दिवाळी हा अंधःकार दूर करुन प्रकाश देणारा लोकोत्सव आहे. यानिमित्ताने मनातील नकारात्मक अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्यास आणि सद्गुणांची पेरणी केल्यास आयुष्य मंगलदायी होईल. यादृष्टीने संपूर्ण जगासाठी शिरसावंद्य असणार्या गांधीजींचे विचारधन आत्मसात करणे गरजेचे आहे. काय आहेत हे विचार? * तुमचे विचार सकारात्मक ठेवा. कारण तुमचे विचार तुमचे शब्द बनतात. तुमचे शब्द सकारात्मक ठेवा. कारण तुमचे शब्द तुमचे वर्तन बनतात. …
Read More »‘नकुशी’चं दुखणं
मुलींच्या बाबतीत समाजाची मानसिकता अजूनही मागासलेलीच दिसून येते. त्याला समाजाचा कोणताही स्तर अपवाद नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. मानसिकतेची तीव्रता कमी-जास्त असू शकेल, एवढाच काय तो फरक. मुलगी झाली म्हणून तिचा जीव घेण्याच्या किंवा तिच्या आईचा मानसिक छळ करण्याच्या घटना समाजात अधून-मधून घडतात. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात अशीच एक घटना नुकतीच घडली. चौथी मुलगी झाली म्हणून …
Read More »बहुगुणी लस
देवी, गोवर, ट्रिपल, पोलिओ अशा अनेक लसी आपल्याला पालकांनी लहानपणीच दिल्या. स्वतः जाऊन लस घेऊन येण्याचा अनुभवच आपल्याला नव्हता. ती वेळ कोविडने आपल्यावर आणली आणि बरेचजण घाबरले. ही लस खरंच ‘फुलप्रूफ’ आहे का? याचे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, अशा चिंतेनं अनेकांना ग्रासलं होतं. सोशल मीडियानं नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतून लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची यादी थेट मृत्यूला नेऊन भिडवली होती. …
Read More »288 मतदारसंघासाठी 7,995 उमेदवारीअर्ज
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होते. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. मुख्य निवडणूक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 7,995 जणांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 नोव्हेंबरपर्यंत …
Read More »विकसित भारतासाठी
भारत आणि भारतातील लोक विकसित देशांच्या श्रेणीत असल्याचे म्हणायचे असेल तर तीन निकष पाहावे लागतील. पहिले म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता. दुसरे म्हणजे स्थानिक सरकारी शाळेची गुणवत्ता. तिसरा मोठा निकष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर. याखेरीज हवेची गुणवत्ता, कामगारांची उत्पादन क्षमता, आरोग्य स्थिती, ज्येष्ठांची देखभाल, वनक्षेत्र, उर्त्सजन कमी, जैवविविधता देखील निकष आहेत. याजोडीला पुढील 25 वर्षांत 30 हजार डॉलरपेक्षा …
Read More »घातक खोडसाळपणाचे आव्हान
एकीकडे देशातील विमानप्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे …
Read More »तेजस्विनीचा ट्रिपल धमाका
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नुकतंच तिनं राजेश मापुस्कर दिग्दर्शित ’येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने लिखाण क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून तिहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘येक नंबर’ या चित्रपटात निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त ती अभिनय करतानाही दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती …
Read More »सन्मान जिंदादिल अभिनेत्रीचा
मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी …
Read More »व्यवसायाची जागा बदलताना
आपण एखाद्या कारणावरून व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करत असाल तर त्याअगोदर स्वत:ला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. एक व्यवसायिक म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणताही व्यक्ती शंभर टक्के प्रयत्न करत असतो. यासाठी जर व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करायचा असेल तरीही तो मागेपुढे पाहत नाही. तसे पाहिले तर व्यवसाय बदलण्याचा निर्णय हा कठिण आणि अवघड मानला जातो. तो काही एखाद्या क्षणात किंवा मिनिटात …
Read More »लोकप्रियता बटव्याची
फॅशनमध्ये नित्यनवीन गोष्टी येत असतात. तरूणींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये तर सारखंच काहीतरी नवीन येत असतं. त्यांच्या अॅक्सेसरीजमध्ये सध्या बटव्याची फॅशन फारच जोरात आहे. कोणत्याही पोशाखाबरोबर बटवा सहज अॅक्सेप्ट केला जातोय. बटव्याला पर्सची उपयुक्तता आणि फॅशनची शान अशा दोन्ही गोष्टी असल्याने त्याची महती फारच वाढली आहे. * बटवे कॅरी करायला फारच सोपे आहेत. ते साडी, चुडीदार वगैरे वर तर उठून दिसतातच पण …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र