लेख-समिक्षण

युवा

‌‘पॅनेल इंटरव्ह्यू‌’मध्ये बाजी मारायचीय?

पॅनेल इंटरव्ह्यू म्हणजेच एकाच वेळी अनेक मुलाखतकारांसमोर (पॅनेल) सामोरे जाणे, हा बहुतांश उमेदवारांसाठी अत्यंत तणावाचा आणि आव्हानात्मक प्रसंग असतो. जेव्हा एका बाजूला तुम्ही एकटे आणि दुसऱ्या बाजूला तीन ते पाच तज्ज्ञ अधिकारी बसलेले असतात, तेव्हा आत्मविश्वास डगमगणे स्वाभाविक आहे. मात्र, योग्य रणनीती, मानसिक पूर्वतयारी आणि संवाद कौशल्याच्या जोरावर या प्रकारच्या मुलाखतीत सहज यश मिळवणे शक्य आहे. अनेक मोठ्या कंपन्या आणि …

Read More »

पहिल्या पगारातून कायापालटाची कहाणी

तुमचा पहिला पगार 120 मुलांचे आयुष्य बदलू शकतो का? स्नेहा शर्मा यांची ही प्रेरणादायी कथा दाखवून देते की, एक छोटेसे पाऊल किती मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. बेगुसराय येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिका असलेल्या स्नेहा यांनी आपला पहिला पगार स्वतःवर खर्च न करता, मूलभूत शैक्षणिक साहित्याची गरज असलेल्या वंचित मुलांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. स्नेहा यांनी मुलांची पाठशाळा या …

Read More »

दहावीनंतरचा मार्ग निवडताना…

दहावीचा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचे वळण येते. हा काळ केवळ शालेय शिक्षण संपल्याचा नसून, भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीची पायाभरणी करण्याचा असतो. अनेकदा विद्यार्थी आणि पालक केवळ गुणांच्या आधारावर किंवा मित्रमैत्रिणींच्या प्रभावाखाली यूेन शाखेची निवड करतात, परंतु ही पद्धत भविष्यात अडचणीची ठरू शकते. त्यामुळे दहावीनंतरचा मार्ग निवडताना अत्यंत सजग राहणे आणि सर्व उपलब्ध पर्यायांचा सखोल विचार करणे आवश्यक …

Read More »

थांग समुद्रातील उज्ज्वल संधी

बारावीची परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी पारंपरिक वाटा सोडून काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक करिअर करण्याच्या शोधात असतात. अशा धाडसी तरुणांसाठी मर्चंट नेव्ही हे एक अतिशय आकर्षक क्षेत्र आहे. मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी जहाजांचा ताफा, जो जगभरात मालाची ने-आण करतो. हे क्षेत्र भारतीय नौदलापेक्षा पूर्णपणे वेगळे असून ते व्यावसायिक स्वरूपाचे आहे. साहसी प्रवास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि उच्च पगाराची नोकरी हवी असेल, …

Read More »

सुट्टी ‌‘फलदायी‌’ ठरण्यासाठी…

दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे. परीक्षांचे दिव्य पार पाडल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने संभ्रमाचा आणि दुसऱ्या अर्थाने संधीचा असतो. अनेकदा परीक्षा संपली की आता फक्त मौजमजा करायची, असा विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र, स्पर्धात्मक युगाचा विचार करता या सुट्ट्यांचा काळ केवळ विश्र्ांतीसाठी न वापरता तो फलदायी कसा ठरेल, याकडे लक्ष …

Read More »

टॅबलेट खरेदी करताना टेक्निकल गोष्टी कोणत्या पाहायच्या?

प्रगत तंत्रज्ञान युगात टॅबलेट खरेदी करणे म्हणजे केवळ स्क्रीनचा आकार किंवा रॅम तपासणे उरलेले नाही. आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत हार्डवेअर यांच्यातील सीमा धूसर होत आहेत. जर तुम्ही नवीन टॅब घेण्याचा विचार करत असाल, तर काही अशा तांत्रिक बाबी आहेत ज्या सामान्यतः दुकानात सांगितल्या जात नाहीत, पण त्या तुमच्या भविष्यातील वापरासाठी अत्यंत कळीच्या ठरतात. सर्वात …

Read More »

मुलाखतीतील उणेअधिक

मुलाखतीत स्वतःच्या बलस्थानांविषयी सांगणे ही आपली पात्रता सिद्ध करण्याची मोठी संधी असते. तर स्वतःच्या उणिवा प्रांजळपणे मान्य करणे हे आपल्या परिपक्वतेचे लक्षण मानले जाते. स्वतःची बलस्थाने मांडण्यासाठीची सूत्रे सहकार्य वृत्ती: संघात काम करताना इतरांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे ठरते. आपल्या सहकार्यामुळे प्रकल्पाला कसा फायदा झाला, याचे उदाहरण देणे प्रभावी ठरते. तांत्रिक कौशल्य: ज्या कामासाठी मुलाखत आहे, त्यातील …

Read More »

अझीम प्रेमजींच्या जीवनप्रवासातून काय शिकावे?

भारतीय उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे अझीम प्रेमजी हे यशस्वी उद्योजक आणि तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात. यापलीकडे जाऊन ते महादानशूर म्हणूनही जगाला ते सुपरचित आहेत.आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि अनेकदा गोंधळलेल्या जगात तरुणांनी नेमकी कोणती दिशा घ्यावी, याचे सूक्ष्म पण प्रभावी उत्तर त्यांच्या विचारांत सापडते. यशाची व्याख्या आज बहुधा पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत मोजली जाते; मात्र प्रेमजी यांचा …

Read More »

अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या घातक सवयी

अँड्रॉइड फोन गेल्या दोन दशकांपासून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, तंत्रज्ञान कितीही पुढारले असले तरी, सुरुवातीच्या काळातील काही चुकीच्या सवयी आणि गैरसमज आजही वापरकर्त्यांमध्ये कायम आहेत. संगणकाप्रमाणे फोन वापरण्याच्या नादात आपण नकळतपणे आपल्या महागड्या उपकरणाचे आणि वैयक्तिक माहितीचे नुकसान करत असतो. टास्क किलर ॲप्सचा अनावश्यक वापर अनेक वापरकर्त्यांना असे वाटते की पार्श्वभूमीवर (बॅकग्राउंड) सुरू असलेले ॲप्स वारंवार बंद …

Read More »

वायरलेस चार्जिंग ः फायद्याचे की तोट्याचे?

स्मार्टफोनच्या जगात सध्या ‌‘वायरलेस चार्जिंग‌’ हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. केबलची कटकट नसल्यामुळे अनेकजण या सुविधेला पसंती देत आहेत. मात्र, या तंत्रज्ञानामुळे फोनच्या बॅटरीवर विपरीत परिणाम होतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याविषयी… गेल्या काही वर्षांत वायरलेस चार्जिंगचे तंत्रज्ञान घराघरांत पोहोचले आहे. आता केवळ महागड्या स्मार्टफोनमध्येच नव्हे, तर कारमध्येही हे फीचर मिळू लागले आहे. चार्जिंग पॅडवर फोन ठेवला की …

Read More »