लेख-समिक्षण

व्यक्तिमत्व खुलवताना

रंगरूप कसे असावे हे आपल्या हातात नसते. मात्र त्यानुसार आपल्या राहणीमानात जाणीवपूर्वक बदल केला तर व्यक्तिमत्व नक्कीच आकर्षक बनू शकते. ज्यांना निसर्गतःच उजळ रंग आणि चांगली उंची लाभली असेल अशा व्यक्तींनी गडद किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत. त्यांना खरं तर कुठलीही फॅशन चांगली दिसते. पण उंची कमी असेल तर आडव्या डिझाईनचे कपडे निवडू नयेत. त्याऐवजी उभ्या रेषा असणारे डिझाईन निवडावे. …

Read More »

कोवळ्या उन्हाचे आरोग्यलाभ

उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नकसान होऊ शकते. मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत, मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स गरजेचे असतात, यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन डी, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचे आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन …

Read More »

वेळेच्या नियोजनातून ध्येयपूर्ती

हल्लीच्या स्पर्धात्मक युगात यूपीएससी आणि त्या सारख्या स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे मोठे आव्हान मानलं जातं. किंबहुना या परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातले कित्येक तास अभ्यासासाठी द्यावे लागतात, असा एक समज आहे. मात्र या समजुतीला छेद देत एका विद्यार्थीनीने अशक्यप्राय गोष्ट आपल्या जिद्दीच्या जोरावर शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या 2019 च्या कैडर बॅचमधील यशनी नागराजन यांची ही काहणी. त्यांनी केवळ वेळेचे योग्य नियोजन, …

Read More »

महासंग्राम निवडणुकीचा

गे ल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर घोषणा केली. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याच्या क्षणापासून राज्यात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर होणार असून त्याच …

Read More »

अगम्य लीला

दसर्‍यानिमित्त रावणदहन झोकात झालं. उत्तर भारतात हा कार्यक्रम फार मोठा असतो. आपल्या राज्यात यंदा निवडणुकीच्या आधीचा दसरा असल्यामुळं रावणदहनापेक्षा जास्त लक्ष मेळाव्यांवर केंद्रित झालं होतं. त्यामुळं विरोधकांवर फेकलेले शाब्दिक बाण यंदा अधिक टोकदार झाले होते. असो, तर रावणदहन हा सोहळा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. उत्तरेत सामान्यतः शारदीय नवरात्राला प्रारंभ झाल्यापासून रामलीलेचं मंचन सुरू होतं आणि विजयादशमीला रावणदहनाने त्याची …

Read More »

व्होट जिहाद संज्ञेची चौकशी होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पाड पडेल.झारखंडमध्ये दोन टप्प्यात म्हणजेच 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यानंतर बुधवारी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्होट जिहाद संज्ञेचे चौकशी करण्याचा इशारा दिला. राज्यातील 288 तर झारखंडमधील …

Read More »

आघाडीची कसोटी

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक …

Read More »

हरहुन्नरी अतुल

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्‍या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर …

Read More »

बॉबीचा ‘दक्षिण धमाका’

अभिनेता बॉबी देओल ’अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देखील मिळाला. यानंतर तो दाक्षिणात्य चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसणार आहे. सध्या बॉबी देओल एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसत आहे. याचदरम्यान आता तो ‘थलपथी 69’मध्ये दमदार अवतारात दिसणार आहे. बॉबी देओलला साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा चित्रपट ‘थलपथी 69’ मध्ये कास्ट करण्यात …

Read More »

सन्मान मिथुनदांचा

बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिथुन यांचे खरे नाव गौरांग होतेे. त्यांनी खूप मेहनत करून नाव आणि संपत्ती कमावले आहे. आज करोडोंमध्ये खेळणार्‍या मिथुन चक्रवर्तीने कमालीची गरिबी पाहिली आहे. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत त्यांना मुंबईच्या फूटपाथवर अनेक रात्री रिकाम्या पोटी …

Read More »