काळानुसार सायबर गुन्हेगारांनी हॅकिंग आणि चोरी करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे. त्यामुळे या हल्ल्यापासून कोणीही वाचू शकत नाही, असे म्हटले जात आहे. मग एखाद्याने चूक केलेली असो किंवा नसो. एवढेच नाही तर या सायबर गुन्हेगारांनी पोलिसांना देखील सोडलेले नाही. खात्यातून पैसे गायब करण्याबरोबरच संवेदनशील माहिती चोरण्यासाठी अहोरात्र काम करणारे सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सजगता हवीच, त्याचवेळी ऑनलाइन असताना …
Read More »व्हॉट्सअपची कोलांटउडी
व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना कोणत्याही प्रकारचे खेळ. म्हणजेच सतत जाहीरातींचा मारा करणारे अन्य मेसेंजिग प्लॅटफॉर्म जसे फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे आमचे प्लॅटफॉर्म नसेल. अर्थात या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसणार्या जाहीरातींनी युजर त्रस्त झाले आहेत. फेसबुकने २०१४ रोजी व्हॉट्सअप ताब्यात घेतले आणि तेव्हापासून त्यांनी जाहीरात न दाखविण्याचे दिलेले आश्वासन पाळले. मात्र आता …
Read More »१.३५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता
राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या गु्ंतवणूक प्रस्तावांना बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे एक लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उद्योग विभागांतर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत व विकसनशील …
Read More »श्रीमंतीदर्शनाचा हुकमी एक्का
माणूस इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा असला तरी मानवीसमूहांमध्येही मी वेगळा आहे, खास आहे हे दाखवण्याची मानसिकता त्याच्यात असते. यासाठी जमेल त्या मार्गाने आपल्या सामर्थ्याचे, संपत्तीचे दर्शन घडवणारे अनेक जण समाजात दिसतात. यामध्ये आलिशान गाड्या, भव्यदिव्य विवाहसोहळे, याबरोबरीने वाहनांसाठीच्या व्हीआयपी नंबरप्लेटही मोलाची भूमिका बजावतात. भारतात अलीकडील काळात या नंबरप्लेटसाठी हजारो नव्हे तर लाखो रुपये मोजण्यास तयार असणारा एक वर्ग तयार झाला आहे. …
Read More »कहाणी कोल्हापुरी चप्पलचोरीची
भारतात धार्मिक आयोजनात किंवा धार्मिक स्थळाबाहेर चप्पल चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात. काहीवेळा चप्पल चोरी ही हसण्यावरी नेण्यात येते. मात्र भारताच्या-विशेषतः महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची चोरी ही एका आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीने केली आहे. ही चोरी वस्तुरुपातून नसून त्याच्या मालकीची, स्वामित्वाची आहे. यावर माध्यमातून आवाज उठविल्यानंतर कंपनीने रॅम्पवॉकमध्ये वापरलेली चप्पल ही याबाबत तातडीने कोल्हापुरी चप्पलेपासून प्रेरणा घेतच तयार केलेली होती, हे …
Read More »अमिताभ बनणार जटायू
बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजवर रामाच्या भूमिकेत वावरलेले अरुण गोविल हे या चित्रपटात दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर अमिताभ बच्चन जटायू बनणार आहेत. दोन भागात प्रदर्शित होणार्या ‘रामायणात’ राम म्हणून रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसतील. रावणाची भूमिका …
Read More »बॉलीवूडची पिछेहाट, ‘साऊथ’ सुसाट
असं म्हटलं जातं की जगात फक्त सातच कथा आहेत, ज्या वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा-पुन्हा सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये सातच चेहरे वारंवार समोर येतात. अक्षय कुमार, तिन्ही खान, दीपिका पदुकोण, कपूर कुटुंब आणि करण जोहर. हे लोक एकाच कथेला वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा सांगतात. ही म्हण अलीकडे खरी ठरली, जेव्हा ‘हाऊसफुल ५’च्या ओपनिंग शोच्या वेळी पीव्हीआर ऑडिटोरियम पूर्णतः ओस दिसले. वरवर पाहता प्रमुख …
Read More »पहिल्यांदा बाबा बनताय?
ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव घेतो. भावनिक चढउतार आणि शारीरिक थकव्यासोबतच, नव्याने वडील बनलेल्या पुरुषांना अनेक प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागतो. बाळाची निगा राखणे, पत्नीला मदत करणे आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणे यांबरोबरच घराची जबाबदारी त्याच्यावर असते. अशा परिस्थितीत वडील होणे हे मानसिक ताण वाढवणारे …
Read More »अतिसंरक्षणात्मक पालकत्व नकोच!
आजकाल अशा अनेक बातम्या येत असतात ज्यात मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकणारी मुलं आयुष्याच्या छोट्या संघर्षांसमोर हरतात. व्यावहारिक ज्ञानाच्या अभावामुळे ते त्यांच्या जीवनात आणि नातेसंबंधात सुसंवाद राखू शकत नाहीत. असे का घडते? याचे कारण पालकांचे अतिसंरक्षणवादी कवच. व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांचे संरक्षणात्मक वर्तुळ आवश्यकच आहे, परंतु ते केवळ एका मर्यादेपर्यंत. त्यापलीकडे जाऊन बालपणातील स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची संधी देखील मुलांना मिळायला हवी. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ …
Read More »क्यूआर कोड प्रणालीच्या अंतरंगात
आजकाल ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपट्टी चालवणार्या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जाते. एक वेळ अशी होती की, क्वचितच कोणी ऑनलाईन पेमेंट वापरायचे. शिवाय मोठ्या व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंट वापरले जायचे. पण आता अगदी एक रुपयाचे ऑनलाईन व्यवहारदेखील केले जाऊ शकते. पण आता यासंदर्भात असा प्रश्न उपस्थित झाला की, सर्व क्यूआर कोड सारखेच दिसतात, असे जगात लाखो प्रकारचे क्यूआर कोड …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र