लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

फळमाशांचाही मेंदू असतो तल्लख!

मानवाचा मेंदू म्हणजे निसर्गाची सर्वात थक्क करणारी करामत आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावरच जगात आपले सामाज्य बनवलेले आहे. मात्र मानवाशिवायही अनेक जीवांमध्ये त्यांचे जीवनयापन करण्यासाठी योग्य अशी बुद्धी असते. जी फळमाशी फळांना सडवते, तिच्याकडे नसती आफत म्हणून आपण पाहात असलो तरी ती फार चतुर असते व तिचा मेंदूही तल्लख असतो. कुठलीही कृती करण्यापूर्वी फळमाशी विचार करते, असे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी म्हटले आहे. …

Read More »

कल्पनातीत संघर्षातून भरारी

कल्पना सरोज ह्या एक प्रेरणादायी भारतीय उद्योजिका आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितींवर मात करून यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचा जन्म 1961 साली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावात एका मराठी दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. 12 व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईतील झोपडपट्टीत पतीच्या कुटुंबासोबत राहत होत्या. तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा …

Read More »

चर्चेत ‘हंता’

एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. …

Read More »

अबब! 33 कोटींचं पत्र

जक्षाला सापेक्षतावादाचा सिद्धांत देणारे महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी लिहिलेल्या एका पत्राचा नुकताच लिलाव करण्यात आला. या पत्राला तब्बल 33 कोटी रुपये किंमत मिळाली आहे. या पत्रात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी काही वैज्ञानिक इशारे पुन्हा एकदा जगासमोर आणले होते. 1939 साली आईनस्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांना लिहिले होते. यात त्यांनी अणुबॉम्ब आणि त्याचा शस्त्र म्हणून होणारा वापर याबाबत …

Read More »

ओरॅकल काराची यशोकहाणी

ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन हे तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व आहे. पण त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांच्या जन्मानंतर वडील सोडून गेले आणि आईला एकटीला त्यांचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने नऊ महिन्यांचे असताना त्यांना त्यांच्या मावशीने आणि मामा- मामांनी दत्तक घेतले. पण त्यांचे दत्तक वडील कठोर स्वभावाचे होते आणि अनेकदा त्यांना टोचून बोलत. तू आयुष्यात काहीच …

Read More »

तंत्रज्ञान गुद्द्यांवर!

खेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …

Read More »

जितके भूकंप, तितके जमिनीत सोने

सर्वांत विध्वंसक नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंपाचा समावेश होतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे भूकंप होणे अर्थातच कोणालाही नको असते; मात्र याच भूकंपामुळे सोन्याची निर्मिती होते, हे फार कमी जणांना माहिती असेल. शास्त्रज्ञांनी याबाबत मोठा शोध लावला आहे. भूकंपामुळे क्वार्टझ्? (सिलिकॉन डायऑक्साईडपासून तयार झालेलं खनिज) क्वार्ट्झमधून जाणार्‍या फ्रॅक्चर लाइन्समध्ये सोन्याचे गोळे तयार होतात, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. क्वार्टझ् …

Read More »

महान वैज्ञानिकाची प्रेरक यशोगाथा

मायकेल फेराडे यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 रोजी इंग्लंडमधील न्यूग्टिंन बट्स येथे एका गरिब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मायकेल यांना लहान वयातच काम करावे लागले. त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही. दारिद्य्रामुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले. मात्र, ज्ञानाची भूक असणार्‍या फेराडे यांनी पुस्तके वाचून …

Read More »

शिणवठ्याचं चक्र

माणसाचं काम हलकं करण्यासाठी, त्याला अधिक सुख देण्यासाठी मशीन रोज ‘अपडेट’ होत राहिलं. आता तर मशीन माणसासारखंच जगू लागलंय. तरीसुद्धा माणसाला माणसासारखं का जगता येत नाहीये? मशीनचा माणूस होत असताना माणूस मशीनसारखा का होत चाललाय? अनेक माणसांचं काम एकच मशीन करतंय, तर माणसाचं काम डिप्रेशन येण्याइतकं का वाढतंय? त्याच्याकडून कधी आठवड्याला सत्तर तास तर कधी नव्वद तास कामाची अपेक्षा का …

Read More »

वार्धक्य रोखायचंय?

वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …

Read More »