लेख-समिक्षण

रोबोटिक नी रिप्लेसमेंट का फायद्याची?

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत लिफ्टचा वापर, दीर्घकाळ नियमित गाडीवर फिरणे, पोषणतत्वरहीत आहाराचे दीर्घकाळ सेवन, लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे अलीकडील काळात सांधेदुखीची समस्या भेडसावणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः आपल्याकडे महिलांना स्वयंपाकादी कामांसाठी आयुष्यातील अनेक वर्षे दररोज ओट्यापुढे बरेच तास उभे राहावे लागते. तसेच घरातील कष्टाची कामे करावी लागतात. तरुणपणात या सर्वांचे परिणाम जाणवत नाहीत; मात्र शरीर वृद्धत्वाकडे झुकू लागले …

Read More »

चिनू कालाः संघर्षातून यशाकडे झेप

उद्योजकतेची खरी ओळख म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवत, अपयशांवर मात करत यशाची नवी उंची गाठणं. अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे चिनू काला यांची जी एकेकाळी घराघरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी एक साधी मुलगी होती आणि आज रुबन्स अ‍ॅक्सेसरीज या प्रसिद्ध ब्रँडची संस्थापक आहे. चिनू काला यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. केवळ 15 व्या वर्षी, कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी घर सोडलं. हातात पैसा नव्हता, …

Read More »

बनावट डॉक्टरांचे आव्हान

भारतातील आरोग्य व्यवस्था ही अनेक आव्हानांनी ग्रासलेली आहे. त्यात सर्वाधिक गंभीर आणि धोकादायक बाब म्हणजे बनावट डॉक्टरांचे वाढते प्रमाण. ग्रामीण भागांपासून ते शहरांतील झोपडपट्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी वैद्यकीय शिक्षण, परवाना किंवा पात्रता नसलेले लोक ‘डॉक्टर’ म्हणून रुग्णांवर उपचार करताना आढळतात. या प्रकारामुळे रुग्णांचे आरोग्य, जीवन आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था धोक्यात येते आहे. बनावट डॉक्टरांविषयी अनेकदा चिंता व्यक्त केली गेली आहे. मात्र …

Read More »

अधिवेशनातून काय साधले?

काँग्रेस पक्षाचे अधिवेशन गुजरातमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर झालं. अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रियंका गांधींची अनुपस्थिती कार्यकर्त्यांसाठी केवळ निराशाजनक आणि आश्चर्यजनक नव्हती, तर ती रहस्यमयही ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेससमोरील मोठी समस्या ही आहे की तिच्याकडे गुजरातमध्ये मूळचा असा एकही नेता नाही, जो मुख्यमंत्रीपदासाठी सशक्त उमेदवार ठरू शकेल. तरीही काँग्रेस किंवा राहुल गांधी आपली लढाई गुजरातमध्ये केंद्रित करून ‘राजा’लाच …

Read More »

तपासाची ‘दशा ’

एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण …

Read More »

40 हजारांसाठी मृतदेह 6 तास अडवला

पुण्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही रुग्णासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह 40 हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी घडला. शिवसेना (उबाठा) पदाधिकार्‍यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय 68) या 5 एप्रिल रोजी घरात पाय घसरून …

Read More »

अवकाळीनं मोडले कंबरडे

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वार्‍यांचा संगम होऊन मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातल्याचे दिसून आले. या पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. यादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास 1400 हेक्टरवरील पीकाला याचा फटका बसला आहे. बेमोसमी पाऊस आणि त्यामुळे शेतीचे आणि शेतकर्‍यांचे …

Read More »

कमाईचा नवा विक्रम

विक्की कौशलचा ’छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली विजयी घोडदौड कायम ठेवून आहे. रेकॉर्ड तोडण्याची त्याची भूक अद्याप संपलेली दिसत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडणारा हा चित्रपट सहाव्या वीकेंडनंतरही जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रिलीज होऊन आज 39 दिवस पूर्ण झाले आहेत. आज या चित्रपटाने बॉलीवुडमधील जवळपास सर्व मोठ्या चित्रपटांच्या आजीवन कमाईला मागे टाकलं आहे, फक्त शाहरुख खानचा …

Read More »

महान नायकाचा विराम

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आणि खास करुन युद्धाच्या काळात आलेल्या देशभक्तीपर चित्रपटांच्या लाटेचे प्रमुख नायक म्हणून मनोज कुमार यांनी अग्रस्थान पटकावले. त्यांच्या चित्रपटांनी समाजातील विविध समस्यांचे, विशेषत: देशभक्ती आणि संघर्षाचे मुद्दे उठवले. पूरब और पश्चिम, रोटी, कपड़ा और मकान आणि क्रांति यासारख्या चित्रपटांतून त्यांनी …

Read More »

विद्युतवाहन क्षेत्रात करिअर करायचंय?

इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि वेगाने वाढणारा क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट कौशल्ये आणि गुणधर्म असणे आवश्यक आहे. 1. तांत्रिक कौशल्ये: ईव्ही तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आणि त्यात पुढे जाण्यासाठी काही तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची आहेत. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ज्ञान: इलेक्ट्रिक वाहने मुख्यतः बॅटरी, मोटर, नियंत्रक आणि सेन्सरवर कार्य करतात. त्यामुळे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स …

Read More »