सुरुवातीच्या काळापासूनच पटकथेत प्रेमकथेवर भर दिला गेला. पटकथा कोणतिही असो, यात प्रेमाचा विषय राहिला आहे. एवढेच नाही तर युद्धकथा असो किंवा दरोडेखोरांचा थरार असो यासारख्या चित्रपटातही प्रेम फुलताना दाखविले आहे. दिग्दर्शकाने तो तात्पुरताच नाही तर शेवटपर्यंत टिकवला आहे. पटकथेचा मुळ गाभा असलेल्या प्रेमकथेत प्रेम अणि प्रेमिकेची मध्यवर्ती भूमिका असते तेव्हा अशा कथानकात फारसे अडथळे नसतात. मात्र एकतर्फी प्रेम असेल तर …
Read More »सिने समिक्षण
सुरेलपणा मागे, ग्लॅमरसता पुढे
सार्वजनिक कार्यक्रमात गायक किंवा गायिकांनी नटून थटून गाणे म्हणणे ठीक आहे. परंतु केवळ प्रेक्षकांवर छाप पाडण्याच्या प्रवृत्तीने गायकांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या काळात नवोदित गायक किंवा गायिका या आवाजापेक्षा ग्लॅमरसतेमुळे अधिक चर्चेत राहताना दिसतात. याउलट जुन्या जमान्यातील गायक आणि गायिकांचा भर साधेपणावर असायचा आणि त्यांचे सर्व लक्ष मेहनतीकडे, सरावाकडे असायचे.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तर या चर्चेपासून खूपच …
Read More »त्रिवेणी संगमावर तारकांची मांदियाळी
प्रयागराज येथील ऐतिहासिक महाकुंभमेळा शेवटच्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविकांचा ओघ सुरू आहे. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंत आणि सेलिब्रिटी लोक प्रयागराज येथे दाखल होत असून अध्यात्माचा अनुभव घेत आहेत. एरवी पडद्यावर चमकणारे तारकामंडळ संगमतीरावर धार्मिक श्रद्धा आणि भावना जोपासताना दिसत आहे. एकार्थाने धर्म आणि श्रद्धा याचा अनोखा संगम साधत प्रयागराज येथील महाकुंभमेळा भव्यदिव्यतेने …
Read More »देवीयों और सज्जनो…
भरपूर मसाला असणार्या कौटुंबिक कथानकांवर आणि पौराणिक साहित्यावर आधारीत मालिकांनी प्रदीर्घ काळ छोट्या पडद्यावर राहण्याचा विक्रम केल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु सलग अडीच दशकं टिव्हीवर चालणारा ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा कदाचित एकमेव गेम शो असावा. एखादी मालिका टिव्हीवर सुरू असेपर्यंतच ती प्रेक्षकांच्या ध्यानात राहते. पण केबीसी याला अपवाद ठरले. वर्षांत दोन ते अडीच महिने या कार्यक्रमाचे प्रसारण होते …
Read More »ममताबाईंचा संन्यास
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. याचे कारण ममताबाईंनी अचानक संन्यास पत्करण्याचा निर्णय घेतला असून महाकुंभात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले आहे. ही घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ममताबाईंची एकूण कारिकर्द पाहिल्यास अभिनयापेक्षा तिच्या अंडरवर्ल्डशी असणार्या संबंधांची चर्चा अधिक झाली. छोटा राजनसोबतच्या तिच्या संबंधांचे गूढ कायम राहिले असले तरी ड्रग्जच्या जगात नंबर वन खेळाडू म्हणून ओळखल्या …
Read More »प्रेक्षक, थिएटर…सारं बदललं!
सिनेमनोरंजनाचा खरा आनंद 70 आणि 80 च्या दशकात सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांनी घेतला. तेव्हा पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्याचा जो जोश होता, त्याची आज कल्पनाही करता येणार नाही. शोच्या दोन तास आधी तिकीट खिडकीवर लागणारी भली मोठी रांग, तिकीट काढण्यासाठीची धडपड, प्रसंगी वादावादी-हाणामारी, ब्लॅकने होणारी तिकिट विक्री, हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीची धडपड या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. मल्टिप्लेक्सने …
Read More »हृदयाचा ठाव घेणार्या चित्रपटांची प्रतीक्षा
अॅनिमल, पुष्पा पहिला आणि दुसरा यासारखे चित्रपट पाहताना डोकं गरगरल्याशिवाय राहत नाही. तरुणाईचे काही प्रमाणात मनोरंजन होत असलेही, परंतु आपण कशासाठी जातो आणि बाहेर काय घेऊन पडलो, याचा थांगपत्ता लागत नाही. हाऊसफुल्लचे बोर्ड काही दिवसापुरती असतात आणि नंतर चॅनेलवर झळकत त्या चित्रपटाती इतिश्री होते. कोठे गेला धर्मेंद्र यांचा दमदार अभिनय, कोठे गेला तो अँग्री यंग मॅनवाला अमिताभ आणि कोठे गेली …
Read More »बॉलिवूडच्या मानगुटीवर ‘डिजिटल लीक’चे वेताळ
सिध्याच्या इंटरनेटयुगात डाटा चोरीला उधाण आले आहे. सिनेसृष्टीही त्यापासून दूर राहिलेली नाहीये. ‘डिजिटल लीकेज’ ही समस्या बॉलीवूडच नव्हे तर जगभरातील सर्वच चित्रपट उद्योगांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एखादा चित्रपट किंवा वेब मालिका लीक झाल्यास टॉकीज सोडा ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. त्याचवेळी लीक म्हणजे फुटलेला चित्रपट आवडला नाही तर त्याबाबत प्रेक्षकांचे नकारात्मक मत तयार होते. म्हणजेच या फुटीचा कळत नकळतपणे …
Read More »नव्या वर्षांत नवा धडाका
नव्या वर्षात धमाकेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर साकारलेला ‘छावा’ चित्रपटापासून ते कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’, भूत बंगला, लाहोर-1947 सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतून प्रेक्षकांना ऐतिहासिक कलाकृती तसेच अॅक्शन थ्रिलर, कॉमेडी आणि सिक्वेलही पाहवयास मिळणार आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मावळत्या …
Read More »चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र