पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये …
Read More »अघोषित युध्दातील वज्राघात
भारताच्या एअरस्ट्राईकनंतर जनतेमधील प्रतिमा टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला भारताविरुद्ध कारवाई करणे अपरिहार्य होते. पण या कारवाईला भारताच्या अत्याधुनिक शस्रसामग्रीने आणि लष्कराच्या अचूक नियोजनामुळे पूर्णतः निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानची क्षेपणास्रे, ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आली. एक विमान पाडण्यात आले. यावरुन पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलेला असावा. काही अभ्यासकांच्या मते, ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे. पण मागील तीन युद्धांप्रमाणेच याही वेळी भारत …
Read More »वैशिष्ट्ये ऐतिहासिक कारवाईची
पहलगाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्याला भारत प्रत्युत्तर कधी देणार, या प्रश्नाचे उत्तर मॉकड्रीलसाठी निवडलेल्या ७ मे रोजी पहाटे सबंध देशाला मिळाले. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून सुमारे १०० हून अधिक दहशतवादी यामध्ये मारले गेले आहेत. ‘ऑपरेशन सिंदुर’ असे अत्यंत मार्मिक नाव देऊन आखण्यात आलेले हे मिशन अत्यंत नियोजनबद्धरित्या यशस्वी करण्यात आले. हा भारताने केलेला हल्ला नसून …
Read More »अभिनेत्री ते आयएएस
कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत …
Read More »तंत्रज्ञानाने बॉलिवूडचा कायापालट!
अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. …
Read More »पहिल्याच प्रयत्नात बनला आयएएस
राजगड तालुक्यातील पानशेत रोडवरील रुळे गावचा शिवांश सुभाष जागडे याने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळवित देशात 26 वे स्थान मिळविले. राजगड ( वेल्हे ) तालुक्यातील पानशेत रस्त्यावरील रुळे हे त्याचे मूळ गाव सध्या तो आई-वडिलांसह वडगाव बुद्रुक मध्ये वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील शेती करतात तर आई शिवणकाम करते आणि बहीण वकील आहे. या …
Read More »जीमेलमध्ये नवे फीचर
गुगलने जीमेल वापरणार्यांसाठी ‘मॅनेज सबस्क्रिप्शन’ नावाचे एक अतिशय उपयुक्त फिचर सुरू केलं आहे. या फिचरच्या माध्यमातून वापरकर्तेआता एका क्लिकमध्ये कोणत्याही इमेल सबस्क्रिप्शनमधून सहजपणे बाहेर पडू शकतात. एवढंच नव्हे, तर एखाद्या ईमेल आयडीकडून आतापर्यंत तुम्हाला किती इमेल आले आहेत, याचीही माहिती यामध्ये मिळेल.सध्या हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहे. लवकरच हे फिचर आयओएष आणि वेब वापरकर्त्यांसाठीही लागू …
Read More »सर्वांत आव्हानात्मक विमानतळ
जगभरात अनेक अनोखी विमानतळं आहेत. सेंट मार्टिनच्या माहो बीचवर तर अक्षरशः लोकांच्या डोक्याजवळून उडत जाऊन विमाने विमानतळावर उतरतात. काही विमानतळांवर लँडिंग करणे, हे अतिशय जिकिरीचे काम असते. असाच एक विमानतळ हिमालयाच्या कुशीतील भूतान देशात आहे. या विमानतळावर विमान उतरवण्याचे धाडस केवळ निवडक 50 वैमानिकच करू शकतात! चारही बाजूंनी हिमालयाच्या पर्वतशिखरांच्या कोंदणात असणारं हे विमानतळ जगातील सर्वाधिक आव्हानात्मक विमानतळ मानलं जातं. …
Read More »यशोरहाणी संघर्षशील लेखकाची
ही 19 व्या शतकातील कथा आहे. रशियातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाची करुण संघर्षकहाणी आहे. या मुलाला वाचन आणि लेखनाची खूप आवड होती. जर त्याला कळले की एखाद्याकडे चांगले पुस्तक आहे, तर तो कठोर परिश्रम करून ते मागवत असे. लोकांच्या तिरस्काराची आणि थट्टेची पर्वा न करता, तो रात्री वॉचमन म्हणून काम करायचा आणि जेव्हा – जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा …
Read More »चतुरस्र विज्ञानयात्री
भारताच्या अवकाश विज्ञान क्षेत्राला आंतरराष्ट्रीय उंचीवर नेणार्या डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन या विज्ञानयात्रीची प्राणज्योत नुकतीच मालवली. 1994 ते 2003 या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष म्हणून काम करताना डॉ. कस्तुरीरंगन यांनी भारताचा अंतराळ कार्यक्रम आत्मनिर्भरतेकडे गेला. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल चं यशस्वी प्रक्षेपण आणि जीसॅट मालिका उपग्रहांच्या माध्यमातून कम्युनिकेशन क्षेत्रातील क्रांती, ही याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयआरएस …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र