लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

अधिकारी संवेदनशील का नसतात?

कोणत्याही बांधकाम स्थळी सुरक्षेची खात्री करणे ही सर्वात मूलभूत जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात तिथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचारी या जबाबदारीबाबत सजग आणि संवेदनशील का नसतात, हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला उघडे ठेवलेले गटार, खड्डे किंवा मॅनहोल यात जर एखादा व्यक्ती चुकून पडला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात असे खड्डे वा गटार पाण्याने भरून जातात आणि त्यांचा …

Read More »

औद्योगिक क्षेत्रात भरारी घ्यायची तर…

भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्या दिशेने खर्‍या अर्थाने वाटचाल करायची असेल, तर केवळ वाढीचे टक्केवारी दाखवणारे आकडे किंवा अल्पकालीन उद्दिष्टे पुरेशी ठरणार नाहीत. औद्योगिक उत्पादनात शाश्वत गती निर्माण करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नव्या शयता उघडाव्या लागतील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन ३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे गेल्या चार …

Read More »

ग्राहकहितैषी निर्णय

शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये हॉटेल-रेस्तराँमध्ये जाऊन जेवणे हा आजकालच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. कुटुंबीय वा मित्रांसोबत बाहेर खाणे ही केवळ सामाजिक सवय नसून प्रतिष्ठेची बाब मानली जाते. परंतु या प्रवृत्तीचा फायदा घेत अनेक महागडे रेस्तराँ आपल्या मनमानी पद्धतीने दर ठरवतात. जेवणातील पदार्थांच्या मूळ किंमतीपेक्षा बरेच जास्त पैसे आकारणे ही आधीच ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी बाब आहे. त्यातही एकूण खर्चावर आणखी वेगळा …

Read More »

जलतांडवाच्या झळा

हवामानाची स्वतःची एक गती असते आणि सामान्य परिस्थितींमध्ये तो परिसंस्थेच्या चक्राला टिकवून ठेवण्याचा एक आवश्यक भाग असतो. पण गेल्या काही काळापासून हवामानाच्या चक्रात झपाट्याने बदल नोंदवला जात आहे. विशेषतः पावसामुळे होणार्‍या तडाख्यांमुळे स्थिती चित्र अधिकच बिघडत चालली आहे. प्रत्येक वर्षी संपूर्ण मान्सूनच्या हंगामात पावसामुळे देशाचे बहुतेक भाग कमीअधिक प्रमाणात प्रभावित होतात, पण आता आपत्तींची एक अखंड मालिकाच सुरू झाल्यासारखी स्थिती …

Read More »

समृद्ध राज्यातले आक्रित

कधीकाळी देशाच्या शेतीसाठी आदर्श मानल्या गेलेल्या पंजाबमधील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याने दबून पिचले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सध्याच्या परिस्थितीत कृषी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याची नितांत गरज आहे. अलीकडेच लोकसभेत सादर झालेल्या नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या अहवालाने पंजाबमधील शेतकर्‍यांची गंभीर आर्थिक अवस्था उघड केली आहे. या अहवालानुसार देशातील …

Read More »

वाघांचे भविष्य धोक्यात

देशभरातील जंगलांमध्ये ज्या प्रकारे अतिक्रमण, खाणकाम आणि मानवी हस्तक्षेपाचा कहर सुरू आहे. यामुळे जंगलांमधील वाघांचे सुरक्षित अधिवास धोयात आले आहेत. जंगलांची सतत होत असलेली कत्तल त्यांच्या आहाराच्या समस्याही वाढवत आहे. जंगलाच्या आत रस्त्यांचे जाळे, पर्यटनामुळे होणारा गोंगाट आणि मानवी हालचालींमुळे नैसर्गिक वातावरणाचे संतुलन बिघडले आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे की, आता वाघ जंगलाबाहेर पडू लागले आहेत. पाणी व …

Read More »

खर्‍या अर्थाने स्वच्छता दूत

शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पुढे त्या कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. कचरावेचक स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोयात टाकून हाच कचरा साफ करताना दिसतात. यांची समाजात केवळ ‘कचरावाला’ किंवा ‘कचरा कामगार’ एवढीच एक दुर्दैवी ओळख. मग तो दारूच पितो, तो बेवडाच आहे, तो तंबाखूच खातो, तो …

Read More »

राजीनाम्याचा अन्वयार्थ

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिध्द सभापती असलेल्या अचानक प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत राजीनामा दिल्याची घोषणा संसद अधिवेशनाच्या प्रारंभी केली. यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ही केवळ व्यक्तिगत पातळीवरील वैद्यकीय बाब नसून भाजप सरकारने सर्वोच्च घटनात्मक पदांबाबत दाखविलेल्या असहिष्णुतेचे आणि अधिनायकी वृत्तीचे लक्षणीय उदाहरण म्हणून ही घटना ओळखली जाईल. सत्ताधारी भाजपने धनखड यांच्याशी असलेल्या तणावाच्या रेषा आधीच अधोरेखित केल्या होत्या. …

Read More »

वृक्षारोपणाचा नको दिखावा

वृक्षारोपण हा आता उत्साही कार्यक्रम झाला आहे. ज्या उत्साहात वृक्षारोपण केले जाते तेवढे त्या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. मग पुन्हा पुढच्या वर्षी उत्साहात वृक्षारोपण केले जाते. मानव इतर सजीवांपेक्षा बुध्दिमान असला तरी तोसुध्दा पर्यावरणाचाच एक घटक आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ आहे. मानवाकडेच त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे व त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. …

Read More »

गिलचा झंझावात

इंग्लंडविरुध्दच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताच्या शुभमन गिलने ऐतिहासिक झंझावात करीत २६९ धावांचा विक्रम नोंदविला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक नवीन सोनेरी पान लिहून ठेवले. २६९ धावांची त्याची ही चमकदार खेळी केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे तर संपूर्ण संघासाठी प्रेरणास्थान आहे. गिलने धावांचा डोंगर उभा करताना अनेक दिग्गज फलंदाजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या खेळात त्याने सचिन तेंडुलकरची इंग्लंडविरुध्द कसोटीतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या …

Read More »