भारताच्या सर्वच प्रांतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरे होतात. भारतीय संस्कृतीने पुरुष देवता असतानाही शक्ती देवता म्हणून स्त्री देवतेला उभे करुन महिषासुरासारखा बलदंड राक्षस तिच्या हातून वध करवून घेतला. तिचा हा मोठा पराक्रम सांगण्यासाठी मोठी परंपरा निर्माण झाली. असुरी शक्ती जेव्हा दैवी शक्तीविरुद्ध युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरी …
Read More »विशेष
प्रस्थापितांसाठी इशारा
नेपाळपासून श्रीलंका आणि इराणपासून म्यानमार आणि फ्रान्सपर्यंत सर्वत्र जनतेच्या असंतोषाच्या मुळाशी दैनंदिन संघर्षमय जीवन आहे. जगाची मोठी लोकसंख्या ही युवा आहे आणि आजच्या काळातील युवा सजग, जागरूक आणि प्रश्न विचारणारा आहे. त्यांच्यात त्यांच्या पालकांसारखा किंवा वडीलधार्यांसारखा धीर, संयम नाही की एखाद्या सुंदर उद्याच्या प्रतीक्षेत आयुष्य घालवण्याची त्यांची तयारी नाही. जनरेशन झेडला वचनांचे, आश्वासनांचे राजकारण नको आहे, त्यांना आज आणि आत्ताच …
Read More »सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती!
महाष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांची देशाच्या नव्या उपराष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली आहे. संसदेतील निवडणूक प्रक्रियेत त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांना ४५२ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. राधाकृष्णन यांनी त्यांचा १५२ मतांनी पराभव केला. त्यानंतर, त्यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एनडीएचे उमेदवार …
Read More »सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ‘विक्रम-३२’ ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडटर चिप प्रदान करण्यात आली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. परंतु आता सेमीकंडटर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे. आजची दुनिया एका प्रचंड तांत्रिक क्रांतीच्या …
Read More »नेपाळमधील अराजकाच्या मुळाशी
भारताचा शेजारी देश असणारा नेपाळ हा गेल्या जवळपास दशकभरापासून अस्थिरता-अस्वस्थता आणि अशांतता यांच्या मगरमिठीत सापडला आहे. राजेशाही व्यवस्थेचा त्याग करुन नेपाळने लोकशाहीची कास धरली खरी; पण दहा वर्षेउलटूनही तेथे लोकशाही व्यवस्था खर्या अर्थाने नावारुपाला आलीच नाही. सुरुवातीला राज्यघटना निर्मितीसाठी प्रचंड खल झाला. त्यानंतर राजकीय अस्थिरतेचे ग्रहण नेपाळला लागले ते कायमचेच. आज नेपाळ राजकीय आणि सामाजिक संकटाच्या नव्या वळणावर पोहोचला आहे. …
Read More »मराठ्यांना आरक्षण, ओबीसींना उपसमिती
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. यानंतर बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही एका उपसमितीची स्थापना करण्यात आली. या उपसमितीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या उपसमितीमध्ये सहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून ही समिती ओबीसी समाजच्या प्रश्नांसंदर्भात उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहे. महसूलमंत्री …
Read More »करुया स्वदेशीचा जागर
रशिया-युक्रेन संघर्ष, हमास-इस्राईल संघर्ष, ट्रम्प यांचे शुल्क धोरण आणि चीनच्या भूमिकेवरून वाटणारी अनिश्चितता पाहता भारताने आता स्वदेशी धोरणावर व्यापक विचार करायला हवा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार्या भारताने आता स्वदेशीची मात्रा बहुतांश क्षेत्रावर लागू करावी, जेणेकरून देशहित साधले जाईलच, त्याचवेळी जगाला पर्यायी देशही मिळेल. आतापर्यतची भारताची प्रतिमा आणि भूमिका पाहता वसुधैव कुटुम्बकम अशीच राहिली असून ती जागतिक बाजारातील …
Read More »वेध ‘समुद्रयान मिशन’चा
भारतीय अवकाश संशोधनाने जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान, मंगळयान आणि गगनयानासारख्या प्रकल्पांमुळे भारत आज अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अव्वल ठरला आहे. पण आता केवळ आकाशच नव्हे तर अथांग महासागराकडेही भारताचे लक्ष वेधले गेले आहे. ‘समुद्रयान मिशन’ही त्या दृष्टीने भारताची एक धाडसी झेप आहे. ६००० मीटर खोलीपर्यंत मानवाला समुद्राच्या तळाशी नेणारा हा प्रकल्प केवळ वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित नाही, तर देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्था, …
Read More »लाडया बाप्पांचे आगमन
राज्यात बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाचा पहिला दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला असून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात लाडया बाप्पांचे आगमन ठिकठिकाणी झाले. त्यानिमित्ताने घराघरांत तसेच विविध गणेश मंडळांत उत्साह ओसंडून वाहतो आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, असा गजर करीत मानाच्या गणपतींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. वाजत-गाजत गणरायांच्या आगमनाने भाविक भक्तिभावात न्हाऊन निघाले आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमधील संती गणपतीची सकाळी …
Read More »राहुल-तेजस्वींची यात्रा फलदायी ठरेल?
बिहारमध्ये येणार्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकांची पूर्वतयारी सध्या जोमाने सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बिहारी जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काँग्रेस पक्षाने गेल्या काही वर्षांत बिहारमधील जनाधार मोठ्या प्रमाणावर गमावला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी आणि ‘इंडिया’ आघाडीला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत ‘मतदार अधिकार यात्रे’स …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र