भारतात धार्मिक आयोजनात किंवा धार्मिक स्थळाबाहेर चप्पल चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात. काहीवेळा चप्पल चोरी ही हसण्यावरी नेण्यात येते. मात्र भारताच्या-विशेषतः महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची चोरी ही एका आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीने केली आहे. ही चोरी वस्तुरुपातून नसून त्याच्या मालकीची, स्वामित्वाची आहे. यावर माध्यमातून आवाज उठविल्यानंतर कंपनीने रॅम्पवॉकमध्ये वापरलेली चप्पल ही याबाबत तातडीने कोल्हापुरी चप्पलेपासून प्रेरणा घेतच तयार केलेली होती, हे …
Read More »अमिताभ बनणार जटायू
बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजवर रामाच्या भूमिकेत वावरलेले अरुण गोविल हे या चित्रपटात दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर अमिताभ बच्चन जटायू बनणार आहेत. दोन भागात प्रदर्शित होणार्या ‘रामायणात’ राम म्हणून रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसतील. रावणाची भूमिका …
Read More »बॉलीवूडची पिछेहाट, ‘साऊथ’ सुसाट
असं म्हटलं जातं की जगात फक्त सातच कथा आहेत, ज्या वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा-पुन्हा सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये सातच चेहरे वारंवार समोर येतात. अक्षय कुमार, तिन्ही खान, दीपिका पदुकोण, कपूर कुटुंब आणि करण जोहर. हे लोक एकाच कथेला वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा सांगतात. ही म्हण अलीकडे खरी ठरली, जेव्हा ‘हाऊसफुल ५’च्या ओपनिंग शोच्या वेळी पीव्हीआर ऑडिटोरियम पूर्णतः ओस दिसले. वरवर पाहता प्रमुख …
Read More »पहिल्यांदा बाबा बनताय?
ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव घेतो. भावनिक चढउतार आणि शारीरिक थकव्यासोबतच, नव्याने वडील बनलेल्या पुरुषांना अनेक प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागतो. बाळाची निगा राखणे, पत्नीला मदत करणे आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणे यांबरोबरच घराची जबाबदारी त्याच्यावर असते. अशा परिस्थितीत वडील होणे हे मानसिक ताण वाढवणारे …
Read More »अतिसंरक्षणात्मक पालकत्व नकोच!
आजकाल अशा अनेक बातम्या येत असतात ज्यात मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकणारी मुलं आयुष्याच्या छोट्या संघर्षांसमोर हरतात. व्यावहारिक ज्ञानाच्या अभावामुळे ते त्यांच्या जीवनात आणि नातेसंबंधात सुसंवाद राखू शकत नाहीत. असे का घडते? याचे कारण पालकांचे अतिसंरक्षणवादी कवच. व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांचे संरक्षणात्मक वर्तुळ आवश्यकच आहे, परंतु ते केवळ एका मर्यादेपर्यंत. त्यापलीकडे जाऊन बालपणातील स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची संधी देखील मुलांना मिळायला हवी. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ …
Read More »क्यूआर कोड प्रणालीच्या अंतरंगात
आजकाल ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपट्टी चालवणार्या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जाते. एक वेळ अशी होती की, क्वचितच कोणी ऑनलाईन पेमेंट वापरायचे. शिवाय मोठ्या व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंट वापरले जायचे. पण आता अगदी एक रुपयाचे ऑनलाईन व्यवहारदेखील केले जाऊ शकते. पण आता यासंदर्भात असा प्रश्न उपस्थित झाला की, सर्व क्यूआर कोड सारखेच दिसतात, असे जगात लाखो प्रकारचे क्यूआर कोड …
Read More »संघर्षगाथा स्टॅलोनची
सिल्वेस्टर स्टॅलोन यांचा जन्म ६ जुलै १९४६ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. जन्माच्या वेळी डॉटरांच्या चुकीमुळे त्यांच्या चेहर्याच्या खालच्या बाजूला, विशेषतः ओठ आणि जिभेच्या भागात पक्षाघात झाला. त्यामुळे त्यांची बोलण्याची शैली अर्धवट झाली आणि चेहर्यावर कायमस्वरूपी लकवा राहिला. हे अपंगत्व त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या सोबत राहिले. पण त्यांनी कधीही तिला शरमेची बाब समजली नाही. स्टॅलोनचं बालपण खूप अशांत होतं. त्यांच्या …
Read More »‘लालपरी’ला गरज आर्थिकदृष्ट्या सक्षमतेची
राज्यात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आर्थिक संकटात सापडलेले हे महामंडळ गत ४५ वर्षांत फक्त ८ वेळाच नफ्यात होते. ‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’ या घोषवाक्यांसह मिरवणारे हे महामंडळ सध्या १० हजार कोटींच्या वर संचित तोटा सहन करत आहे. महामंडळाची प्रकृती सुधारण्यासाठी, महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शविणारी श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली …
Read More »क्लस्टर बॉम्बचा थरार
इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष नुकताच शमला. पण या संघर्षात इराणने लस्टर बॉम्बचा वापर केल्याची माहिती समोर आहे.हा बॉम्ब सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवण्यासाठी ओळखला जातो. लस्टर बॉम्ब म्हणजे काय? लस्टर बॉम्ब हा अनेक लहान बॉम्ब एका मोठ्या क्षेत्रावर टाकण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. हा बॉम्ब थेट लक्ष्यावर स्फोट करण्याऐवजी हवेतच उघडतो आणि संपूर्ण भागात छोटे-छोटे बॉम्ब टाकतो. हे …
Read More »अंतराळवीर शुभांशू शुलांनी रचला इतिहास
१९८४मध्ये भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे अवकाश मोहीमेवर गेले होते. त्यानंतर आता भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुला यांनी २५ जून रोजी दुपारी १२.०१ वाजता इतिहास रचला. शुभांशू शुला यांनी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘अॅसिऑम-४’ या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले आहे. नासाचे फॉल्कन-९ हे यान अवकाशात झेपावले आणि …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र