लेख-समिक्षण

विशेष

अर्थसंकल्पातून काय मिळाले?

महायुती सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी लोकानुनयाला थारा न देता राज्याच्या वित्तीय शिस्तीच्या चौकटीचे पालन करत विकासाला चालना देण्यासाठीचे महत्तम प्रयत्न केल्याचे दिसते. कोणत्याही अर्थसंकल्पानंतर अजून खूप काही करावयास हवे होते, हा सूर नेहमीच ऐकावयास मिळतो. परंतु समोर असणारी आव्हाने आणि उपलब्ध संसाधने यांचा ताळमेळ उत्कृष्टपणाने घालणे याला कुशल वित्तीय व्यवस्थापन म्हणतात. त्यादृष्टीने एकीकडे लाडक्या बहिणींना …

Read More »

दीदींचे फासे, भाजपचे उसासे!

हल्दियाचे आमदार तापसी मंडल यांचा पक्षात समावेश करून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच काळ असला तरी पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाल्याचे यावरुन दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले …

Read More »

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या 80 दिवसांनंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंडे यांचे ओएसडी प्रशांत जोशी यांनी मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडे मुंडेंचा राजीनामा सोपवला. संतोष देशमुख …

Read More »

जगज्जेतेपदाचा शंखनाद

क्रिकेटच्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत अनेकदा आपली छाप उमटवली आहे. 2002 मध्ये संयुक्त विजेतेपद पटकावल्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि धोनी हा सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. आता भारताने सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला …

Read More »

थरुरांचे काय होणार?

केरळमधील काँग्रेसचा चेहरा असणारे शशी थरूर हे सध्या भाजप नेत्यांच्या जवळीकतेवरून चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासमवेतच्या सेल्फीने ते पुन्हा राजकीय वादात सापडले आहेत. शिवाय काँग्रेसही गेल्या काही वर्षांपासून थरूर यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेताना दिसत नाही. आता केरळची विधानसभा निवडणूक दीड वर्षावर आलेली असताना भाजपचे नेते तेथे सत्ता मिळवण्यासाठी थरुर यांना आपल्या तंबूत ओढतील का? असा प्रश्न …

Read More »

बंद बस बलात्काराचे अड्डे

परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणार्‍या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. त्यावरून राजकारण तापले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंद असलेल्या शिवशाही बसेसची पाहणी केली तेव्हा तेथे साड्या, कंडोम आदी आढळून आले. परिणामी पोलिसांनी तत्काळ सहा पथके तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री, …

Read More »

कायद्याने ‘हमी’ मिळेल?

भारत हा जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जगभरातील मागणीच्या तुलनेत वीस टक्के पुरवठा भारतातून केला जातो. अमेरिकेला 40 टक्के आणि ब्रिटनला 25 टक्के औषधी भारतातून जातात. 2018-19 मध्ये देशातून सुमारे 1,920 कोटी डॉलरच्या औषधांची निर्यात करण्यात आली. आता केंद्र सरकार रुग्णांना स्वस्तात औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे. यानंतर डॉक्टरांना रुग्णांसाठी ब्रँडेड नाही तर …

Read More »

महायुतीत काय चाललंय?

विधानसभा निवडणुकांमध्ये न भूतो… असे यश मिळूनही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील सुंदोपसुंदीमुळे महायुती सरकारमध्ये सारे काही आलबेल नाहीये, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून आपली पद्धतशीरपणाने राजकीय कोंडी केली जात असल्याचे शिंदे यांना वाटत आहे. अशा प्रकारची राजकीय अपरिहार्यता सत्तेच्या राजकारणात अनेकांना सोसावी लागली आहे. त्याची कारणे बहुतेकदा अतिमहत्त्वाकांक्षेत दडलेली असतात. भूतकाळ आणि वर्तमान यांचा तटस्थपणाने अभ्यास करण्याऐवजी महत्त्वाकांक्षा …

Read More »

दिल्लीमध्ये पुन्हा महिलाराज

दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे. आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रामलीला मैदानात शपथ घेतली. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी दिवंगत काँग्रेसच्या शिला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांनी काम केले आहे. रेखा गुप्ता तिसर्‍या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षातील दिग्गजांना मागे टाकून त्यांनी खुर्ची मिळवली …

Read More »

आव्हान संकटग्रस्त बँकाचे

महाराष्ट्रातील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता ग्राहक सहा महिन्यांपर्यंत बँकेतून पैसे काढू शकत नाहीयेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँक ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. यानिमित्ताने रिझर्व्ह बँक कोणत्याही बँकेवर निर्बंध का लादते? एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्या बँकेत जमा असलेल्या ग्राहकांच्या ठेवींचे काय होते? ग्राहकांनी काय …

Read More »