लेख-समिक्षण
  • 21 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

October, 2024

  • 20 October

    ‘लापता लेडिज’ ऑस्कर मिळवेल?

    चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या प्रत्येक कलाकारांचे ऑस्करची बाहुली मिळवण्याचे स्वप्न असते. कोडॅकच्या स्टुडिओत आयोजित भव्य दिव्य सोहळ्यात ‘ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश असला तरी ऑस्कर पुरस्कार विजयाचे सुख फारसे पदरात पडलेले नाही. यावर्षी आमीरखान आणि किरण राव यांचा बहुचर्चित ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताकडून ऑस्कर सोहळ्यासाठी पाठविला जाणार आहे. या …

    Read More »
  • 20 October

    अभ्यास अन नोकरीचा मेळ बसवताना…

    शिक्षणाबरोबरच नोकरी करण्याचे कौशल्य सर्वानाच जमते असे नाही. नोकरी आणि अभ्यास याचा ताळमेळ साधनाता अनेकांचा गोंधळ उडतो. परंतु या दोन्ही बाबी करणे शक्य आहेत. नोकरी आणि शिक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या योग्य रितीने हाताळू शकतो. बहुतांशी विद्यार्थी विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरीसाठी प्राधान्य देतात. याचा पहिला फायदा असा की आपले अर्थाजन सुरू होते. अर्धवेळ …

    Read More »
  • 20 October

    व्यक्तिमत्व खुलवताना

    रंगरूप कसे असावे हे आपल्या हातात नसते. मात्र त्यानुसार आपल्या राहणीमानात जाणीवपूर्वक बदल केला तर व्यक्तिमत्व नक्कीच आकर्षक बनू शकते. ज्यांना निसर्गतःच उजळ रंग आणि चांगली उंची लाभली असेल अशा व्यक्तींनी गडद किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत. त्यांना खरं तर कुठलीही फॅशन चांगली दिसते. पण उंची कमी असेल तर आडव्या डिझाईनचे कपडे निवडू नयेत. त्याऐवजी उभ्या रेषा असणारे डिझाईन निवडावे. …

    Read More »
  • 20 October

    कोवळ्या उन्हाचे आरोग्यलाभ

    उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नकसान होऊ शकते. मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत, मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स गरजेचे असतात, यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन डी, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचे आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन …

    Read More »
  • 20 October

    वेळेच्या नियोजनातून ध्येयपूर्ती

    हल्लीच्या स्पर्धात्मक युगात यूपीएससी आणि त्या सारख्या स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे मोठे आव्हान मानलं जातं. किंबहुना या परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातले कित्येक तास अभ्यासासाठी द्यावे लागतात, असा एक समज आहे. मात्र या समजुतीला छेद देत एका विद्यार्थीनीने अशक्यप्राय गोष्ट आपल्या जिद्दीच्या जोरावर शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या 2019 च्या कैडर बॅचमधील यशनी नागराजन यांची ही काहणी. त्यांनी केवळ वेळेचे योग्य नियोजन, …

    Read More »
  • 20 October

    महासंग्राम निवडणुकीचा

    गे ल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर घोषणा केली. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याच्या क्षणापासून राज्यात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर होणार असून त्याच …

    Read More »
  • 20 October

    अगम्य लीला

    दसर्‍यानिमित्त रावणदहन झोकात झालं. उत्तर भारतात हा कार्यक्रम फार मोठा असतो. आपल्या राज्यात यंदा निवडणुकीच्या आधीचा दसरा असल्यामुळं रावणदहनापेक्षा जास्त लक्ष मेळाव्यांवर केंद्रित झालं होतं. त्यामुळं विरोधकांवर फेकलेले शाब्दिक बाण यंदा अधिक टोकदार झाले होते. असो, तर रावणदहन हा सोहळा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. उत्तरेत सामान्यतः शारदीय नवरात्राला प्रारंभ झाल्यापासून रामलीलेचं मंचन सुरू होतं आणि विजयादशमीला रावणदहनाने त्याची …

    Read More »
  • 20 October

    व्होट जिहाद संज्ञेची चौकशी होणार

    केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पाड पडेल.झारखंडमध्ये दोन टप्प्यात म्हणजेच 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यानंतर बुधवारी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्होट जिहाद संज्ञेचे चौकशी करण्याचा इशारा दिला. राज्यातील 288 तर झारखंडमधील …

    Read More »
  • 20 October

    आघाडीची कसोटी

    लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक …

    Read More »
  • 20 October

    हरहुन्नरी अतुल

    आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्‍या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर …

    Read More »