ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणार्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या याचिकेत निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या मेमरी/मायक्रोकंट्रोलरची चाचणी आणि पडताळणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली आहे. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले असून, सध्या ईव्हीएममधून कोणताही डेटा हटवू नका किंवा कोणताही डेटा रि-लोड करू नका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या या …
Read More »TimeLine Layout
February, 2025
-
16 February
पातळीहीनतेचे रणवीर नाट्य
काही दिवसांपूर्वीच प्रसारित झालेल्या एका मालिकेत युटयूबर रणवीर अलाहाबादियाने अतिशय हिन पातळीवर भाष्य करत वाद निर्माण केला आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटले. प्रत्यक्षात दृक श्राव्य माध्यमात आक्षेपार्ह मुद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तरतूदी आहेत. पण सोशल मीडियाने मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविले. सोशल मीडियाचा दुष्परिणाम म्हणजे लोकप्रियता आणि लाइक मिळ्वण्यासाठी पातळी सोडून कंन्टेट तयार केला जात आहे. एवढेच नाही …
Read More » -
16 February
आव्हान विद्यार्थ्यांच्या ‘पानगळी’ चे
काही दिवसांपूर्वी आयआयटी रुरकी येथे बीटेकच्या दुसर्या वर्षात शिकणार्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या संस्थेत गेल्या वर्षभरात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आयआयटी संस्थांत देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशावेळी उच्च शिक्षण देणार्या संस्थांतील विद्यार्थ्यांची आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दशकांत विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षात तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर …
Read More » -
9 February
‘अडीच दशकांनी ‘रघु’ परतणार
1999 साली आलेला अभिनेता संजय दत्तचा ’वास्तव’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांकडून आवर्जून पाहिला जातो. हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गँगस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील पात्रं आणि डायलॉग्स आजही मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता 26 वर्षांनी ’वास्तव’ चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. संजय दत्त पुन्हा एकदा ’रघु’ …
Read More » -
9 February
ममताबाईंचा संन्यास
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. याचे कारण ममताबाईंनी अचानक संन्यास पत्करण्याचा निर्णय घेतला असून महाकुंभात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले आहे. ही घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ममताबाईंची एकूण कारिकर्द पाहिल्यास अभिनयापेक्षा तिच्या अंडरवर्ल्डशी असणार्या संबंधांची चर्चा अधिक झाली. छोटा राजनसोबतच्या तिच्या संबंधांचे गूढ कायम राहिले असले तरी ड्रग्जच्या जगात नंबर वन खेळाडू म्हणून ओळखल्या …
Read More » -
9 February
युपीएससीची तयारी करताना…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेचा प्रवास हा एक मोठा, कठीण आणि आव्हानात्मक असतो. भारताच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण पदावर काम करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते आणि यासाठी संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या परीक्षेची कडक परीक्षा पद्धत, विस्तृत अभ्यासक्रम आणि तीव्र स्पर्धा पाहता, योग्य मार्गदर्शन आणि तयारी अत्यंत आवश्यक आहे. या परीक्षेतील यशासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वांत पहिली …
Read More » -
9 February
कुशनच्या दुनियेत
कुशन खरेदी करताना… कुशन हे नेहमी सोफा किंवा बेडच्या आकाराप्रमाणे असावेत, खूप मोठे किंवा खूप लहान नसावेत. सोफा किंवा बेडवर आवश्यकतेपेक्षा जास्त कुशन ठेवू नका. नेहमी गोलाकार, आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या उशा घ्या. लिव्हिंग रूमच्या भिंती आणि सोफ्याच्या रंगाशी जुळणारे कुशन कव्हर्सचा रंग आणि पॅटर्न निवडा. बेडरुम आणि लिव्हिंग रूममध्ये ठेवलेले फर्निचरच नाही तर त्यामध्ये सजवलेल्या गाद्याही बेडरुम आणि लिव्हिंग …
Read More » -
9 February
सर्वात पातळ काच!
जगातील सर्वात पातळ काच कुठे शोधण्यात आली हे तुम्हाला माहिती आहे का? अपघातानेच हा शोध लागला होता व या काचेची जाडी दोन अणूंइतकी आहे. कॉर्नेल व जर्मनीच्या उल्म विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेली काच ही सर्वात पातळ काच म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदली गेली आहे. या काचेचे तावदान इतके पातळ आहे, की त्याचे सिलिकॉन व ऑक्सिजन रेणू हे इलेक्ट्रॉन …
Read More » -
9 February
दुर्लक्षित वैज्ञानिकाची प्रेरक कहाणी
भारताच्या प्राचीन विज्ञानाची जगभरात ओळख करून देणार्या वैज्ञानिकांमध्ये डॉ. शिवकर बापूजी तळपदेे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी 1895 साली मुंबईच्या चोपट्टी समुद्रकिनारी ‘मरुतसखा’ नावाचे पहिले स्वदेशी विमान यशस्वीरीत्या उडवले. परंतु त्यांचे नाव इतिहासाच्या पानांत मात्र झाकोळले गेले. प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा शिवकर तळपदेे यांचा जन्म 1864 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच वेद आणि संस्कृत ग्रंथ वाचण्याची आवड होती. …
Read More » -
9 February
झोपडपट्टयांची मुंबई
मुंबई कोणाला कधीच उपाशी झोपू देत नाही, असे म्हणतात. अनेक स्वप्ने उराशी बाळगलेले बेरोजगारांचे लोंढे देशाच्या कानाकोपर्यातून मुंबईत येतात. ग्रामीण भागातून मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे मुंबई समस्यांचे आगर बनले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांसाठी मुंबईतल्या झोपडपट्ट्या म्हणजे बेकायदा वसुलींचे ‘एटीएम’च बनले आहे. कधीही जा आणि मनमानी वसुली करा, असा अधिकार्यांचा दृष्टिकोन इथल्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







