‘घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी,’ हे संत जनाबाईंचे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आधुनिक काळात या शब्दांची आठवण करून देतात ते आपण अवकाशात सोडलेले उपग्रह. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, भूस्थिर कक्षेत काम करणारे हे उपग्रह आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोलाची जबाबदारी पार पाडतात. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव आपण सध्या अनुभवतो आहोत. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. शत्रूची …
Read More »रविवार विशेष
‘झुकानेवाला’ आहेच!
झुकेगा नही…’ असं म्हणणार्या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही. ‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल …
Read More »बाळ एक,जन्म दोनदा!
एकाच जन्मात पुन्हा जन्माला येण्याची इच्छा कुणाला नसते? मुठीतून वाळू घसरत जावी, तसं आयुष्य हातातून निसटून जात असतं आणि योजलेल्या अनेक गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत. अनेक गोष्टी थोडक्यात हुकतात. कर्तृत्व असूनही यश हुलकावणी देत राहतं. अशा वेळी प्रत्येकाला वाटतं, आयुष्य पुन्हा पहिल्यापासून सुरू करता आलं तर..! परंतु आपण निसर्गनियमाच्या विरोधात जाऊ शकत नाही. मागे वळू शकत नाही आणि आहे …
Read More »नवा रंग
‘अगर रंग ना हो, तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया..!’ या शब्दांकडे फक्त प्रसिद्ध संवाद म्हणून न पाहता त्यात सांगितलेल्या परिस्थिती ची कल्पना करून पाहा. आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रंगछटा पाहण्याची क्षमता आपल्याला लाभली आहे. कितीतरी रंगछटांची नावंही आपल्याला माहीत नसतात; पण त्या आपल्याला दिसत असतात. अशा अंदाजे एक दशलक्ष रंगछटा आपण पाहू शकतो; परंतु त्या सर्व …
Read More »परावलंबित्व नकोच!
‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी,’ अशी आपल्याकडे म्हण आहे. माणसाच्या ऐतखाऊ वृत्तीचं वर्णन या म्हणीतून केलं गेलंय. विनासायास एखादी गोष्ट मिळत असेल तर कुणाला नको असते? ‘अमक्याबरोबर तमकं फ्री’ अशा जाहिरातींची भुरळ आपल्याला पडतेच की! परंतु लोकांना एखादी गोष्ट मोफत देण्याच्या सरकारी योजनांवर मात्र कडाडून टीका होत असते. मध्यंतरीच्या काळात अर्थतज्ज्ञांनी अशा योजनांचा पंचनामा करणारं भरपूर लेखन केलं. परंतु …
Read More »तपासाची ‘दशा ’
एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण …
Read More »संयम बेपत्ता
आपल्या आईसमोरच नवर्याला बदडणार्या बायकोचा व्हिडिओ पाहिलात? ‘मी अजमल कसाबचा भाऊ बोलतोय,’ असं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देणार्या मद्यपी सुरक्षा रक्षकाची बातमी वाचलीत? हैदराबादजवळच्या अमीनपूरमध्ये स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून करणार्या आईबद्दल तुम्हाला कळलंय? पत्नी मुलांना भेटू देत नाही, फोनवर बोलूही देत नाही म्हणून पाळण्याच्या दोरीनेच फास लावून घेणारा यवतमाळचा संदीप आडे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र उघडा. …
Read More »ऑपरेशन ‘आत्मघात ’
सिनेमात अनेक अतार्किक प्रसंग पाहायला मिळतात. किंबहुना तर्कसंगत नसल्यामुळंच ते अधिक मनोरंजक बनतात. अशा तर्कशून्यतेविषयी व. पु. काळे एका कथेत म्हणतात, ‘हिरोने आरशात बघून स्वतःच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन केलं, असं जरी दाखवलं असतं तरी मी विश्वास ठेवला असता.’ आधीच वास्तवापासून दूर असलेल्या प्रसंगावर केलेली ही अतिशयोक्ती. म्हणजे वास्तवापासून आणखी दूर! परंतु आरशात बघून नव्हे, तर चक्क यू-ट्यूबवर बघून माणसं स्वतःचं …
Read More »‘फुंकर’जखमेवर
तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या किंवा फाटलेले रबर-प्लॅस्टिकचे बूट दुरुस्त करणारे लोक अगदी परवा-परवापर्यंत दिसत होते. रस्त्याकडेला बसून हे लोक प्लास्टिकच्या वस्तूला पडलेल्या भेगांमध्ये गरम प्लॅस्टिक भरून देत असत. अगदीच वाया जाण्याऐवजी ती वस्तू आणखी काही दिवस उपयोगाला येत असे. लोखंडी हत्यारं शेगडीत गरम करून प्लॅस्टिकचे तुकडे तापवले जात असत आणि त्या रसायनाने वस्तूच्या ‘जखमा’ भरल्या जात असत. कल्पना करा, हेच टेक्निक …
Read More »चर्चेत ‘हंता’
एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र