लेख-समिक्षण

विशेष

अमेरिकेचा भारतावर ‘टॅरिफ बाँब’

अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाक्तया उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. बुधवारी त्यांनी ‘ट्रुथ’ या सोशल प्लॅटफफॉर्मवर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, …

Read More »

‘फेक नॅरेटिव्ह’ ला चपराक

मालेगावच्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल नुकताच लागला असून राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने (एनआयए) या खटल्यातील सर्व सातही आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी घडलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणाचा निकाल १७ वर्षांनी येणे हे आपल्या न्यायप्रणालीचे अपयशच असून अशा प्रकारे इतक्या वर्षांनी आरोपी निर्दोष असल्याचे समोर येत असेल तर ती बाब अधिक गंभीर आहे. पण या निकालामध्ये सर्व …

Read More »

मुंबई बॉम्बस्फोट निकालाला आव्हान

२००६ मध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर ११ मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २०९ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणात १९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी ऐतिहासिक निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यातील १२ आरोपींपैकी एकाचा आधीच मृत्यू झालेला …

Read More »

उपराष्ट्रपतींचे वादपुराण

जगदीप धनखड यांनी अचानकपणे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व कामकाज सुरळीत पार पडत असताना सायंकाळी अचानक त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला? हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या रुपातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकिर हुसेन, गोपाल स्वरुप पाठक, आर. वेंकटरमन, शंकरदयाळ शर्मा, डॉ. के. आर. नारायणन, कृष्णकांत, …

Read More »

एआयच्या मदतीने शिक्षणक्रांती

प्राचीन काळापासून शिक्षणाचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे हा नव्हता, तर त्यांना आयुष्यातील विविध पैलूंसाठी तयार करणे देखील होता. तो साध्य होण्यासाठी शिक्षण प्रणाली लवचिक, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक पातळीवर लक्ष देणारी असावी. एआयच्या मदतीने हे उद्दिष्ट आता अधिक सोपे झाले आहे. तथापि, शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांचीभूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि राहणार आहे, कारण एआयकडे मानवी समज आणि भावना नसतात. …

Read More »

अंतराळवीर शुभांशू शुला पृथ्वीवर परतले

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुला आपल्या ऐतिहासिक अंतराळ यात्रेनंतर मंगळवारी दुपारी पृथ्वीवर परतले आहेत. देशाच्या या यशस्वी सुपुत्राचे स्वागत करण्यासाठी १४० कोटी भारतीय डोळे लावून बसले होते. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनार्‍यावर उतरले आहे. शुभांशू हे सुमारे १८ दिवस अवकाशात होते, या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले. शुभांशू शुला हे २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन ९ …

Read More »

दुर्गरत्नांवर जागतिक मोहोर

मराठेशाहीच्या समृद्ध आणि जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरीक रणनीतीचे, दूरदृष्टीचे आणि तत्कालीन अतुलनीय स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक इतिहासकारांनी या भुईकोटांविषयी, जलदुर्गांविषयी समृद्ध लेखन केले आहे. परंतु त्याचा आधार घेत दुर्गपर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न फारशा प्रभावीपणाने झाले नाहीत. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या …

Read More »

रोजगाराची चिंता आणि निधीची मर्यादा

भारतासारख्या प्रचंड मनुष्यबळ असलेल्या देशात रोजगार हा कळीचा मुद्दा आहे. शहर आणि ग्रामीण भागात राहणार्‍या स्थानिकांना रोजगार मिळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याने प्रसंगी कामासाठी स्थलांतर करण्याचीही वेळ काहींवर येते. पण स्थलांतर रोखणारी केंद्र सरकारची मनरेगा योजना अतिशय उपयुक्त असून कोरोना काळात या योजनेने ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र योजनेवरचा वाढता खर्च पाहता केंद्र सरकारने खर्चाची मर्यादा आखून दिली. अशा वेळी रोजगाराची …

Read More »

अर्बन नक्षलवर प्रहार

काही सुधारणांसह महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे विधेयक मांडले. १२ हजार ५०० सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून सुधारित स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे सरकारला कडव्या विचारसरणीच्या संघटनांवर कठोर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, …

Read More »

निसर्गबदलांपुढे तंत्रज्ञान थिटे

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांच्या झळांनी आज मानवी जीवनापुढे केवळ संकटांची मालिकाच उभी राहिलेली नाहीये, तर मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र हवामानातील बदलर टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानात यथावकाश प्रगती होत …

Read More »