कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत …
Read More »TimeLine Layout
May, 2025
-
11 May
तंत्रज्ञानाने बॉलिवूडचा कायापालट!
अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. …
Read More » -
11 May
बारावीनंतरचे मिशन पार पाडताना…
बारावी झाली… आता पुढे काय? हे वाय आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात घोळतंय. परीक्षा संपली, निकाल लागला आणि आता करिअरची दिशा ठरवायची वेळ आली आहे. पण खरं सांगायचं, तर ही वेळ जितकी उत्साही वाटते, तितकीच गोंधळात टाकणारीही असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, सीईटीसारख्या परीक्षांची तयारी करतात, आणि स्वप्नांच्या दिशा शोधू लागतात. महाराष्ट्रातले उदाहरण सांगायचं झालं, तर एमएचटी- सीईटी …
Read More » -
11 May
नकोशा केसांपासून सुटका हवीय?
मासिक पाळी सुरू झाल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर केस वाढणे हा या बदलांचा एक भाग आहे. ही बाब अगदी सामान्य असल्याने त्याबाबत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. पण सौंदर्याखातर जर मुलींना अशा केसांपासून सुटका हवी असेल तर लेझर उपचार सर्वात प्रभावी आहे. परंतु, हे उपचार वयाच्या १८ वर्षापूर्वी घेऊ नयेत. यावर …
Read More » -
11 May
उलगडणार चंद्रनिर्मितीचे रहस्य
भारताच्या ‘चांद्रयान-१’ या मोहिमेवेळीच चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे, हे महत्त्वाचे संशोधन झाले होते. आता ‘चांद्रयान-३’ मोहिमेने यशस्वी टप्पा गाठला आहे. ‘चांद्रयान-३’ च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून अत्यंत महत्त्वाचा डेटा पाठवला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली, या सर्वात मोठा रहस्याचा लवकरच उलगडा होण्यास मदत होणार आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर १६० किलोमीटर व्यासाचा एक नवीन खड्डा शोधला आहे. दक्षिण ध्रुवाजवळील …
Read More » -
11 May
प्रेरणादायी रणरागिणी
‘ऑपरेशन सिंदुर’ची माहिती देशाला देताना भारतीय लष्करातील दोन रणरागिणींचे दर्शन घडले. यापैकी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या. सोफिया कुरेशी या गुजरात येथे राहणार्या आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केलं आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. तर त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय …
Read More » -
11 May
ऑपरेशन सिंदूरचे वैशिष्ट्य
‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती मांडली. हे तिघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत …
Read More » -
11 May
‘झुकानेवाला’ आहेच!
झुकेगा नही…’ असं म्हणणार्या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही. ‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल …
Read More » -
11 May
भारताने घेतला पहलगामचा बदला
पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये …
Read More » -
11 May
अघोषित युध्दातील वज्राघात
भारताच्या एअरस्ट्राईकनंतर जनतेमधील प्रतिमा टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला भारताविरुद्ध कारवाई करणे अपरिहार्य होते. पण या कारवाईला भारताच्या अत्याधुनिक शस्रसामग्रीने आणि लष्कराच्या अचूक नियोजनामुळे पूर्णतः निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानची क्षेपणास्रे, ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आली. एक विमान पाडण्यात आले. यावरुन पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलेला असावा. काही अभ्यासकांच्या मते, ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे. पण मागील तीन युद्धांप्रमाणेच याही वेळी भारत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







