लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

April, 2025

  • 13 April

    40 हजारांसाठी मृतदेह 6 तास अडवला

    पुण्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही रुग्णासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह 40 हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी घडला. शिवसेना (उबाठा) पदाधिकार्‍यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय 68) या 5 एप्रिल रोजी घरात पाय घसरून …

    Read More »
  • 13 April

    अवकाळीनं मोडले कंबरडे

    अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वार्‍यांचा संगम होऊन मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातल्याचे दिसून आले. या पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. यादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास 1400 हेक्टरवरील पीकाला याचा फटका बसला आहे. बेमोसमी पाऊस आणि त्यामुळे शेतीचे आणि शेतकर्‍यांचे …

    Read More »
  • 6 April

    कमाईचा नवा विक्रम

    विक्की कौशलचा ’छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली विजयी घोडदौड कायम ठेवून आहे. रेकॉर्ड तोडण्याची त्याची भूक अद्याप संपलेली दिसत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडणारा हा चित्रपट सहाव्या वीकेंडनंतरही जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रिलीज होऊन आज 39 दिवस पूर्ण झाले आहेत. आज या चित्रपटाने बॉलीवुडमधील जवळपास सर्व मोठ्या चित्रपटांच्या आजीवन कमाईला मागे टाकलं आहे, फक्त शाहरुख खानचा …

    Read More »
  • 6 April

    महान नायकाचा विराम

    बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आणि खास करुन युद्धाच्या काळात आलेल्या देशभक्तीपर चित्रपटांच्या लाटेचे प्रमुख नायक म्हणून मनोज कुमार यांनी अग्रस्थान पटकावले. त्यांच्या चित्रपटांनी समाजातील विविध समस्यांचे, विशेषत: देशभक्ती आणि संघर्षाचे मुद्दे उठवले. पूरब और पश्चिम, रोटी, कपड़ा और मकान आणि क्रांति यासारख्या चित्रपटांतून त्यांनी …

    Read More »
  • 6 April

    विद्युतवाहन क्षेत्रात करिअर करायचंय?

    इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि वेगाने वाढणारा क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट कौशल्ये आणि गुणधर्म असणे आवश्यक आहे. 1. तांत्रिक कौशल्ये: ईव्ही तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आणि त्यात पुढे जाण्यासाठी काही तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची आहेत. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ज्ञान: इलेक्ट्रिक वाहने मुख्यतः बॅटरी, मोटर, नियंत्रक आणि सेन्सरवर कार्य करतात. त्यामुळे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स …

    Read More »
  • 6 April

    बाळ वारंवार जीभ बाहेर काढतेय?

    लहान मुलांच्या बहुतांश सवयी सर्वांनाच आवडतात. पण काही विचित्र सवयी पालकांना घाबरवूनही जातात. यापैकी एक सवय म्हणजे वारंवार जीभ बाहेर काढणे. खरे पाहता लहान मूल जीभ बाहेर काढते तेव्हा गोंडस दिसते. पण सतत जर मूल जीभ बाहेर काढत असेल तर पालकांना या सवयीबाबत चिंता वाटते. लहान मूल त्याच्या ओठांना स्पर्श झालेल्या एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करते तेव्हा जीभ बाहेर …

    Read More »
  • 6 April

    देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक

    सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. ‘क्लिन एनर्जी’वर चालणार्‍या या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही. तसेच जीवाश्म इंधनदरवाढीच्या काळात ही वाहने लोकांना किफायतशीरही वाटतात. चारचाकी, दुचाकी वाहनांपासून चक्क विमानांपर्यंतही अशी वाहने बनवली जात आहेत. आता आपल्या देशात पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईकही समोर आली आहे. देशातील पहिल्या सुपरबाईकचा मान ‘अल्ट्राव्हायोलेट एफ’ ला मिळाला आहे. या बाईकचा कमाल वेग ताशी 265 कि.मी. असा आहे. …

    Read More »
  • 6 April

    अपार संघर्षातून यशाची कहाणी

    पेट्रीसिया नारायण यांची जीवनकथा संघर्ष, आत्मविश्वास आणि अपार मेहनतीचे प्रतीक आहे. तामिळनाडूमधील नागरकोइल येथे ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या पेट्रीसियांनी, वयाच्या 17व्या वर्षी नारायण नावाच्या हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला. परंतु, हा निर्णय त्यांच्या जीवनात अनेक आव्हाने घेऊन आला. नवरा व्यसनाधीन आणि अत्याचारी असल्यामुळे, त्यांनी एका वर्षानंतर दोन मुलांसह त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी त्यांना परत स्वीकारले, परंतु पेट्रीसियांना स्वतःच्या पायावर उभे …

    Read More »
  • 6 April

    कर्जमाफीला ठेंगा

    शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात वर केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारवासारवीचे प्रयत्न चालू झाले आहेत. यंदा आणि पुढच्या वर्षी देखील शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे आता अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. महायुतीच्या नेत्यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा घेताना देखील …

    Read More »
  • 6 April

    संयम बेपत्ता

    आपल्या आईसमोरच नवर्‍याला बदडणार्‍या बायकोचा व्हिडिओ पाहिलात? ‘मी अजमल कसाबचा भाऊ बोलतोय,’ असं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देणार्‍या मद्यपी सुरक्षा रक्षकाची बातमी वाचलीत? हैदराबादजवळच्या अमीनपूरमध्ये स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून करणार्‍या आईबद्दल तुम्हाला कळलंय? पत्नी मुलांना भेटू देत नाही, फोनवर बोलूही देत नाही म्हणून पाळण्याच्या दोरीनेच फास लावून घेणारा यवतमाळचा संदीप आडे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र उघडा. …

    Read More »