उन्हाळा सुरू झाला की आइसक्रीमचा आनंद लुटणार्यांची संख्या वाढते. आज बाजारात अनेक मोठे आइसक्रीम ब्रँड्स आहेत, त्यापैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे वाडीलाल आइसक्रीम. पण हा ब्रँड एका मोठ्या कंपनीसारखा सहज स्थापित झालेला नाही, तर यामागे आहे संघर्ष, मेहनत आणि सातत्याने प्रयत्नांची कहाणी. वाडीलाल गांधी हे या आइसक्रीमचे जनक. त्यांचा प्रवास मात्र एका अत्यंत लहान व्यवसायापासून सुरू झाला. गुजरातमध्ये 1907 मध्ये …
Read More »औरंगजेबाचं राजकारण
संभाजीनगरपासून काही अंतरावर खुलताबाद येथे असणार्या औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटानंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम शासक होता, असे विधान केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. भाजपचे सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका, …
Read More »‘फुंकर’जखमेवर
तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या किंवा फाटलेले रबर-प्लॅस्टिकचे बूट दुरुस्त करणारे लोक अगदी परवा-परवापर्यंत दिसत होते. रस्त्याकडेला बसून हे लोक प्लास्टिकच्या वस्तूला पडलेल्या भेगांमध्ये गरम प्लॅस्टिक भरून देत असत. अगदीच वाया जाण्याऐवजी ती वस्तू आणखी काही दिवस उपयोगाला येत असे. लोखंडी हत्यारं शेगडीत गरम करून प्लॅस्टिकचे तुकडे तापवले जात असत आणि त्या रसायनाने वस्तूच्या ‘जखमा’ भरल्या जात असत. कल्पना करा, हेच टेक्निक …
Read More »नागपूर दंगलीचे 1250 संशयितांवर गुन्हे
अखेर औरंगजेबाच्या कबरीने नागपूरच्या महाल परिसरात दंगल घडवून आणली. गेल्या सोमवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी नागपूर पोलिसांनी 1250 हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मिडीया पोस्ट आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी सहा गुन्हे नोंदवले आहेत. नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 200 जणांची ओळख पटवून 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, …
Read More »अंतराळ दिग्विजयाला सलाम
नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अवकाशात अडकून पडल्यानंतर अखेर भारतीय वंशांच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कुपीतून घरवापसी झाली. त्यांच्यासमवेत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अॅलेक्झांडर गोर्व्हुनोव्ह देखील भूतलावर परतले. हे चौघेही अवकाश स्थानकावर (आयएसएस) क्रु-9 चे सदस्य होते. त्यांची जागा घेण्यासाठी चार अन्य अंतराळवीर नासाचे अॅनी …
Read More »‘शिवशाही’ची दारुणावस्था
आठ वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेना युतीच्या काळात राज्यात शिवशाही बससेवेची सुरुवात झाली. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरामध्ये वातानुकूलित गाडीतून लांबचा प्रवास करता यावा या उद्देशाने शयन आणि आसनी अशा दोन्ही स्वरुपात या बससेवेचा प्रारंभ झाला खरा; परंतु सुरुवातीपासूनच या बसेसविषयी नागरिकांच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. विशेषतः शिवशाहीला होणार्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरलेली दिसून आली आणि आजही ती कायम आहे. नादुरुस्त बस, अधूनमधून बंद …
Read More »मालिकाविश्वाला रामराम
दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गार्गी फुले यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता त्यांनी अचानक मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अचानक मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत …
Read More »जाने कहाँ गये वो दिन…
प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से यह दिल डरता है क्यू… हे गीत ऐकताना मुसळधार पावसात एकाच छत्रीखाली असलेले राजकपूर आणि नर्गिस यांची जोडी डोळ्यासमोर येते. प्रामुख्याने बॉलिवुडपटात आतापर्यंत प्रेमावर आधारलेली गाणी, कथानक हे हिटचा फॉर्म्युला राहिले आहे. राजकपूरपासून रणबीरकपूरपर्यंत आणि नर्गिसपासून दीपिका पदुकोनपर्यंतच्या कलाकारांनी प्रेक्षकांसमोर प्रेमाचे अनोखे रंग दाखवून छाप पाडली आणि त्याल प्रोत्साहित केले. पण आता हे …
Read More »व्हॉट्स अॅप वापरताय?
आतापर्यंत तुम्ही तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे अनेक बातम्या समोर येत आहेत. पत्रकार तसेच नेत्यांचे व्हॉट्सअॅप हॅक होत आहेत. या अॅपद्वारे घोटाळा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्हीही चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आंधळेपणाने व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर काही आवश्यक सेटिंग्ज आणि खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू …
Read More »संघर्षातून यशाची ‘बालेकी’ यशोगाथा
नेपाळमधील एका गावात सुमारे 37 वर्षांपूर्वी जन्मलेली रूपमणी जन्मापासूनच अपंग होती. तिला ऐकू येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. तिचे कुटुंब दार्जिलिंगला गेले तेव्हा रूपमणी सहा महिन्यांची होती. वडील तिथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. तिच्या लहानपणी रूपमणीला हे विचित्र वाटले की कुटुंबातील इतर लोक एकमेकांशी खूप बोलतात, एकमेकांशी संभाषण करतात, परंतु आपल्याला त्या संभाषणात भाग घेता येत नाही. पालक …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र