लेख-समिक्षण

संपादकीय

बिगुल वाजला; पण…

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी २ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे वगैरे तारखाही जाहीर केल्या गेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यात केवळ नगरपालिका किंवा नगरपरिषदा यांच्या निवडणुकाच प्रलंबित नाहीत तर, जिल्हा …

Read More »

विजय एका स्वप्नाचा

जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खेळणं म्हणजे वडिलांची क्रिकेटची बॅट होती. ती बॅट माझ्यापेक्षा उंच, जड आणि मला हाताळायलाही अवघड वाटायची. पण तीच बॅट माझं पहिलं स्वप्न बनली. मला अजून आठवतं, मी अंगणात उभी राहून ती बॅट दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करायचे आणि वडिलांना म्हणायचे की मी सुद्धा भारतासाठी खेळणार आहे. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की …

Read More »

गुन्हेगारीला उधाण

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका डॉटर महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयामध्ये एका पोलीस अधिकार्याचा समावेश असल्यामुळे त्याला गांभीर्य निश्चितच प्राप्त झाले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या इतर विविध घटनांवर नजर टाकली तर गुन्हे आणि गुन्हेगार यांची हिंसक आणि विकृत मानसिकता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्या १४ …

Read More »

अवलिया पियुषजी

भारतीय जाहिरात विश्वाचे प्रतिभावंत शिल्पकार अशी ओळख असणार्‍या अ‍ॅड गुरु पियुष पांडे यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी पाश्चिमात्य केंद्रीत जाहीरातींपासून जाहीरात विश्वाला दूर नेत, भारतीय दृष्टी आणि भावनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’सारख्या अजरामर ओळी लिहिणारे पियूष म्हणजे भावनांची शिकवण देणारे महान गुरु होते. माणूस म्हणून ते अतिशय भावूक स्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यातली वायं …

Read More »

ब्राह्मोसचा थरार

पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी त्या देशात कोठेही लपले तरी त्यांना टिपण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालवलेले ‘ऑपरेशन सिंदूर अभियान’ केवळ एक ट्रेलर आहे. हे अभियान संपविण्यात आलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. कारण या अभियानाचा आतापर्यंतचा उद्देश सफल झालेला आहे …

Read More »

रेड्डी सरकारला चपराक

स्थानिक निवडणुकीवर लक्ष स्थानिक स्वराज निवडणुकीचे वेळापत्रक रेंगाळण्याबरोबरच आरक्षणाचा वाद आता राजकीय डावपेचाचा भाग ठरला. जातनिहाय सर्वेक्षण आणि सामाजिक न्याय देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या काँग्रेसला या निमित्ताने ओबीसीचे पाठबळ मिळवण्याची संधी मानली जात आहे. दुसरीकडे पराभवाच्या धयातून बीआरएस अजूनही सावरलेली नसताना या आदेशाचा आधार घेत रेड्डी सरकारवर हल्ला करण्याची संधी साधली जात आहे. यादरम्यान भाजप ओबीसीमध्ये मागास मुस्लिमांना सामील …

Read More »

खड्डे आणि ताशेरे

महाराष्ट्राची राजधानी मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील इतर महानगरे असोत किंवा देशाच्या कानाकोपर्‍यातील महानगरे आणि नगरे असोत, त्या ठिकाणी नेहमीच खराब रस्ते आणि खड्डे यांची चर्चा होत असते. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालाच्या दरम्यान खराब रस्त्यांवर आणि खड्ड्यांच्या संस्कृतीवर जे ताशेरे ओढले आहेत ते पाहता या रस्त्यांच्या विकासासाठी जबाबदार असलेली प्रशासन यंत्रणा डोळे उघडून जागी होईल अशी आशा करायला …

Read More »

अर्थचक्राला गती सणसुदीची

आपल्या देशात सणासुदीला, उत्सवात लाखो, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. यावर्षी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर तब्बल सहा लाख कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शयता असून त्यात ऑनलाइनवर १.२० लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. ही उलाढाल देशाच्या जीडीपीच्या ३.२ टक्के आहे. नामांकित ई कॉमर्स कंपन्यांनी तर उत्सवाच्या काळात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कपातीचा लाभ उचलण्यासही सुरुवात केली आणि ती …

Read More »

जड झाले ओझे

जागतिक बँकेकडून कर्ज घेणार्या देशांच्या यादीमध्ये भारताचा आता पहिला क्रमांक लागला असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या आहेत. यावरून आता भारत जगातला सगळ्यात मोठा कर्जबाजारी देश बनला असल्याची ओरड सोशल मीडियातून सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही तीच हाकाटी पिटायला सुरुवात केली आहे. एका माहितीनुसार, जागतिक बँकेचे भारतावरील एकूण कर्ज ३९.२८ अब्ज अमेरिकन डॉलर इतके झाले आहे, भारतीय रुपयात हे …

Read More »

‘प्लेजर मॅरेज’ चा घातक ट्रेंड

इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश मानला जातो, पण एकेकाळी तिथे हिंदू राजे राज्य करीत होते आणि जनतेचाही बहुतांश भाग हिंदू धर्मीय होता. पुढे काळ बदलला, इस्लामचा प्रसार झाला आणि आज तो एक प्रमुख मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या या देशात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त सामाजिक प्रथा वाढीस लागली आहे, जिला आनंद विवाह किंवा मुताह निकाह …

Read More »