राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतमोजणी होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले आहे. मनपा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच कल्याण-डोंबिवली मनपात तीन उमेदवार व धुळेमध्ये दोन आणि पनवेल मनपात एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 29 महापालिकांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळत आहेत. अशातच भाजपाला …
Read More »TimeLine Layout
January, 2026
-
4 January
उत्तीर्णांच्या गर्दीमागचा अंधार
केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये देशभरातून सुमारे 50 लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, असे समोर आले आहे. यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग’ च्या माध्यमातून त्यांना संजीवनी देण्याची योजना सरकारने आखली आहे. परंतु इतक्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण का होतात? गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील शाळा-महाविद्यालयांच्या …
Read More » -
4 January
ताम्रधातूची लकाकी कशामुळे?
जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या एका वर्षात सोन्याने 70 ते 80 टक्के परतावा दिला असताना चांदीने तर 140 टक्क्यांच्या आसपास झेप घेत सर्वांनाच चकित केले आहे. मात्र, आता या शर्यतीत ‘तांबे’ अर्थात कॉपरनेही आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून तांब्याचे दर अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. केवळ औद्योगिक वापरासाठी मर्यादित न राहता …
Read More »
December, 2025
-
28 December
इमरानचं ‘पुनरागमन’
बॉलीवूडचा ’सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मीने आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गंभीर दुखापत आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच इमरान ’आवारापन 2’च्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला असून, सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे काम जोमाने सुरू आहे. ॲक्शन सीनदरम्यान झाली होती दुखापत मिळालेल्या माहितीनुसार, ’आवारापन 2’ मधील एका हाय-ऑक्टेन ॲक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना इमरानच्या …
Read More » -
28 December
‘धुरंधर’ची घोडदौड कशामुळे?
रणवीर सिंगसह सहकलाकारांचा दमदार अभिनय, आदित्य धरचे कसलेले दिग्दर्शन आणि ऐतिहासिक घटनांची गुंतलेली गुंफण यांमुळे ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. ‘धुरंधर’ ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाची नांदी आहे. आशयघन मांडणीला तांत्रिक भव्यतेची जोड मिळते, तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडीत निघतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. राष्ट्रवाद, इतिहास आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असल्याने हा …
Read More » -
28 December
टेस्ट युवर ॲबिलिटीज
कोणत्याही क्षेत्रात काही करून दाखवायचं असेल तर त्यात आपला कस लावावा लागतो. आजकाल आयटी क्षेत्राची धूम आहे खरी पण त्यातही फक्त प्रोग्रॅमिंगला महत्व दिलं जातं पण तयार केलेले प्रोग्रॅम नीट सुरू राहतील की नाही याची काळजी करणारंही कोणीतरी लागतं. थोडक्यात तयार सॉफ्यवेअरला टेस्ट करायलाही तेवढंच डोकं लागतं काय? म्हणूनच आजकाल सॉफ्टवेअर टेस्टिंगलाही फार महत्व प्राप्त झालं आहे. बरं यासाठी तुम्हाला …
Read More » -
28 December
सौंदर्यासाठी पेप्टाईडस्चे महत्त्व
दररोज नवनवीन स्किनकेअर घटकांची माहिती आपल्याला मिळत असते. गंमत म्हणजे प्रत्येक घटक त्वचेसाठी लाभदायक असल्याचे सांगितले जाते. यापैकी पेप्टाइडस् हे खरोखरच आपल्या त्वचेसाठी आवश्यक आणि उपकारक असतात. काही वेळा या पेप्टाइडस्सह वापरले जाणारे इतर घटक भ्रामक असू शकतात, पण पेप्टाईडस् स्वतः फायदेशीर असतात. पेप्टाइडस् हे लहान प्रथिनांचे संयुग असून ते अमीनो आम्लांपासून बनलेले असतात. अमीनो आम्ल हे प्रथिनांचे मूलभूत घटक …
Read More » -
28 December
सर्वात महागडे औषध
जगातील सर्वात महागडं औषध कोणतं, हे माहिती आहे का? कोणत्या आजारावरील उपचारासाठी हे औषध वापरलं जातं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंग्लंडमधील एक वर्षाच्या बाळ एडवर्डला एका गुंतागुंतीच्या आजाराने ग्रासले आहे, हे कळाल्यानंतर महागड्या औषधाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या बाळाला ‘एसएमए’ नावाचा आजार झाला. म्हणजेच स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफी ने त्याला ग्रासले. स्पाइनल मस्क्युलर ॲट्रोफीने ग्रस्त असलेल्या त्या मुलावर उपचार करण्यासाठी वापरले …
Read More » -
28 December
पायांनी लिहून मिळवली पदवी दोन्ही हात नसणाऱ्या लक्ष्मीची प्रेरणादायी कहाणी
अनेकदा आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे संपूर्ण आयुष्यालाच दोष देऊ लागतो. परिस्थितीमुळे निराश होतो, स्वतःच्या जीवनाबद्दल हताशा मनात घर करते. प्रत्यक्षात मात्र आपण ठरवले तर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. पण क्षणभर विचार करा, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन्ही हातच नसतील तर ती आनंदाने, समाधानाने सामान्य आयुष्य जगू शकेल का? तिच्या मनात जिद्द तरी निर्माण होईल का? बहुतेकांना याचे उत्तर नकारार्थी वाटेल. …
Read More » -
28 December
कडाका थंडीचा
उत्तर भारताकडून वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यांनी आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दस्तक दिली असून, राज्याच्या बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हिमालयीन पट्ट्यात झालेली जोरदार हिमवृष्टी आणि उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पसरलेल्या दाट धुक्याचा थेट परिणाम आता दख्खनच्या पठारावर दिसून येत आहे. नाशिकमधील निफाडसारख्या भागात पारा आधीच 5 अंशांपर्यंत खाली घसरल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला असून, आगामी काळात संपूर्ण भाग …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







