लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

गळचेपी करणारी अटक

लडाखमधील सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना करण्यात आलेली अटक हा सध्याचा हॉट टॉपिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्या अटकेचा निषेध केला जात आहे. भारतातल्याही अनेक ज्येष्ठ विचारवंतांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत सरकारला ही अटक महागात पडेल, असा इशारा दिला आहे. अगदी मोदी सरकारचे समर्थक समजले जाणारे काही विचारवंतसुद्धा या अटकेच्या विरोधात आपले …

Read More »

नीतीमूल्यांची पायमल्ली

नेहमीच वादग्रस्त बोलणारे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महायुती सरकारचे घटक असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अशा प्रकारच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाची दखल घेऊन गोपीचंद पडळकर यांना समज …

Read More »

दिलासा देणारा निकाल

वक्फ (सुधारणा) कायदा-२०२५च्या घटनात्मक वैधतेवर अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांनंतर अंतरिम निकाल दिला. या कायद्यात करण्यात आलेल्या दोन वादग्रस्त सुधारणा न्यायालयाने स्थगित केल्या. तसेच वफ बोर्डावर मुस्लिमांचेच वर्चस्व राहील असा निर्णय दिला. वफ बोर्डात गेली किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचे पालन केलेल्या व्यक्तीच्या नियुक्ती संदर्भातील तरतुदीचा समावेश आहे. घटनात्मकतेची रूपरेषा सांगणारा संपूर्ण कायदा स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला. वफ …

Read More »

अधिकारी संवेदनशील का नसतात?

कोणत्याही बांधकाम स्थळी सुरक्षेची खात्री करणे ही सर्वात मूलभूत जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात तिथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचारी या जबाबदारीबाबत सजग आणि संवेदनशील का नसतात, हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला उघडे ठेवलेले गटार, खड्डे किंवा मॅनहोल यात जर एखादा व्यक्ती चुकून पडला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात असे खड्डे वा गटार पाण्याने भरून जातात आणि त्यांचा …

Read More »

औद्योगिक क्षेत्रात भरारी घ्यायची तर…

भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्या दिशेने खर्‍या अर्थाने वाटचाल करायची असेल, तर केवळ वाढीचे टक्केवारी दाखवणारे आकडे किंवा अल्पकालीन उद्दिष्टे पुरेशी ठरणार नाहीत. औद्योगिक उत्पादनात शाश्वत गती निर्माण करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नव्या शयता उघडाव्या लागतील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन ३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे गेल्या चार …

Read More »

ग्राहकहितैषी निर्णय

शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये हॉटेल-रेस्तराँमध्ये जाऊन जेवणे हा आजकालच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. कुटुंबीय वा मित्रांसोबत बाहेर खाणे ही केवळ सामाजिक सवय नसून प्रतिष्ठेची बाब मानली जाते. परंतु या प्रवृत्तीचा फायदा घेत अनेक महागडे रेस्तराँ आपल्या मनमानी पद्धतीने दर ठरवतात. जेवणातील पदार्थांच्या मूळ किंमतीपेक्षा बरेच जास्त पैसे आकारणे ही आधीच ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी बाब आहे. त्यातही एकूण खर्चावर आणखी वेगळा …

Read More »

जलतांडवाच्या झळा

हवामानाची स्वतःची एक गती असते आणि सामान्य परिस्थितींमध्ये तो परिसंस्थेच्या चक्राला टिकवून ठेवण्याचा एक आवश्यक भाग असतो. पण गेल्या काही काळापासून हवामानाच्या चक्रात झपाट्याने बदल नोंदवला जात आहे. विशेषतः पावसामुळे होणार्‍या तडाख्यांमुळे स्थिती चित्र अधिकच बिघडत चालली आहे. प्रत्येक वर्षी संपूर्ण मान्सूनच्या हंगामात पावसामुळे देशाचे बहुतेक भाग कमीअधिक प्रमाणात प्रभावित होतात, पण आता आपत्तींची एक अखंड मालिकाच सुरू झाल्यासारखी स्थिती …

Read More »

समृद्ध राज्यातले आक्रित

कधीकाळी देशाच्या शेतीसाठी आदर्श मानल्या गेलेल्या पंजाबमधील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याने दबून पिचले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सध्याच्या परिस्थितीत कृषी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याची नितांत गरज आहे. अलीकडेच लोकसभेत सादर झालेल्या नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या अहवालाने पंजाबमधील शेतकर्‍यांची गंभीर आर्थिक अवस्था उघड केली आहे. या अहवालानुसार देशातील …

Read More »

वाघांचे भविष्य धोक्यात

देशभरातील जंगलांमध्ये ज्या प्रकारे अतिक्रमण, खाणकाम आणि मानवी हस्तक्षेपाचा कहर सुरू आहे. यामुळे जंगलांमधील वाघांचे सुरक्षित अधिवास धोयात आले आहेत. जंगलांची सतत होत असलेली कत्तल त्यांच्या आहाराच्या समस्याही वाढवत आहे. जंगलाच्या आत रस्त्यांचे जाळे, पर्यटनामुळे होणारा गोंगाट आणि मानवी हालचालींमुळे नैसर्गिक वातावरणाचे संतुलन बिघडले आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे की, आता वाघ जंगलाबाहेर पडू लागले आहेत. पाणी व …

Read More »

खर्‍या अर्थाने स्वच्छता दूत

शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पुढे त्या कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. कचरावेचक स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोयात टाकून हाच कचरा साफ करताना दिसतात. यांची समाजात केवळ ‘कचरावाला’ किंवा ‘कचरा कामगार’ एवढीच एक दुर्दैवी ओळख. मग तो दारूच पितो, तो बेवडाच आहे, तो तंबाखूच खातो, तो …

Read More »