कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश दूर नसते, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुलीने विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवालवाडी हे गाव. या गावात अर्जुन चिखले आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्यांकडे फक्त 30 …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे अभ्यासाचं कारण असतं. कधीतरी घराबाहेर असलेल्या छोट्या-मोठ्या धोक्यांचं निमित्त असतं. कधी पाऊस तर कधी कडाक्याचं ऊन पडलेलं असतं. मुलांचं आरोग्य बिघडेल, अशी काळजी आईवडिलांना वाटत असते. नैसर्गिक धोक्यांबरोबरच मानवनिर्मित धोकेही असतात. या व्यतिरिक्तही कारणं असू शकतात. परंतु पोरांना ‘खेळू नका’ म्हणण्याचं एक अजब कारण पुढे …
Read More »वार्धक्य रोखायचंय?
वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …
Read More »समर्पितपणाची यशोगाथा
भारताचा निष्णात फिरकीपटू आर. अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे अश्विनने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी करायचा. आर अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईच्या दक्षिणेस असलेल्या मैलापूर शहरात झाला. त्याचे वडील रविचंद्रन हे क्लब क्रिकेटर होते …
Read More »अदृश्य धोका
त्रासदायक, दुःखद, भयावह घटना लवकरात लवकर विसरून जाण्याची आणि सुखद घटना दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची नैसर्गिक शक्ती आपल्याला मिळाली आहे. अतोनात नुकसान करणार्या आणि दीर्घकालीन प्रभाव असणार्या गोष्टीही काळाच्या ओघात आपण विसरून जातो. कारण अशा घटन घडल्या म्हणून आयुष्य थांबत नसतं. त्या घटना विसरून नव्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. सुखद घटना आपल्याला त्यासाठी शक्ती देतात, म्हणून आपण त्या आपल्या स्मृतीत जपतो. …
Read More »कोलेस्टेरॉलमुळे कर्करोग?
कोलेस्टेरॉलमुळे केवळ हृदयविकाराचाच धोका संभवतो असे नाही. मानवी शरीरातील कोलेस्टेरॉलच्या उपउत्पादनामुळे एस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांची वाढ होते व परिणामी अनेक प्रकारचे स्तनांचे कर्करोग यामुळे होतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. डुक कर्करोग संस्थेच्या वैज्ञानिकांना असे दिसून आले की, स्टॅटिनसारखी कोलेस्टेरॉल प्रतिबंधक औषधे एस्ट्रोजेनच्या रेणूंचा परिणाम नष्ट करतात. या अभ्यासाने प्रथमच कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण व विशेषत: रजोनिवृत्तीनंतर स्तनांचा कर्करोग यांचा संबंध जोडला …
Read More »यशोगाथा जगज्जेत्याची
डी. गुकेश या तरुण, तडफदार बुद्धीबळपटूने जागतिक अजिंक्यपद मिळवण्याचा महाविक्रम नुकताच नोंदवला. यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही जगज्जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली आणि 11 वर्षांनंतर …
Read More »करुन पाहू!
ज्ञानादी विषय प्रात्यक्षिकातून शिकावे लागतात. प्रयोग करावे लागतात आणि शाळापातळीपासूनच त्यासाठी प्रयोगशाळा असतात. अनेक शाळांमध्ये आजही प्रयोगशाळा नाहीत, हा भाग वेगळा. रसायनशास्त्रातलं एखादं संयुग किंवा भौतिकशास्त्रातलं एखादं सूत्र समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. भाषा विषय, इतिहास आदी विषयांच्या अभ्यासासाठी प्रयोग करून पाहण्याची गरज नसते. भूगोलातील काही भाग प्रयोगशील असतो आणि ऐतिहासिक स्थळी सहली काढून इतिहास अधिक …
Read More »माणूस निर्णय कसा घेतो?
माणसाची बुद्धी ही निश्चयात्मिका असते. याचा अर्थ ती निश्चित काय ते ठरवू शकते. ‘छापा की काटा’ या प्रश्नावर आपण काय उत्तर देतो हे मेंदूतील याद़ृच्छिक चढउतारांवर म्हणजेच उद्दिपनांवर अवलंबून असते. जेव्हा दोन सारखेच आकर्षक पर्याय आपल्यापुढे असतात, तेव्हाही याचाच वापर केला जातो, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. माणसाशिवाय अन्यही प्राण्यांमध्ये अशी निर्णयक्षमता असू शकते. न्यूरोइकॉनॉमिक्स या विषयातील या संशोधनात अर्थशास्त्रज्ञांची आंतरद़ृष्टी …
Read More »आदर्श महान उद्योजकाचा
भारतरत्न जेआरडी टाटा यांच्याविषयी आपण बरंच वाचलेलं असतं. त्यांनी एअर इंडियासाठी घेतलेले परिश्रमच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होते. 1932 मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे 1946 मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले. टाटांनी एअर इंडियात विमानांकडे केवळ एक मशीन म्हणून पाहिले नव्हते. तर, त्यांना आपल्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र