लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

चिंता हसीनाा भविताची

सया भारताया आायाला असलेया बागलादेशया माजी पतधान शेख हसीना याना बागलादेशातील लवादाने मानवतेया विरोधात अपराध केयाया कारणावन मयुदडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे शेख हसीना याचे एकूणच भवितय आता सकटात सापडले आहे. बागलादेशात फेबुवारी महियात सावकि निवडणुका होणार आहेत, या निवडणुकात भाग यायला शेख हसीना याया नेतवाखालील अवामी लीग पक्षाला या आधीच बदी घालयात आली आहे. मुळात अवामी लीग या पक्षावरच …

Read More »

अमेरिकेचा नवा दणका

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या दोन मंत्रांचा जप करून विविध प्रकारचे विचित्र निर्णय घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या परकीय नागरिकांसाठी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्याचा ताजा नियम जाहीर करून पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. अमेरिकेत राहण्यासाठी येणार्या किंवा पर्यटनासाठी येणार्या परकीय नागरिकांना जी परवानगी दिली जाते ती परवानगी आता संपूर्णपणे संबंधित नागरिकांच्या आरोग्यावर …

Read More »

बिगुल वाजला; पण…

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी २ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे वगैरे तारखाही जाहीर केल्या गेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यात केवळ नगरपालिका किंवा नगरपरिषदा यांच्या निवडणुकाच प्रलंबित नाहीत तर, जिल्हा …

Read More »

गुन्हेगारीला उधाण

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका डॉटर महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयामध्ये एका पोलीस अधिकार्याचा समावेश असल्यामुळे त्याला गांभीर्य निश्चितच प्राप्त झाले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या इतर विविध घटनांवर नजर टाकली तर गुन्हे आणि गुन्हेगार यांची हिंसक आणि विकृत मानसिकता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्या १४ …

Read More »

ब्राह्मोसचा थरार

पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी त्या देशात कोठेही लपले तरी त्यांना टिपण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालवलेले ‘ऑपरेशन सिंदूर अभियान’ केवळ एक ट्रेलर आहे. हे अभियान संपविण्यात आलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. कारण या अभियानाचा आतापर्यंतचा उद्देश सफल झालेला आहे …

Read More »

खड्डे आणि ताशेरे

महाराष्ट्राची राजधानी मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील इतर महानगरे असोत किंवा देशाच्या कानाकोपर्‍यातील महानगरे आणि नगरे असोत, त्या ठिकाणी नेहमीच खराब रस्ते आणि खड्डे यांची चर्चा होत असते. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालाच्या दरम्यान खराब रस्त्यांवर आणि खड्ड्यांच्या संस्कृतीवर जे ताशेरे ओढले आहेत ते पाहता या रस्त्यांच्या विकासासाठी जबाबदार असलेली प्रशासन यंत्रणा डोळे उघडून जागी होईल अशी आशा करायला …

Read More »

जड झाले ओझे

जागतिक बँकेकडून कर्ज घेणार्या देशांच्या यादीमध्ये भारताचा आता पहिला क्रमांक लागला असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या आहेत. यावरून आता भारत जगातला सगळ्यात मोठा कर्जबाजारी देश बनला असल्याची ओरड सोशल मीडियातून सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही तीच हाकाटी पिटायला सुरुवात केली आहे. एका माहितीनुसार, जागतिक बँकेचे भारतावरील एकूण कर्ज ३९.२८ अब्ज अमेरिकन डॉलर इतके झाले आहे, भारतीय रुपयात हे …

Read More »

गळचेपी करणारी अटक

लडाखमधील सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना करण्यात आलेली अटक हा सध्याचा हॉट टॉपिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्या अटकेचा निषेध केला जात आहे. भारतातल्याही अनेक ज्येष्ठ विचारवंतांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत सरकारला ही अटक महागात पडेल, असा इशारा दिला आहे. अगदी मोदी सरकारचे समर्थक समजले जाणारे काही विचारवंतसुद्धा या अटकेच्या विरोधात आपले …

Read More »

नीतीमूल्यांची पायमल्ली

नेहमीच वादग्रस्त बोलणारे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महायुती सरकारचे घटक असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अशा प्रकारच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाची दखल घेऊन गोपीचंद पडळकर यांना समज …

Read More »

दिलासा देणारा निकाल

वक्फ (सुधारणा) कायदा-२०२५च्या घटनात्मक वैधतेवर अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांनंतर अंतरिम निकाल दिला. या कायद्यात करण्यात आलेल्या दोन वादग्रस्त सुधारणा न्यायालयाने स्थगित केल्या. तसेच वफ बोर्डावर मुस्लिमांचेच वर्चस्व राहील असा निर्णय दिला. वफ बोर्डात गेली किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचे पालन केलेल्या व्यक्तीच्या नियुक्ती संदर्भातील तरतुदीचा समावेश आहे. घटनात्मकतेची रूपरेषा सांगणारा संपूर्ण कायदा स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला. वफ …

Read More »