लेख-समिक्षण

घरकुल

पहिल्या पगारातून कायापालटाची कहाणी

तुमचा पहिला पगार 120 मुलांचे आयुष्य बदलू शकतो का? स्नेहा शर्मा यांची ही प्रेरणादायी कथा दाखवून देते की, एक छोटेसे पाऊल किती मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. बेगुसराय येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिका असलेल्या स्नेहा यांनी आपला पहिला पगार स्वतःवर खर्च न करता, मूलभूत शैक्षणिक साहित्याची गरज असलेल्या वंचित मुलांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. स्नेहा यांनी मुलांची पाठशाळा या …

Read More »

हारिका ओडेलाची हृदयस्पर्शी गोष्ट

पालकांसाठी आपल्या मुलांचे यश डोळ्यांनी पाहण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नसतो. असाच एक भावूक क्षण सध्या समाजमाध्यमांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बेंगळुरू येथील ‌’ॲमेझॉन‌’ कार्यालयात कार्यरत असलेल्या हारिका ओडेला हिने नुकतीच आपल्या आई-वडिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी नेले. आपल्या लेकीचे कॉर्पोरेट जगातील यश आणि तिचे कार्यालय पाहून या पालकांच्या चेहऱ्यावर जो अभिमान आणि आनंद झळकला, त्याने इंटरनेटवरील लाखो लोकांची मने …

Read More »

दहावीनंतरचा मार्ग निवडताना…

दहावीचा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचे वळण येते. हा काळ केवळ शालेय शिक्षण संपल्याचा नसून, भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीची पायाभरणी करण्याचा असतो. अनेकदा विद्यार्थी आणि पालक केवळ गुणांच्या आधारावर किंवा मित्रमैत्रिणींच्या प्रभावाखाली यूेन शाखेची निवड करतात, परंतु ही पद्धत भविष्यात अडचणीची ठरू शकते. त्यामुळे दहावीनंतरचा मार्ग निवडताना अत्यंत सजग राहणे आणि सर्व उपलब्ध पर्यायांचा सखोल विचार करणे आवश्यक …

Read More »

सौंदर्याचा सुवर्णकाळ आणि विज्ञानाचे निकष

माणूस नेमका कोणत्या वयात सर्वाधिक सुंदर दिसतो, विशीतले भरले तारुण्य अधिक आकर्षक असते की तिशीतली प्रगल्भता, हा प्रश्न पिढ्यानपिढ्या चर्चिला जात आहे. अनेकांना असे वाटते की विशीतील वय हे सौंदर्याचे शिखर आहे, मात्र त्वचातज्ज्ञांनी आता यावर विज्ञानाच्या आधारे एक वेगळाच प्रकाश टाकला आहे. वाढत्या वयासोबत व्यक्ती अधिक सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण कशी दिसू शकते, याचे गुपित उलगडताना तज्ज्ञ सांगतात की, विशीपेक्षाही …

Read More »

थांग समुद्रातील उज्ज्वल संधी

बारावीची परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी पारंपरिक वाटा सोडून काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक करिअर करण्याच्या शोधात असतात. अशा धाडसी तरुणांसाठी मर्चंट नेव्ही हे एक अतिशय आकर्षक क्षेत्र आहे. मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी जहाजांचा ताफा, जो जगभरात मालाची ने-आण करतो. हे क्षेत्र भारतीय नौदलापेक्षा पूर्णपणे वेगळे असून ते व्यावसायिक स्वरूपाचे आहे. साहसी प्रवास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि उच्च पगाराची नोकरी हवी असेल, …

Read More »

करा मनाची मशागत

अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवात गजर, कामाची घाई आणि अपूर्ण विचारांच्या गोंधळात होते. मात्र, सकाळी उठल्यानंतरची पहिली 15 मिनिटे तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता ठरवतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी ज्याप्रमाणे चुकीचा आहार घेतल्यास पचन बिघडते, त्याचप्रमाणे उठल्या उठल्या मनात चुकीचे विचार किंवा स्वतःबद्दलची टीका भरली तर दिवसभराचा मानसिक समतोल ढळू शकतो. सकारात्मक सकाळ ही केवळ प्रेरणा …

Read More »

सुट्टी ‌‘फलदायी‌’ ठरण्यासाठी…

दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे. परीक्षांचे दिव्य पार पाडल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने संभ्रमाचा आणि दुसऱ्या अर्थाने संधीचा असतो. अनेकदा परीक्षा संपली की आता फक्त मौजमजा करायची, असा विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र, स्पर्धात्मक युगाचा विचार करता या सुट्ट्यांचा काळ केवळ विश्र्ांतीसाठी न वापरता तो फलदायी कसा ठरेल, याकडे लक्ष …

Read More »

जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?

बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू बाळाचा हा रंग बदलू लागतो आणि ते सावळे दिसू लागते. अशा वेळी नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या टोकण्यामुळे पालकांच्या मनात धडकी भरते. बाळ ‌’गोरे‌’ व्हावे यासाठी मग हळद, चंदन किंवा गव्हाच्या पिठाचे उटणे लावण्यासारखे प्रयोग केले जातात. मात्र, यामुळे बाळाची नाजूक त्वचा अधिक कोरडी आणि काळवंडलेली होऊ …

Read More »

टॅबलेट खरेदी करताना टेक्निकल गोष्टी कोणत्या पाहायच्या?

प्रगत तंत्रज्ञान युगात टॅबलेट खरेदी करणे म्हणजे केवळ स्क्रीनचा आकार किंवा रॅम तपासणे उरलेले नाही. आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत हार्डवेअर यांच्यातील सीमा धूसर होत आहेत. जर तुम्ही नवीन टॅब घेण्याचा विचार करत असाल, तर काही अशा तांत्रिक बाबी आहेत ज्या सामान्यतः दुकानात सांगितल्या जात नाहीत, पण त्या तुमच्या भविष्यातील वापरासाठी अत्यंत कळीच्या ठरतात. सर्वात …

Read More »

डोळ्यांचा मेकअप करताना…

मेकअप हा चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारा भाग मानला जातो, परंतु अनेकदा मेकअप करताना केलेल्या चुका आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेषतः डोळ्यांच्या मेकअपमध्ये झालेल्या चुका गंभीर परिणाम घडवू शकतात. यामुळे त्याचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. डोळ्यांत जळजळ होणे, डोळे लालसर होणे, पाणी येणे, पापण्यांच्या मुळाशी कामट्या साचणे, आयलाइनर लावताच पाणी येणे किंवा आयशॅडोचे कण डोळ्यांत जाणे या समस्या चुकीच्या …

Read More »