लेख-समिक्षण

‘टीम गोल्स ’ का महत्त्वाची?

आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात, संघ किंवा टीम म्हणून उद्दिष्टे ठरवणे हे यश मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा एखादी टीम एकत्रित गोल्स ठरवते, तेव्हा प्रत्येक सदस्य ठराविक दिशेने काम करतो आणि संघटनेच्या यशाला वेग येतो. टीम गोल्स म्हणजे संपूर्ण गटाने मिळून गाठावयाची उद्दिष्टे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट असते, त्यामुळे टीम अधिक कार्यक्षम होते. संघटित उद्दिष्टे ठरवल्याने …

Read More »

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करताय?

ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातल्यानंतर भारतातही 18 वर्षांखालील लहान मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. डेटा प्रोटेक्शन 2025 च्या नवीन मसुद्यामध्ये या नियमांचा उल्लेख आहे. मुलांवर सोशल मीडियाचा होणारा नकारात्मक परिणाम लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे. परंतु दुसर्‍या बाजूला आज पालकच आपल्या मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, आणि इतर माध्यमांसमोर …

Read More »

सर्वप्रथम चक्रीवादळे कुणी ओळखली?

‘मोनालिसा’सारखी अजरामर कलाकृती बनवणारा इटालियन चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. हा माणूस एक कलाकार असण्याबरोबरच संशोधकही होता. त्याच्या अनेक चित्रांचा, स्केचेसचा, डायरीतील नोंदींचा आजही अभ्यास होत असतो. लिओनार्दो दा विंची यानेच सर्वप्रथम चक्रीवादळे ओळखली, असे वैज्ञानिकांनी म्हटलेले आहे, हे विशेष! अ‍ॅन पिझोरूसो या भूगर्भशास्त्रज्ञ व कला विद्वान महिलेने म्हटले होते की, लिओनार्दो दा विंची यांच्या …

Read More »

कहाणी एका ‘डोसा सम्राटा’ची

प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि सहा भावंडे अशी भरपूर मंडळी होती. त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण शक्य झाले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी चेन्नईत 250 रुपयांची नोकरी पत्करली आणि मिळालेली रक्कम घरी पाठवत राहिले.एक दिवस एका परिचिताने प्रेम यांना मुंबईत येऊन …

Read More »

वाहनविक्रीचा टॉप गिअर

नवरात्र, गुढी पाडवा आणि ईद यांसारख्या सणांमुळे निर्माण झालेली सणासुदीची मागणी, वाहनांच्या किमतींवर ऑटोमोबाइल कंपन्यांनी दिलेली सवलत, आगामी काळात दरवाढ होण्याची शक्यता, नव्या मॉडेल्सचे लोकार्पण आणि अधिक दर्जेदार पर्याय उपलब्ध होण्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस वाहनविक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. मागील आर्थिक वर्षात देशाच्या किरकोळ बाजारांतील प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत ग्रामीण भागाच्या सशक्त कामगिरीमुळे भारतातील खेड्यांमध्ये वाढत असलेल्या आर्थिक …

Read More »

परावलंबित्व नकोच!

‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी,’ अशी आपल्याकडे म्हण आहे. माणसाच्या ऐतखाऊ वृत्तीचं वर्णन या म्हणीतून केलं गेलंय. विनासायास एखादी गोष्ट मिळत असेल तर कुणाला नको असते? ‘अमक्याबरोबर तमकं फ्री’ अशा जाहिरातींची भुरळ आपल्याला पडतेच की! परंतु लोकांना एखादी गोष्ट मोफत देण्याच्या सरकारी योजनांवर मात्र कडाडून टीका होत असते. मध्यंतरीच्या काळात अर्थतज्ज्ञांनी अशा योजनांचा पंचनामा करणारं भरपूर लेखन केलं. परंतु …

Read More »

अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमानसेवेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग हाऊसफूल होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. व्यापार आणि संपर्क वाढवण्याबद्दल मोदी बोलले. तर …

Read More »

गालबोट विश्वासार्हतेला

एनपीसीआयने गेल्या दशकात डिजिटल व्यवहारांचे स्वरूपच पालटले आहे. सध्या भारतात दररोज सुमारे 60 कोटी यूपीआय व्यवहार होतात. यूपीआयच्या यशामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर लोक आता रोख रक्कम न बाळगता घराबाहेर पडतात. खेड्यापाड्यांतही यूपीआय व्यवहार स्वीकारले जात असल्यामुळे ही सेवा अखंड चालू राहणे अत्यावश्यक आहे. परंतु अलीकडेच ही सेवा ठप्प झाल्याने सबंध देशभरामध्ये बराच गोंधळ उडाला. गेल्या एका वर्षात अशा प्रकारे यूपीआय …

Read More »

साक्षर राज्यातलं भेदक वास्तव

निसर्गानं मुक्त हस्तानं वरदान केलेल्या केरळ राज्यात सोनेरी भविष्याच्या शोधात आखाती देशांमध्ये जाण्याची स्पर्धा आहे. या राज्यात प्रत्येक पाचव्या घरातून एक व्यक्ती परदेशात गेली आहे. परदेशातून येणार्‍या ‘रेमिटन्स’मुळे केरळमधील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. गावागावात भव्य घरं, आधुनिक गाड्या आणि शहरी जीवनशैली दिसू लागली. पण ही उन्नती एकाकीपणाची सावली घेऊन आली. तरुण मुलं-मुली शिक्षण पूर्ण होताच परदेशात गेले आणि गावात …

Read More »

‘लापता लेडीज’ची कथा चोरलेली?

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या चित्रपटाचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले. मात्र आता हा चित्रपट एका परदेशातील चित्रपटाचा कॉपी असल्याचा दावा केला जात आहे. बुर्का सिटी नावाच्या एका विदेशी चित्रपटावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. लापता लेडीज चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत नेटकर्‍यांनी किरण रावला …

Read More »