लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

छत्तीसगडमध्ये २७ नक्षली ठार

छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात ही चकमक झाली. अबूझमाड परिसरातील या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव, ज्यांना बसवराजू म्हणून ओळखले जाते, ते २६ इतर नक्षलवाद्यांसह ठार झाले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. …

Read More »

अमरावतीच्या सुपुत्राने घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे मंगळवार १३ मे रोजी निवृत्त झाले. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. न्या. गवई यांना सरन्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी …

Read More »

भारताने घेतला पहलगामचा बदला

पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये …

Read More »

देशात जातीनिहाय जनगणना होणार

केंद्र सरकार देशात जातीनिहाय जनगणना करणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केले. पण याचवेळी त्यांनी केंद्र सरकारकडे आणखी एक मोठी आणि महत्त्वाची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 …

Read More »

दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना कळताच मोठी खळबळ उडाली. तेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. या हल्ल्यात 28 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन काश्मिरी मुस्लिमांचाही समावेश आहे. सर्व जखमींना त्यांच्या गावांना हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदू व मुसलमानांनी पाकिस्तानच्या निषेधार्थ कडकडीत …

Read More »

अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमानसेवेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग हाऊसफूल होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. व्यापार आणि संपर्क वाढवण्याबद्दल मोदी बोलले. तर …

Read More »

40 हजारांसाठी मृतदेह 6 तास अडवला

पुण्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही रुग्णासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह 40 हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी घडला. शिवसेना (उबाठा) पदाधिकार्‍यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय 68) या 5 एप्रिल रोजी घरात पाय घसरून …

Read More »

अवकाळीचा तडाखा! वीज पडून चार ठार

राज्यात नाशिक, धुळ्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत गुरुवारी अवकाळीने तडाखा दिला. अवकाळी पावसासोबत वीज कोसळून भंडारा जिल्ह्यातील दोन, तर यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. बीड जिल्ह्यात शेतात गेलेल्या शेतकर्‍यावर काळाने घाला घातला. धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात ठिकठिकाणी शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण …

Read More »

कामराची टीका, शिंदेसैनिकांची गुंडागर्दी

400 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या औरंगजेबानंतर महायुती सरकारला कुणाल कामरा नावाचा नवीन बळीचा बकरा सापडला आहे. एक महिन्यापूर्वी केलेल्या कार्यक्रमावरून आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन 10 दिवसानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात सरकारने हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. तत्पूर्वी त्याच गुन्ह्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेला आणि ईडीला घाबरलेल्या राहुल कनालच्या नेतृत्वात शिंदेसैनिकांनी कुणाल कामरा याने वादग्रस्त गाणं म्हटलेल्या हॉटेलची तोडफोड केली. …

Read More »

नागपूर दंगलीचे 1250 संशयितांवर गुन्हे

अखेर औरंगजेबाच्या कबरीने नागपूरच्या महाल परिसरात दंगल घडवून आणली. गेल्या सोमवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी नागपूर पोलिसांनी 1250 हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मिडीया पोस्ट आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी सहा गुन्हे नोंदवले आहेत. नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 200 जणांची ओळख पटवून 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, …

Read More »