बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. याचे कारण ममताबाईंनी अचानक संन्यास पत्करण्याचा निर्णय घेतला असून महाकुंभात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले आहे. ही घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ममताबाईंची एकूण कारिकर्द पाहिल्यास अभिनयापेक्षा तिच्या अंडरवर्ल्डशी असणार्या संबंधांची चर्चा अधिक झाली. छोटा राजनसोबतच्या तिच्या संबंधांचे गूढ कायम राहिले असले तरी ड्रग्जच्या जगात नंबर वन खेळाडू म्हणून ओळखल्या …
Read More »सिने समिक्षण
प्रेक्षक, थिएटर…सारं बदललं!
सिनेमनोरंजनाचा खरा आनंद 70 आणि 80 च्या दशकात सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांनी घेतला. तेव्हा पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्याचा जो जोश होता, त्याची आज कल्पनाही करता येणार नाही. शोच्या दोन तास आधी तिकीट खिडकीवर लागणारी भली मोठी रांग, तिकीट काढण्यासाठीची धडपड, प्रसंगी वादावादी-हाणामारी, ब्लॅकने होणारी तिकिट विक्री, हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीची धडपड या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. मल्टिप्लेक्सने …
Read More »हृदयाचा ठाव घेणार्या चित्रपटांची प्रतीक्षा
अॅनिमल, पुष्पा पहिला आणि दुसरा यासारखे चित्रपट पाहताना डोकं गरगरल्याशिवाय राहत नाही. तरुणाईचे काही प्रमाणात मनोरंजन होत असलेही, परंतु आपण कशासाठी जातो आणि बाहेर काय घेऊन पडलो, याचा थांगपत्ता लागत नाही. हाऊसफुल्लचे बोर्ड काही दिवसापुरती असतात आणि नंतर चॅनेलवर झळकत त्या चित्रपटाती इतिश्री होते. कोठे गेला धर्मेंद्र यांचा दमदार अभिनय, कोठे गेला तो अँग्री यंग मॅनवाला अमिताभ आणि कोठे गेली …
Read More »बॉलिवूडच्या मानगुटीवर ‘डिजिटल लीक’चे वेताळ
सिध्याच्या इंटरनेटयुगात डाटा चोरीला उधाण आले आहे. सिनेसृष्टीही त्यापासून दूर राहिलेली नाहीये. ‘डिजिटल लीकेज’ ही समस्या बॉलीवूडच नव्हे तर जगभरातील सर्वच चित्रपट उद्योगांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एखादा चित्रपट किंवा वेब मालिका लीक झाल्यास टॉकीज सोडा ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. त्याचवेळी लीक म्हणजे फुटलेला चित्रपट आवडला नाही तर त्याबाबत प्रेक्षकांचे नकारात्मक मत तयार होते. म्हणजेच या फुटीचा कळत नकळतपणे …
Read More »नव्या वर्षांत नवा धडाका
नव्या वर्षात धमाकेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर साकारलेला ‘छावा’ चित्रपटापासून ते कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’, भूत बंगला, लाहोर-1947 सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतून प्रेक्षकांना ऐतिहासिक कलाकृती तसेच अॅक्शन थ्रिलर, कॉमेडी आणि सिक्वेलही पाहवयास मिळणार आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मावळत्या …
Read More »चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी …
Read More »लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवले. यामध्ये शोमन राज कपूर यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा आणि दूरदृष्टीचा, संवेदनशीलतेचा ठसा उमटवणार्या राज यांच्या चित्रपटांनी रसिकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर त्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. आपल्या विलक्षण अभिनयक्षमतेनं आणि उत्कट …
Read More »बालपटांची उपेक्षा
बॉलिवूडच्या आजवरच्या प्रवासामध्ये बालचित्रपटांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. चित्रपटातील नायकांचे बालपण प्रभावीपणे रेखाटले जाते, मात्र एकप्रकारे नायकाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लहान मुलांच्या पात्रांचा उपयोग केला जातो. कृष्णधवलपासून ते आतापर्यंतच्या काळात असंख्य बालचित्रपट येऊन गेले. किंबहुना मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या बाल चित्रपटांनी काहीवेळा यशही मिळवले, परंतु ते मर्यादित राहिले. काहींची गाणी गाजली तर काहींवेळा व्यक्तिरेखा. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. …
Read More »वितंडवादी घराची, सवंग लोकप्रियता
प्रेक्षकांची अभिरुची जसजशी बदलत आहे, तसतसा मनोरंजनाच्या क्षेत्रातील कार्यक्रमांचा दर्जाही ढासळत आहे. 1980 च्या दशकांत दूरचित्रवाणीवर हमलोग, नुक्कड, देख भाई देख, रामायण, महाभारत यासारख्या दर्जेदार मालिकांनी भारतीय समाज मनावर सखोल आणि सकारात्मक परिणाम केला होता. ंयाउलट आताच्या बहुतांश मालिका द्वेषावर किंवा अश्लिलतेचा कळस गाठणार्या आहेत. गेल्या दीड दोन दशकांपासून बिग बॉसने भारतीय दूरचित्रवाणीवर बस्तान मांडले आहे. लोकांच्या घरातील भांडणे टिव्हीवर …
Read More »एका रात्रीत झाले सुपरस्टार…
पहिल्याच नजरेत एखाद्या व्यक्तीतील कलागुण हेरण्याचे कौशल्य सर्वांनाच असते असे नाही. मात्र बॉलिवुड असो किंवा हॉलिवुड या दोन्ही ठिकाणी यशाचे शिखर गाठणारे कलाकार हे दिग्दर्शकांनी किंवा निर्मात्यांनी त्यांना पहिल्याच नजरेत हेरले आहेत. सुभाष घई, यश चोप्रा, सुरज बडजात्या यासारख्या नामवंत दिग्दर्शकांनी अनेक बडया कलाकारांचे अभिनय कौशल्य ओळखून त्यांना आपल्या चित्रपटात ब्रेक दिला आणि ते एका रात्रीत सुपरस्टार झाले. बॉलिवुडचे पहिले …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र