दरवर्षी साहित्यातील नोबेल कुणाला जाहीर होणार याकडे सर्व साहित्यप्रेमींचे, वाचनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. हा पुरस्कार जगभरातील साहित्य कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट साहित्याला दिला जात असल्याने त्याचे मोल अनन्यसाधारण असते. गतवर्षी दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांची निवड या पुरस्कारासाठी झाली होती. यंदाच्या वर्षी स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोरकाई यांची निवड केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना स्वीडिश अकादमीने …
Read More »‘क्रू’ परतणार…
करीना कपूर, क्रिती सॅनॉन आणि तब्बू या हवाई सुंदर्यांचा ‘क्रू’ लवकरच परतणार आहे. २०२४ मध्ये या विनोदी अंगाने जाणार्या गुन्हेपटाने रसिकांची चांगलीच पसंती मिवली होती. एकता कपूर आणि रिहा कपूर यांनी ‘क्रू’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोघांनी आता या चित्रपटाचा दुसरा भाग आणायचे ठरवले आहे. ‘क्रू’ या चित्रपटातच त्याचे अनेक भाग लपले आहेत. निर्मात्यांनी अनेक संकल्पांनांची चाचपणी केली. त्यानंतर …
Read More »शेवट दुःखद असूनही…
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते माणसाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणारे माध्यम आहे. पडद्यावर उमटणार्या भावनांनी आपण अनेकदा वास्तव विसरतो आणि पात्रांच्या आनंद-दुःखात रंगून जातो. काही चित्रपटांचा शेवट जसा आशादायक आणि सुखद असतो, तसाच काहींचा शेवट इतका वेदनादायी असतो की तो मनावर कायमचा ठसा उमटवून जातो. असेच काही बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यांच्या कथांचा शेवट शोकांत आहे पण त्यातून …
Read More »अव्वल यशाची कहाणी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशातील एकूण ७९२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत इमॉन घोष हा देशात पहिला, तर तिसरे स्थान पुण्यातील ॠतुजा वर्हाडे हिने मिळविला आहे. ॠतुजा हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. एनडीएच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. …
Read More »नदी सर्वांत मोठी,पण..
जगातील सर्वात मोठ्या नद्यांमध्ये दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीचा समावेश होतो. ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ म्हटल्या जाणार्या अॅमेझॉन जंगलाचे भरणपोषण करीत वाहणारी ही नदी गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिन माशांचाही सर्वात मोठा नैसर्गिक अधिवास आहे. शंभर प्रजातींचे इलेक्ट्रिक मासे आणि ६० प्रजातींचे पिर्हाना मासेही या नदीत आढळतात. पेरू, कोलंबिया, इक्वेडोर आणि ब्राझिल यासारख्या तब्बल नऊ देशांमधून वाहणार्या या नदीवर एकही पूल नाही हे विशेष! …
Read More »तुमचंही मूल शाळेत उदास असतं?
साधारणतः दुसरी ते चौथी इयत्तेत जाईपर्यंत मुलांच्या शिक्षणाबाबत, शाळेत जाण्याबाबत पालकांना प्रचंड काळजी असते. यातील सर्वांत मोठे आव्हान असते ते मुलाला शाळेपर्यंत पोहोचवणे. दुसरे असते न रडता. तिसरे असते घरामध्ये शांत वातावरण राखून मुलाचं सकाळचं सगळं आवरणं. यादरम्यान होणार्या चुका मुलांवर नकारात्मक परिणाम करतात. तुमचंही मूल शाळेतून आल्यावर उदास, गप्प आणि हरवलेलं असतं का? किंवा टीचर्सकडून वारंवार ऐकावं लागतं का …
Read More »जैविक शेतीची अनोखी यशोगाथा
दीपक सभरवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम, आयसीएमए आणि एमबीए पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी टाटा, पेप्सी आणि जनरल इलेट्रिकसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केले. परंतु, कॉर्पोरेट मिटिंग्स आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधील आयुष्य त्यांना पूर्ण समाधान देत नव्हते. २०१७ मध्ये दीपक यांनी आपले वीस वर्षांचे कॉर्पोरेट करिअर सोडले आणि ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास राजस्थानातील पुष्कर येथे …
Read More »जड झाले ओझे
जागतिक बँकेकडून कर्ज घेणार्या देशांच्या यादीमध्ये भारताचा आता पहिला क्रमांक लागला असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या आहेत. यावरून आता भारत जगातला सगळ्यात मोठा कर्जबाजारी देश बनला असल्याची ओरड सोशल मीडियातून सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही तीच हाकाटी पिटायला सुरुवात केली आहे. एका माहितीनुसार, जागतिक बँकेचे भारतावरील एकूण कर्ज ३९.२८ अब्ज अमेरिकन डॉलर इतके झाले आहे, भारतीय रुपयात हे …
Read More »‘प्लेजर मॅरेज’ चा घातक ट्रेंड
इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश मानला जातो, पण एकेकाळी तिथे हिंदू राजे राज्य करीत होते आणि जनतेचाही बहुतांश भाग हिंदू धर्मीय होता. पुढे काळ बदलला, इस्लामचा प्रसार झाला आणि आज तो एक प्रमुख मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या या देशात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त सामाजिक प्रथा वाढीस लागली आहे, जिला आनंद विवाह किंवा मुताह निकाह …
Read More »शेतकर्यांना ३१,६२८ कोटींचे पॅकेज
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत शेतकर्यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. ओल्या दुष्काळाप्रमाणे ही मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र