बॉलिवूडमध्ये आता केवळ ‘हिरो’ची चलती राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत चरित्र अभिनेत्यांचे (उहरॲरलींशॲ अॲींळीीीं) स्थान कमालीचे भक्कम झाले आहे. एकेकाळी नायकाच्या सावलीत वावरणारे हे कलाकार आता स्वतःच्या खांद्यावर चित्रपट पेलू लागले आहेत. परेश रावल, प्रकाश राज यांच्यापासून ते पंकज त्रिपाठी आणि मनोज बाजपेयींपर्यंतच्या कलाकारांनी हे सिद्ध केले आहे की, अभिनय सकस असेल तर पडद्यावरची ‘स्पेस’ महत्त्वाची नसते, तर भूमिकेची व्याप्ती …
Read More »अभिमान वाटाव्या अशा चार गोष्टी….
कधी-कधी पालकांशी एखाद्या मुद्द्यावरून चर्चा करणारे मुले नकळतपणे बोलून जातात की, तुम्हाला काय माहित किंवा तुम्हाला त्यात काय कळते? असं जेव्हा मुलं किंवा मुली बोलतात तेव्हा पालकांना वाटू लागते की आपला पाल्य मोठा होऊ लागला आहे. परंतु त्याचवेळी मुलांनाहीअसा भास होतो की आपण आता मोठे होऊ लागलो आहेत. आई-वडिलांपेक्षा आपल्याला अधिक कळते किंवा समजते. परंतु स्वत:चा अभिमान बाळगण्यासाठी नोकरी असणे, …
Read More »व्यायाम जरुर करा; पण…
अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यायामाच्या अतिरेकामुळे 24 वर्षांच्या एका तरुणीचे स्नायू तुटण्याचा प्रकार घडला आहे. या युवतीला आधीपासूनच रॅबडोमायोलिसिस नावाचा एक गंभीर विकार होता. या व्याधीमध्ये स्नायू सहजगत्या तुटण्याची शक्यता असते. ती स्पिनिंग नावाचा इनडोअर सायकलिंग एक्सरसाईज करत होती. यामध्ये मुख्यत्वे करुन पायांच्या आणि नितंबांमधील मोठ्या स्नायूंवर मोठा ताण येतो. हा व्यायाम सुरु केल्यानंतर तिने याचे प्रमाण …
Read More »‘एआय’ मुळे विचारक्षमतेवर परिणाम
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरणाऱ्या व्यक्तींच्या टीकात्मक विचारक्षमतेवर परिणाम होत असून, त्यामुळे त्या अधिक अविचारी बनत असल्याचा इशारा एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि कार्नेजी मेलॉन विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनात असे आढळून आले की, जे वापरकर्तेएआयच्या अचूकतेवर जास्त विश्वास ठेवतात, ते त्या साधनांच्या निष्कर्षांचा कमी विचार करतात. हे संशोधन व्यवसाय, शिक्षण, कला, प्रशासन आणि संगणक क्षेत्रातील 319 व्यावसायिकांवर आधारित आहे. …
Read More »पोलिओग्रस्त मुलगी ते यशस्वी उद्योजिका
संकटे माणसाला संपवायला येतात की नवी उभारी द्यायला, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते आणि हेच पाटण्याच्या ममता भारती यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओने शरीराची साथ सोडली आणि संपूर्ण शरीर जवळपास अर्धांगवायूने ग्रासले गेले, मात्र मनाची उभारी तसूभरही कमी झाली नव्हती. पाटण्यातील अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही जेव्हा डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा …
Read More »सावळागोंधळ
महापालिका निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर करेपर्यंत जो ओंगाळवाणा प्रकार पाहायला मिळाला त्यातून राजकारण या प्रकाराविषयीच लोकांच्या मनात तिटकारा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे. कोणाचाही कोणाला पायपोस नाही अशीच स्थिती सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर 15 तारखेला मतदानाला जाताना मतदारांचीच आता कसोटी लागणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अगदी आयत्या वेळेला या पक्षातून त्या पक्षात …
Read More »हुंडाबंदी कायद्यांबाबत आत्मचिंतनाची गरज
उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध अजमल बेग या प्रकरणात नुकत्याच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 498-अ आणि 304-ब तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 च्या कलम 2/4 अंतर्गत प्रतिवाद्यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार केला. यावेळी न्यायालयाने नमूद केले की, हुंड्याची व्यापक समस्या, संबंधित कायद्यांची अप्रभावकता आणि कलम 498-अ व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा …
Read More »मतदानापूर्वीच भाजपचे सहा उमेदवार अविरोध
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतमोजणी होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले आहे. मनपा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच कल्याण-डोंबिवली मनपात तीन उमेदवार व धुळेमध्ये दोन आणि पनवेल मनपात एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 29 महापालिकांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळत आहेत. अशातच भाजपाला …
Read More »उत्तीर्णांच्या गर्दीमागचा अंधार
केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये देशभरातून सुमारे 50 लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, असे समोर आले आहे. यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग’ च्या माध्यमातून त्यांना संजीवनी देण्याची योजना सरकारने आखली आहे. परंतु इतक्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण का होतात? गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील शाळा-महाविद्यालयांच्या …
Read More »ताम्रधातूची लकाकी कशामुळे?
जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या एका वर्षात सोन्याने 70 ते 80 टक्के परतावा दिला असताना चांदीने तर 140 टक्क्यांच्या आसपास झेप घेत सर्वांनाच चकित केले आहे. मात्र, आता या शर्यतीत ‘तांबे’ अर्थात कॉपरनेही आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून तांब्याचे दर अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. केवळ औद्योगिक वापरासाठी मर्यादित न राहता …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र