लेख-समिक्षण

रविवार विशेष

स्वच्छ इंधनासाठी हवी भरीव गुंतवणूक

जीवाश्म इंधनाच्या (फॉसिल फ्युएल) बेसुमार वापरामुळे निर्माण झालेल्या हवामान संकटामुळे आज संपूर्ण जगाला स्वच्छ इंधनाची निकड भासू लागली आहे. मात्र, या दिशेने होणारे प्रयत्न अत्यंत अपुरे असल्याचे दिसून येते. स्वच्छ इंधन आणि अक्षय ऊर्जेबाबत (रिन्यूएबल एनर्जी) कागदावर अनेक योजना आखल्या जात असल्या तरी, त्यांच्या अंमलबजावणीचा वेग कमालीचा संथ आहे. आजही जगाचा कल जीवाश्म इंधनावरच अधिक असल्याने, हवामान बदलाबाबत जागतिक स्तरावर …

Read More »

‌‘हेट स्पीच‌’ला चपराक

देशातील राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते आणि संघटना अनेकदा द्वेषपूर्ण विधानाचा म्हणजेच हेट स्पीचचा आधार घेताना दिसतात. याच साखळीत तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधि स्टालिन यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सनातन धर्माबाबत त्यांनी केलेल्या प्रतिकूल टिप्पणीला मद्रास उच्च न्यायालयाने आता अधिकृतपणे हेट स्पीच मानले आहे. 2023 मधील या प्रकरणाची दखल वास्तविक खूप आधीच घेतली जायला हवी होती. विशेष म्हणजे …

Read More »

ग्रामीण लोकशाहीची कसोटी

गेल्या दोन-तीन वर्षांपासून या निवडणुका विविध कायदेशीर पेचांमुळे प्रलंबित होत्या. निवडणुका लांबणीवर पडल्याचा थेट परिणाम ग्रामीण विकासावर झाला आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. प्रशासकीय राजवटीत लोकांशी असलेला संवाद तुटल्याने अनेक स्थानिक प्रश्न प्रलंबित राहिले. निधीचे वाटप आणि योजनांची अंमलबजावणी यामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसल्याने विकासकामांची गती मंदावली होती. आता निवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रियेला गती …

Read More »

चिंतनशील व्यक्तिमत्वाचा वियोग

नव्या वर्षाची सुरुवात एका दु:खदायक बातमीने झाली. ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व लेखक डॉ. अशोकराव मोडक यांचे नुकतेच निधन झाले. गेली काही वर्षेते आजारी होते हे खरे असले तरी ही बातमी दु:खद आहे. कारण ज्या व्यक्ती आपल्याबरोबर दीर्घकाळ असल्या पाहिजेत असे वाटत असते अशा अत्यंत कमी व्यक्तींपैकी अशोकराव होते. एक ज्ञानसंपन्न व सक्रीय आयुष्य जगून अशोकरावांनी ह्या जगाचा निरोप घेतला आहे. …

Read More »

हुंडाबंदी कायद्यांबाबत आत्मचिंतनाची गरज

उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध अजमल बेग या प्रकरणात नुकत्याच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 498-अ आणि 304-ब तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 च्या कलम 2/4 अंतर्गत प्रतिवाद्यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार केला. यावेळी न्यायालयाने नमूद केले की, हुंड्याची व्यापक समस्या, संबंधित कायद्यांची अप्रभावकता आणि कलम 498-अ व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा …

Read More »

विरोधकांची हाराकिरी

महाराष्ट्रातील नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल सत्ताधारी महायुतीच्या बाजूनेच गेल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढत असले तरी राज्यातील नागरी भागातील मतदारांनी या तीन पक्षांवर विश्वास दाखवला आहे असेच दिसते. राज्यातील एकूण 288 नगरपंचायती नगरपरिषदांसाठी झालेल्या मतदानामध्ये थेट नगराध्यक्ष …

Read More »

गैरफायद्याची खिडकी खुली

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फरार संदेसरा बंधुंच्या विरोधातील खटला मागे घेण्यास सहमती दर्शविली. ंहा खटला मागे घेण्यासाठी संदेसरा बंधुंना भारतींय रुपयांत 5100 कोटी भरावे लागतील. मात्र संदेसरा बंधुबाबत आदेश देताना अन्य प्रकरणात हीच मात्रा लागू करू नये किंवा गृहित धरू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फरार संदेसरा बंधुंना भरपाईवर भरल्यास तडजोडीची परवानगी दिली आणि कारवाई स्थगित केली. …

Read More »

सौर विकिरणांचा परिणाम

ज्या काळात इथियोपियाच्या दिशेने उसळलेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड धुरामुळे विमानसेवेसमोर अडथळे उभे राहिले होते, त्याच वेळी सूर्यकिरणांमधून निर्माण होणाऱ्या तीव्र विकिरणामुळे जगभरात परिचित असलेल्या सुमारे साडेसहा हजार एअरबस ए320 विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनाकलनीय बिघाड दिसू लागला आणि अनेक उड्डाणे स्थगित करावी लागली. 30 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्ककडे उड्डाण करणाऱ्या जेटब्लूच्या विमानाला आलेल्या विकिरणाच्या धक्क्यामुळे विमानात अचानक झटके बसले, त्याची उंची झपाट्याने कमी झाली …

Read More »

डाया पक्षाची मावळती!

भारताा राजकी नकाशावर एक असा काळ होता की डाया पक्षाचे भावी अतिव काही रायात अपरिहाय मानले जात होते. पमि बगालमये जवळपास तीन दशकाहन अधिक काळ सलग साा टिकवणारे आणि पुिरामये पावशतकभर राजकारणाची दिशा ठरवणारे डावे पक्ष आज वतया अतिवासाठी सघष करताना दिसत आहेत. शेतकरी, मजूर, ककरी आणि गामीण भागाया हिताचे मुख तिनिधी समजले जाणारे हे पक्ष आता याया सवात मजबूत …

Read More »

मतदारयाद्यांचा घोळाचे लोण

मतदार यादीतील घोळ हा राष्ट्रव्यापी विषय आहे. त्या विषयाची धग आतापर्यंत पुणेकरांना बसली नव्हती, पण अखेर तो विषय पुणेकरांपर्यंत येऊन ठेपला आहे. पुण्याच्या मतदार यादीतही अनेक प्रकारचे घोळ आहेत. ते सगळे विषय महापालिकेच्या निवडणूक शाखेपुढे उपस्थित करण्यात आले असून निवडणूक शाखेच्या अधिकार्यांनी यातील आपली जबाबदारी झटकत हा सगळा घोळ निवडणूक आयोगाकडून आलेल्या सॉफ्टवेअरमधून झाला असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे एकतर …

Read More »