लेख-समिक्षण

विशेष

इस्त्रोच्या भरारीचा अन्वयार्थ

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन स्पेडेक्स मिशन ही केवळ एक तांत्रिक उपलब्धी नाही तर ते अंतराळातील भारताचे योगदान देखील दर्शवते. ही एक नवीन उपलब्धी आहे. या मिशनचे मुख्य कार्य दोन अंतराळ यानांना डॉक करणे (जोडणे) हे आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे कौशल्य वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. डॉकिंग तंत्रज्ञान ऊर्जा पर्यायांवर तसेच उच्च-तंत्रज्ञान मार्गदर्शन प्रणालींवर आधारित आहे. केवळ सध्याच्या मोहिमांसाठीच महत्त्वाचे …

Read More »

पाकिस्तानवर काळ उलटला!

एकेकाळी संपूर्ण जगभरात दहशतवादी हिंसाचाराने थैमान घालणार्‍या तालिबानला अस्र-शस्रांपासून लष्करी प्रशिक्षण देण्यापर्यंत सर्वतोपरी मदत करणार्‍या पाकिस्तानवर आता हा भस्मासूर उलटला आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानी राजवट परतल्यावर या टापूत आपल्याला हवे तसे आपण करू, अशा आविर्भावात पाकिस्तान होता. परंतु तालिबान्यांनी पाकिस्तानलाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 2024 या वर्षातच पाकिस्तानात आठशेहून अधिक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात सुमारे एक हजार …

Read More »

राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी परभणीत जाऊन सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर …

Read More »

एका पर्वाची अखेर

भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक प्रदीप के. लाहिरी यांच्या ‘अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन: अ पब्लिक सर्व्हंट रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रामध्ये मनमोहन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांचे भारतीय इतिहासातील योगदान पंतप्रधान म्हणून न राहता भारताचे अर्थमंत्री म्हणून अधिक …

Read More »

नदीजोड प्रकल्पातून विकासगंगा

महाराष्ट्रात नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नद्या जोड प्रकल्पाचा संकल्प बोलून दाखवला आहे. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान यादरम्यान वाहणार्‍या पार्वती, कालीसिंध आणि चंबळ नद्यांचे पाणी हे मोठा जलस्रोत म्हणून पाहिले जाते. या नद्यांना जोडण्यासाठी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडप्रकल्पाच्या अभियानाची संकल्पना …

Read More »

डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलून अमित शहा वादात

डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलणे एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…..एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता, असे केंद्रीय मंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले. हे बोलल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरला झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्या समर्थनार्थ सहा ट्विट केले. तर स्वत: गृहमंत्री शहा यांनी पत्रपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यांच्या विधानाचे …

Read More »

मुद्यांपासून भरकटलेले अधिवेशन

नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात आतापर्यंत जे काही पाहायला मिळाले त्यावरुन जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याविरोधात विरोधकांनी दिलेली अविश्वास प्रस्तावाची नोटीस ही भारतीय संसदेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. या प्रस्तावाचा सरळसरळ अर्थ देशाच्या उपराष्ट्रपतींवर अविश्वास व्यक्त करणे आहे. संविधानावरील चर्चा असेल किंवा अदानींचा मुद्दा असेल, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी कामकाजाबाबत …

Read More »

तबला पोरका झाला…

तबला या वाद्यसंगीतातील महत्त्वाच्या वाद्याला जगभरात प्रसिद्धी, लोकप्रियता आणि सन्मान मिळवून देण्याचं अद्वितीय कार्य करणार्‍या पंडित झाकीर हुसेन यांच्या निधनाची वार्ता अखेरच्या क्षणापर्यंत अफवा ठरावी असं असंख्य जणांना वाटत होतं. पण अखेर ती खरी ठरली आणि नियतीनं एक महान तबलावादक आपल्यातून हिरावून नेला. तबला म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन हे समीकरण वर्षानुवर्षं आपल्याकडं पहायला मिळतं यातच त्यांचं श्रेष्ठत्व दडलेलं आहे. त्याचबरोबर …

Read More »

पहिल्यांदाच सभापतींविराधात अविश्वास

महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणार्‍या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्या महिलांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेत अपात्र ठरविले जाणार आहे. त्याकरिता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील दोन कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला …

Read More »

कायदा-सुव्यवस्थेबाबतच्या अपेक्षापूर्तीसाठी…

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात. धनखड हे सभागृहात आपल्याला बोलू देत नाही. सभापती हे पक्षपाती भूमिका घेत वावरत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेच्या सभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारीही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेतही झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात …

Read More »