लेख-समिक्षण

पोलिओग्रस्त मुलगी ते यशस्वी उद्योजिका

संकटे माणसाला संपवायला येतात की नवी उभारी द्यायला, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते आणि हेच पाटण्याच्या ममता भारती यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओने शरीराची साथ सोडली आणि संपूर्ण शरीर जवळपास अर्धांगवायूने ग्रासले गेले, मात्र मनाची उभारी तसूभरही कमी झाली नव्हती. पाटण्यातील अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही जेव्हा डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा …

Read More »

सावळागोंधळ

महापालिका निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर करेपर्यंत जो ओंगाळवाणा प्रकार पाहायला मिळाला त्यातून राजकारण या प्रकाराविषयीच लोकांच्या मनात तिटकारा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे. कोणाचाही कोणाला पायपोस नाही अशीच स्थिती सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर 15 तारखेला मतदानाला जाताना मतदारांचीच आता कसोटी लागणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अगदी आयत्या वेळेला या पक्षातून त्या पक्षात …

Read More »

हुंडाबंदी कायद्यांबाबत आत्मचिंतनाची गरज

उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध अजमल बेग या प्रकरणात नुकत्याच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 498-अ आणि 304-ब तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 च्या कलम 2/4 अंतर्गत प्रतिवाद्यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार केला. यावेळी न्यायालयाने नमूद केले की, हुंड्याची व्यापक समस्या, संबंधित कायद्यांची अप्रभावकता आणि कलम 498-अ व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा …

Read More »

मतदानापूर्वीच भाजपचे सहा उमेदवार अविरोध

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतमोजणी होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले आहे. मनपा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच कल्याण-डोंबिवली मनपात तीन उमेदवार व धुळेमध्ये दोन आणि पनवेल मनपात एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 29 महापालिकांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळत आहेत. अशातच भाजपाला …

Read More »

उत्तीर्णांच्या गर्दीमागचा अंधार

केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये देशभरातून सुमारे 50 लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, असे समोर आले आहे. यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग‌’ च्या माध्यमातून त्यांना संजीवनी देण्याची योजना सरकारने आखली आहे. परंतु इतक्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण का होतात? गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील शाळा-महाविद्यालयांच्या …

Read More »

ताम्रधातूची लकाकी कशामुळे?

जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या एका वर्षात सोन्याने 70 ते 80 टक्के परतावा दिला असताना चांदीने तर 140 टक्क्यांच्या आसपास झेप घेत सर्वांनाच चकित केले आहे. मात्र, आता या शर्यतीत ‌‘तांबे‌’ अर्थात कॉपरनेही आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून तांब्याचे दर अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. केवळ औद्योगिक वापरासाठी मर्यादित न राहता …

Read More »

इमरानचं ‌‘पुनरागमन‌’

बॉलीवूडचा ‌’सिरीयल किसर‌’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मीने आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गंभीर दुखापत आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच इमरान ‌’आवारापन 2‌’च्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला असून, सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे काम जोमाने सुरू आहे. ॲक्शन सीनदरम्यान झाली होती दुखापत मिळालेल्या माहितीनुसार, ‌’आवारापन 2‌’ मधील एका हाय-ऑक्टेन ॲक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना इमरानच्या …

Read More »

‌‘धुरंधर‌’ची घोडदौड कशामुळे?

रणवीर सिंगसह सहकलाकारांचा दमदार अभिनय, आदित्य धरचे कसलेले दिग्दर्शन आणि ऐतिहासिक घटनांची गुंतलेली गुंफण यांमुळे ‌‘धुरंधर‌’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. ‌‘धुरंधर‌’ ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाची नांदी आहे. आशयघन मांडणीला तांत्रिक भव्यतेची जोड मिळते, तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडीत निघतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. राष्ट्रवाद, इतिहास आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असल्याने हा …

Read More »

टेस्ट युवर ॲबिलिटीज

कोणत्याही क्षेत्रात काही करून दाखवायचं असेल तर त्यात आपला कस लावावा लागतो. आजकाल आयटी क्षेत्राची धूम आहे खरी पण त्यातही फक्त प्रोग्रॅमिंगला महत्व दिलं जातं पण तयार केलेले प्रोग्रॅम नीट सुरू राहतील की नाही याची काळजी करणारंही कोणीतरी लागतं. थोडक्यात तयार सॉफ्यवेअरला टेस्ट करायलाही तेवढंच डोकं लागतं काय? म्हणूनच आजकाल सॉफ्टवेअर टेस्टिंगलाही फार महत्व प्राप्त झालं आहे. बरं यासाठी तुम्हाला …

Read More »

सौंदर्यासाठी पेप्टाईडस्‌‍चे महत्त्व

दररोज नवनवीन स्किनकेअर घटकांची माहिती आपल्याला मिळत असते. गंमत म्हणजे प्रत्येक घटक त्वचेसाठी लाभदायक असल्याचे सांगितले जाते. यापैकी पेप्टाइडस्‌‍ हे खरोखरच आपल्या त्वचेसाठी आवश्यक आणि उपकारक असतात. काही वेळा या पेप्टाइडस्‌‍सह वापरले जाणारे इतर घटक भ्रामक असू शकतात, पण पेप्टाईडस्‌‍ स्वतः फायदेशीर असतात. पेप्टाइडस्‌‍ हे लहान प्रथिनांचे संयुग असून ते अमीनो आम्लांपासून बनलेले असतात. अमीनो आम्ल हे प्रथिनांचे मूलभूत घटक …

Read More »