लेख-समिक्षण

जितके भूकंप, तितके जमिनीत सोने

सर्वांत विध्वंसक नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंपाचा समावेश होतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे भूकंप होणे अर्थातच कोणालाही नको असते; मात्र याच भूकंपामुळे सोन्याची निर्मिती होते, हे फार कमी जणांना माहिती असेल. शास्त्रज्ञांनी याबाबत मोठा शोध लावला आहे. भूकंपामुळे क्वार्टझ्? (सिलिकॉन डायऑक्साईडपासून तयार झालेलं खनिज) क्वार्ट्झमधून जाणार्‍या फ्रॅक्चर लाइन्समध्ये सोन्याचे गोळे तयार होतात, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. क्वार्टझ् …

Read More »

महान वैज्ञानिकाची प्रेरक यशोगाथा

मायकेल फेराडे यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 रोजी इंग्लंडमधील न्यूग्टिंन बट्स येथे एका गरिब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मायकेल यांना लहान वयातच काम करावे लागले. त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही. दारिद्य्रामुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले. मात्र, ज्ञानाची भूक असणार्‍या फेराडे यांनी पुस्तके वाचून …

Read More »

आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांपुढील

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानंतर हवेत असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नाना पटोले यांनी आपल्याला अध्यक्षपदावरुन मुक्त करावे, असे काँग्रेस नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या भेटी घेऊन सांगितले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे लांबणीवर टाकले. दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. …

Read More »

शिणवठ्याचं चक्र

माणसाचं काम हलकं करण्यासाठी, त्याला अधिक सुख देण्यासाठी मशीन रोज ‘अपडेट’ होत राहिलं. आता तर मशीन माणसासारखंच जगू लागलंय. तरीसुद्धा माणसाला माणसासारखं का जगता येत नाहीये? मशीनचा माणूस होत असताना माणूस मशीनसारखा का होत चाललाय? अनेक माणसांचं काम एकच मशीन करतंय, तर माणसाचं काम डिप्रेशन येण्याइतकं का वाढतंय? त्याच्याकडून कधी आठवड्याला सत्तर तास तर कधी नव्वद तास कामाची अपेक्षा का …

Read More »

दिल्लीमध्ये पुन्हा महिलाराज

दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे. आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रामलीला मैदानात शपथ घेतली. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी दिवंगत काँग्रेसच्या शिला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांनी काम केले आहे. रेखा गुप्ता तिसर्‍या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षातील दिग्गजांना मागे टाकून त्यांनी खुर्ची मिळवली …

Read More »

आव्हान संकटग्रस्त बँकाचे

महाराष्ट्रातील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता ग्राहक सहा महिन्यांपर्यंत बँकेतून पैसे काढू शकत नाहीयेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँक ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. यानिमित्ताने रिझर्व्ह बँक कोणत्याही बँकेवर निर्बंध का लादते? एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्या बँकेत जमा असलेल्या ग्राहकांच्या ठेवींचे काय होते? ग्राहकांनी काय …

Read More »

व्यवस्थापनाचा ‘कुंभ’ रिकामाच!

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दिवाळी, छटपूजेच्यावेळी गर्दीचा उच्चांक राहिलेला आहे आणि चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आहे. पण त्यावेळी जखमींची संख्या फारशी नसल्याने पुढे फार उपायांची आवश्यकता रेल्वेला वाटली नाही. पण यावेळी कुंभमेळ्याला जाणार्‍या भाविकांनी गर्दीचे उच्चांक मोडले आणि दुर्घटना घडली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी छटपूजेच्या वेळी देखील अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वेने छटपूजेच्या काळात रेल्वे …

Read More »

उत्सुकता ‘डब्बा कार्टेल’ची

नेटफिल्क्सवर डब्बा कार्टेल या नव्या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिरीजचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केले असून सिरीजमध्ये सहा मध्यमवर्गीय महिलांची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. ज्योतिका आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. सई पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज 28 फेब्रुवारीला नेटफिक्सवर रिलीज केली जाणार आहे. पाच मध्यमवर्गीय महिला आपले नेहमीचे जीवन जगत …

Read More »

देवीयों और सज्जनो…

भरपूर मसाला असणार्‍या कौटुंबिक कथानकांवर आणि पौराणिक साहित्यावर आधारीत मालिकांनी प्रदीर्घ काळ छोट्या पडद्यावर राहण्याचा विक्रम केल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु सलग अडीच दशकं टिव्हीवर चालणारा ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा कदाचित एकमेव गेम शो असावा. एखादी मालिका टिव्हीवर सुरू असेपर्यंतच ती प्रेक्षकांच्या ध्यानात राहते. पण केबीसी याला अपवाद ठरले. वर्षांत दोन ते अडीच महिने या कार्यक्रमाचे प्रसारण होते …

Read More »

एक्सरसाईजनंतर हात थरथरतात?

फिट आणि फाईन राहणं हे प्रत्येक तरुण-तरुणींची सर्वांत आवडती बाब असते. अलीकडील काळात हेल्थअवेअरनेस प्रचंड वाढला आहे. यासाठी अनेकजण एक्सरसाईज करतात. जीममध्ये घामही गाळला जातो. अनेकदा जीममध्ये वजन उचलल्याने किंवा एक्सरसाईज केल्याने काहींंचे हात थरथरू लागतात. वर्कआउटनंतर हात थरथरणं ही बर्‍याच लोकांना जाणवणारी एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र काही वेळाने हात स्वत:हून थरथरणं आपोआप थांबतं. जेव्हा आपण व्यायाम करतो …

Read More »