तुम्हाला माहीत आहे का की, ते पिण्याचे फायदे तर आहेतच पण काही गंभीर तोटे देखील होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, काही …
Read More » -
14 September
संगणकविश्वातील ‘बग’ शोधणारी जननी
ग्रेस हॉपर या अमेरिकन संगणकतज्ज्ञ आणि नौदलातील अधिकारी होत्या. आज आपण कंप्यूटर प्रोग्रामिंग ही जी गोष्ट सहज मानतो, त्याचा पाया घालण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्याशी निगडित एक आगळावेगळा प्रसंग संगणक क्षेत्रातील संज्ञाचक्र बदलून गेला. १९४७ साली हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात मार्क-२ नावाचा एक भला मोठा संगणक वापरात होता. हा संगणक खोलीभर जागा व्यापून बसलेला, हजारो व्हॅयूम ट्यूब्सनी चालणारा …
Read More » -
14 September
अधिकारी संवेदनशील का नसतात?
कोणत्याही बांधकाम स्थळी सुरक्षेची खात्री करणे ही सर्वात मूलभूत जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात तिथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचारी या जबाबदारीबाबत सजग आणि संवेदनशील का नसतात, हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला उघडे ठेवलेले गटार, खड्डे किंवा मॅनहोल यात जर एखादा व्यक्ती चुकून पडला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात असे खड्डे वा गटार पाण्याने भरून जातात आणि त्यांचा …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







