लेख-समिक्षण

मौनातून गजर करणारा ‌‘गांधी टॉक्स‌’

आजच्या डिजिटल युगात, जिथे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंची सरबत्ती सतत सुरू असते, तिथे दोन तासांहून अधिक काळ मूक चित्रपट पाहणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. किशोर पांडुरंग बेळेकर दिग्दर्शित ‌‘गांधी टॉक्स‌’ हा असाच एक धाडसी प्रयोग आहे, जो मौनालाच आपली भाषा बनवतो आणि संवादहीनतेला शक्तिशाली कथनाचे साधन म्हणून वापरतो. हा चित्रपट केवळ निव्वळ मनोरंजन नाही, तर तो एक असा अनुभव …

Read More »

कहाणी एका निसर्गवेड्याची

बेंगळुरू सारख्या शहरात आयटीसी इन्फोटेकसारख्या मोठ्या कंपनीत तब्बल एक दशक काम केल्यानंतर शिहाब कुन्हाहम्मद यांनी 2021 मध्ये आपल्या कॉर्पोरेट जीवनाला पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयामागे केवळ निसर्गाची ओढ नव्हती तर पर्यावरणाप्रती असलेली एक खोल बांधिलकी होती. केरळमधील आपल्या आजीसोबत बालपणी झाडे लावताना मिळालेले संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर शिहाब यांनी तामिळनाडूतील शूलगिरी येथील आपल्या शेतावर मुक्काम …

Read More »

कांदा साठवायचा कसा ?

स्वयंपाकघरात वापरला जाणारा कांदा योग्य प्रकारे साठवून ठेवणे खूप गरजेचे असते. पावसाळ्याच्या दिवसांत ओलाव्यामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे कांदा सडण्याची आणि कुजण्याची शक्यता सर्वाधिक असतो. कांदा साठवणुकीची सर्वांत मोठी अडचण म्हणजे तो फ्रिजमध्ये ठेवता येत नाही. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास तो लवकर अंकुरित होतो. अनेकदा त्याला बुरशी येते. असा कांदा वापरणे हानिकारक ठरू शकते. याउलट योग्य साठवणुकीमुळे कांद्याची चव, त्यातील गुणधर्म टिकून …

Read More »

सर्वांत लहान तापमापक

सर्वात लहान किंवा मोठ्या आकाराच्या वस्तू नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्याच्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या काळात अत्यंत सूक्ष्म अशा वस्तूही बनवल्या जात आहेत. वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान तापमापक तयार केलेला असून, तो मानवी केसापेक्षा वीस हजार पटींनी लहान आहे. डीएनएच्या रचनांचा वापर करून तो तयार केला आहे. विशिष्ट तापमानाला घडी घातल्या जाणाऱ्या तर विशिष्ट तापमानाला उलगडत जाणाऱ्या जनुकांचा वापर त्यात …

Read More »

मुंबईच्या तरुणाची मिलानपर्यंत भरारी

मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या 24 वर्षीय शुभम वाडकर या तरुणाने जागतिक फॅशन विश्वात केलेली कामगिरी केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अवघ्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून त्याने ‌’रॅम्प‌’वर पाऊल ठेवले आणि आज तो जागतिक ब्रँड्सचा चेहरा बनला आहे. शुभमने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका बांधकाम कंपनीत नोकरी स्वीकारली होती, जिथे त्याला वार्षिक …

Read More »

रीलवेडात हरवलेला विवेक

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला, तरी त्याचे भीषण परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. समाजमाध्यमांवर स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात माणूस कशा प्रकारे आपल्या विवेकाचा बळी देत आहे, याचे ज्वलंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडलेल्या घटनेतून दिसते. एका महिलेने केवळ रील बनवण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक केले, परंतु दुर्दैवाने तिचा जीव खरोखरच गेला. ही घटना …

Read More »

द्रमुकचे पायही मातीचेच

शाची राजधानी दिल्ली 1 फेब्रुवारी रोजी जेव्हा अर्थसंकल्पीय भाषणाच्या चर्चेत मग्न होती, अगदी त्याच दिवशी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाने आपल्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद केला. 1 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा होती आणि याच दिवशी तामिळ संस्कृतीतील महत्त्वाचा ‌‘थाईपुसम‌’ उत्सव साजरा केला जातो. तामिळनाडूतील धार्मिक जनतेसाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. च दीर्घकाळ स्वतःला नास्तिक म्हणवून घेणाऱ्या द्रमुक पक्षाने …

Read More »

अविश्वास प्रस्तावानंतर विशेषाधिकार भंगाचा खेळ

पक्षपातीपणाचा आरोप करीत ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची सूचना सादर केली आहे. विरोधकांनी मंगळवारी सभापतींविरुद्ध ही सूचना सादर केली. त्यानंतरही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची पोलखोल करीत राहिले. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी खा. राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान झालेल्या ट्रेड डीलवर मोठा …

Read More »

आयात कृषीमालाची टांगती तलवार

भारत-अमेरिका यांच्यातील बहुचर्चित व्यापार करारासंदर्भात सध्या सार्वजनिकरीत्या जी चर्चा सुरू आहे, तिने देशातील शेतकरी संघटनांच्या काळजात धडकी भरवली आहे. त्यांच्या या चिंतेमागे सबळ कारणेही आहेत. देशांतर्गत शेती आधीच मोठ्या संकटात असून, बाजारात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 30 ते 40 टक्के कमी दर मिळत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेतील प्रचंड सबसिडी असलेल्या स्वस्त शेती उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली केल्यास, त्याचे गंभीर परिणाम स्थानिक शेतीवर …

Read More »

महाशिवरात्रीचा बोधार्थ

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री हा हिंदू धर्मियांमध्ये सर्वदूर साजरा होणारा एक महाउत्सव. आध्यात्मिक उन्नती,आत्मबोध आणि विश्वातील लयाचा हा उत्सव शिव आणि शक्तीच्या मीलनाचा सोहळा म्हणूनही साजरा होतो. चेतना आणि ऊर्जा एकरूप होऊन सृष्टीच्या संतुलनाचा संदेश देतात. मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याची ही पर्वणी मानली जाते. आपल्यातील अहंकार आणि षड्रिपूंचा नाश करून आत्मस्वरूपाकडे …

Read More »