मल्टिप्लेक्स थिएटर्स तिकीटाचे दर आणि शोची वेळ ठरवताना चुकत आहेत, असा सूर अलीकडील काळात सातत्याने उमटत आहेत. त्यांच्या महागड्या तिकिटांमुळे प्रेक्षक सिनेमागृहात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो. तसेच थिएटर चालकांचा छोट्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे. याऐवजी मोठ्या बजेटच्या आणि स्टार कलाकार असलेल्या चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहे वेगळा दृष्टिकोन ठेवताना दिसतात. लहान, स्वतंत्र आणि मध्यम बजेटच्या चित्रपटांना मिळणारा दुजाभाव हा भारतीय …
Read More »सिने समिक्षण
कलाकारांचं दिग्दर्शनप्रेम
दिग्दर्शन ही एक सर्जनशील आणि जबाबदारीची कला आहे. उत्कृष्ट अभिनय करणारा प्रत्येक कलाकार चांगला दिग्दर्शक होईल असे नाही. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत वेळोवेळी अनेक अभिनेत्यांनी दिग्दर्शनातही आपले नशीब आजमावले आहे. काहींना यश मिळाले, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. ही परंपरा बॉलिवूडच्या सुरुवातीपासूनच सुरू आहे. आजच्या घडीला अजय देवगण, नंदिता दास, हेमा मालिनी, नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर आणि पूजा भट्ट यांसारख्या …
Read More »महान नायकाचा विराम
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आणि खास करुन युद्धाच्या काळात आलेल्या देशभक्तीपर चित्रपटांच्या लाटेचे प्रमुख नायक म्हणून मनोज कुमार यांनी अग्रस्थान पटकावले. त्यांच्या चित्रपटांनी समाजातील विविध समस्यांचे, विशेषत: देशभक्ती आणि संघर्षाचे मुद्दे उठवले. पूरब और पश्चिम, रोटी, कपड़ा और मकान आणि क्रांति यासारख्या चित्रपटांतून त्यांनी …
Read More »प्रतीक्षा संगीतप्रधान चित्रपटांची
भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत यांचे नाते अतूट आहे. सुरुवातीपासूनच भारतीय सिनेमांमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. आजही चांगल्या चाली, हृदयस्पर्शी गीते आणि भावनिक सादरीकरण असलेले संगीतप्रधान चित्रपट प्रेक्षकांना भावतात. मात्र, अलीकडच्या काळात असे चित्रपट कमी होत चालले आहेत. याचे एक कारण म्हणजे रोमँटिक चित्रपटांची कमतरता, ज्यामध्ये प्रसंगानुरूप उत्कृष्ट सूररचना होते. त्याचबरोबर, आता दिग्दर्शकांमध्ये संयमाची कमतरताही जाणवते. मधुर संगीताचा तो सोन्याचा …
Read More »नायकांचा विवाहमहिमा
बॉलिवूडमध्ये प्रेम आणि नाती नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. काही नाती दीर्घकाळ टिकतात, तर काहींमध्ये दुरावा निर्माण होतो. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या आयुष्यात एकाहून अधिक वेळा विवाह केले आहेत. काहींनी प्रेमासाठी, काहींनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांमुळे, तर काहींनी आयुष्याला नवा सुरुवात देण्यासाठी दुसर्या लग्नाचा निर्णय घेतला आहे. सध्या बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्या आमीर खान याच्या नव्या प्रेमाची चर्चा सुरू …
Read More »जाने कहाँ गये वो दिन…
प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से यह दिल डरता है क्यू… हे गीत ऐकताना मुसळधार पावसात एकाच छत्रीखाली असलेले राजकपूर आणि नर्गिस यांची जोडी डोळ्यासमोर येते. प्रामुख्याने बॉलिवुडपटात आतापर्यंत प्रेमावर आधारलेली गाणी, कथानक हे हिटचा फॉर्म्युला राहिले आहे. राजकपूरपासून रणबीरकपूरपर्यंत आणि नर्गिसपासून दीपिका पदुकोनपर्यंतच्या कलाकारांनी प्रेक्षकांसमोर प्रेमाचे अनोखे रंग दाखवून छाप पाडली आणि त्याल प्रोत्साहित केले. पण आता हे …
Read More »एकतर्फी प्रेमाची रुपेरी गोष्ट
सुरुवातीच्या काळापासूनच पटकथेत प्रेमकथेवर भर दिला गेला. पटकथा कोणतिही असो, यात प्रेमाचा विषय राहिला आहे. एवढेच नाही तर युद्धकथा असो किंवा दरोडेखोरांचा थरार असो यासारख्या चित्रपटातही प्रेम फुलताना दाखविले आहे. दिग्दर्शकाने तो तात्पुरताच नाही तर शेवटपर्यंत टिकवला आहे. पटकथेचा मुळ गाभा असलेल्या प्रेमकथेत प्रेम अणि प्रेमिकेची मध्यवर्ती भूमिका असते तेव्हा अशा कथानकात फारसे अडथळे नसतात. मात्र एकतर्फी प्रेम असेल तर …
Read More »सुरेलपणा मागे, ग्लॅमरसता पुढे
सार्वजनिक कार्यक्रमात गायक किंवा गायिकांनी नटून थटून गाणे म्हणणे ठीक आहे. परंतु केवळ प्रेक्षकांवर छाप पाडण्याच्या प्रवृत्तीने गायकांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या काळात नवोदित गायक किंवा गायिका या आवाजापेक्षा ग्लॅमरसतेमुळे अधिक चर्चेत राहताना दिसतात. याउलट जुन्या जमान्यातील गायक आणि गायिकांचा भर साधेपणावर असायचा आणि त्यांचे सर्व लक्ष मेहनतीकडे, सरावाकडे असायचे.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तर या चर्चेपासून खूपच …
Read More »त्रिवेणी संगमावर तारकांची मांदियाळी
प्रयागराज येथील ऐतिहासिक महाकुंभमेळा शेवटच्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविकांचा ओघ सुरू आहे. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंत आणि सेलिब्रिटी लोक प्रयागराज येथे दाखल होत असून अध्यात्माचा अनुभव घेत आहेत. एरवी पडद्यावर चमकणारे तारकामंडळ संगमतीरावर धार्मिक श्रद्धा आणि भावना जोपासताना दिसत आहे. एकार्थाने धर्म आणि श्रद्धा याचा अनोखा संगम साधत प्रयागराज येथील महाकुंभमेळा भव्यदिव्यतेने …
Read More »देवीयों और सज्जनो…
भरपूर मसाला असणार्या कौटुंबिक कथानकांवर आणि पौराणिक साहित्यावर आधारीत मालिकांनी प्रदीर्घ काळ छोट्या पडद्यावर राहण्याचा विक्रम केल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु सलग अडीच दशकं टिव्हीवर चालणारा ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा कदाचित एकमेव गेम शो असावा. एखादी मालिका टिव्हीवर सुरू असेपर्यंतच ती प्रेक्षकांच्या ध्यानात राहते. पण केबीसी याला अपवाद ठरले. वर्षांत दोन ते अडीच महिने या कार्यक्रमाचे प्रसारण होते …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र