प्रयागराज येथील ऐतिहासिक महाकुंभमेळा शेवटच्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविकांचा ओघ सुरू आहे. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंत आणि सेलिब्रिटी लोक प्रयागराज येथे दाखल होत असून अध्यात्माचा अनुभव घेत आहेत. एरवी पडद्यावर चमकणारे तारकामंडळ संगमतीरावर धार्मिक श्रद्धा आणि भावना जोपासताना दिसत आहे. एकार्थाने धर्म आणि श्रद्धा याचा अनोखा संगम साधत प्रयागराज येथील महाकुंभमेळा भव्यदिव्यतेने …
Read More »कोणते संकल्प करावेत?
बर्याच वेळेला आपण नववर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प पूर्ण होत नाही. हे संकल्प अवघे काही दिवसच टिकतात. मात्र, काही छोटे-छोटे संकल्प यावर्षात तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. डिजिटल डिटॉक्स ः आपल्या सर्वांचाच स्क्रिन टाईम प्रचंड वाढला आहे. दिवसभर आपण स्मार्टफोन, लॅपटॉप वापरत असतो. मात्र, नवीन वर्षात स्क्रिन टाईम कमी करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. गरज नसताना स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा निर्धार …
Read More »एकांताची सावली!
निसर्गात शोधतांना झाडांमधले ॠतूमानाप्रमाणे होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात. पर्वत शिखरांवर सुखद एकांत असतो. ते कधी केविलवाणे, बापुडवाणे दिसत नाहीत. कारण त्यांना एकाकीपणाची भिती वाटत नाही. ते स्वत:त मग्न असतात. सोबतीची अपेक्षा नसते. आपणही निसर्गाचा एक भाग आहेात. अधिक प्रगत, अधिक सजग. विचार करण्याची शक्ती असलेली आहोत. एकटे आहोत असं न मानता स्वत:ची सोबत स्वत:ला करावी. कसा असतो एकांत शांत …
Read More »जितके भूकंप, तितके जमिनीत सोने
सर्वांत विध्वंसक नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंपाचा समावेश होतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे भूकंप होणे अर्थातच कोणालाही नको असते; मात्र याच भूकंपामुळे सोन्याची निर्मिती होते, हे फार कमी जणांना माहिती असेल. शास्त्रज्ञांनी याबाबत मोठा शोध लावला आहे. भूकंपामुळे क्वार्टझ्? (सिलिकॉन डायऑक्साईडपासून तयार झालेलं खनिज) क्वार्ट्झमधून जाणार्या फ्रॅक्चर लाइन्समध्ये सोन्याचे गोळे तयार होतात, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. क्वार्टझ् …
Read More »महान वैज्ञानिकाची प्रेरक यशोगाथा
मायकेल फेराडे यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 रोजी इंग्लंडमधील न्यूग्टिंन बट्स येथे एका गरिब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मायकेल यांना लहान वयातच काम करावे लागले. त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही. दारिद्य्रामुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले. मात्र, ज्ञानाची भूक असणार्या फेराडे यांनी पुस्तके वाचून …
Read More »आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांपुढील
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानंतर हवेत असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नाना पटोले यांनी आपल्याला अध्यक्षपदावरुन मुक्त करावे, असे काँग्रेस नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या भेटी घेऊन सांगितले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे लांबणीवर टाकले. दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. …
Read More »शिणवठ्याचं चक्र
माणसाचं काम हलकं करण्यासाठी, त्याला अधिक सुख देण्यासाठी मशीन रोज ‘अपडेट’ होत राहिलं. आता तर मशीन माणसासारखंच जगू लागलंय. तरीसुद्धा माणसाला माणसासारखं का जगता येत नाहीये? मशीनचा माणूस होत असताना माणूस मशीनसारखा का होत चाललाय? अनेक माणसांचं काम एकच मशीन करतंय, तर माणसाचं काम डिप्रेशन येण्याइतकं का वाढतंय? त्याच्याकडून कधी आठवड्याला सत्तर तास तर कधी नव्वद तास कामाची अपेक्षा का …
Read More »दिल्लीमध्ये पुन्हा महिलाराज
दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे. आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रामलीला मैदानात शपथ घेतली. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी दिवंगत काँग्रेसच्या शिला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांनी काम केले आहे. रेखा गुप्ता तिसर्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षातील दिग्गजांना मागे टाकून त्यांनी खुर्ची मिळवली …
Read More »आव्हान संकटग्रस्त बँकाचे
महाराष्ट्रातील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता ग्राहक सहा महिन्यांपर्यंत बँकेतून पैसे काढू शकत नाहीयेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँक ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. यानिमित्ताने रिझर्व्ह बँक कोणत्याही बँकेवर निर्बंध का लादते? एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्या बँकेत जमा असलेल्या ग्राहकांच्या ठेवींचे काय होते? ग्राहकांनी काय …
Read More »व्यवस्थापनाचा ‘कुंभ’ रिकामाच!
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दिवाळी, छटपूजेच्यावेळी गर्दीचा उच्चांक राहिलेला आहे आणि चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आहे. पण त्यावेळी जखमींची संख्या फारशी नसल्याने पुढे फार उपायांची आवश्यकता रेल्वेला वाटली नाही. पण यावेळी कुंभमेळ्याला जाणार्या भाविकांनी गर्दीचे उच्चांक मोडले आणि दुर्घटना घडली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी छटपूजेच्या वेळी देखील अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वेने छटपूजेच्या काळात रेल्वे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र