बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गाणारा गायक अरमान मलिक विवाहबंधनात अडकला आहे. अरमानने त्याची प्रेयसी आशना शॉफसोबत लग्न केले आहे. दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अरमान आणि आशना हे 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला आहे. अखेर …
Read More »मनोरंजन
बॉलिवूडच्या मानगुटीवर ‘डिजिटल लीक’चे वेताळ
सिध्याच्या इंटरनेटयुगात डाटा चोरीला उधाण आले आहे. सिनेसृष्टीही त्यापासून दूर राहिलेली नाहीये. ‘डिजिटल लीकेज’ ही समस्या बॉलीवूडच नव्हे तर जगभरातील सर्वच चित्रपट उद्योगांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एखादा चित्रपट किंवा वेब मालिका लीक झाल्यास टॉकीज सोडा ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. त्याचवेळी लीक म्हणजे फुटलेला चित्रपट आवडला नाही तर त्याबाबत प्रेक्षकांचे नकारात्मक मत तयार होते. म्हणजेच या फुटीचा कळत नकळतपणे …
Read More »तिसरा सीझन लवकरच
अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ’द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचे पहिले दोन्ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या सीरिजचा पहिला सीझन 2019, तर दुसरा सीझन 2021 मध्ये आला होता. त्यामुळे प्रेक्षक तिसर्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता मनोज वाजपेयीनेच पुढच्या सीझनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांनी …
Read More »नव्या वर्षांत नवा धडाका
नव्या वर्षात धमाकेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर साकारलेला ‘छावा’ चित्रपटापासून ते कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’, भूत बंगला, लाहोर-1947 सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतून प्रेक्षकांना ऐतिहासिक कलाकृती तसेच अॅक्शन थ्रिलर, कॉमेडी आणि सिक्वेलही पाहवयास मिळणार आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मावळत्या …
Read More »चार वर्षांची प्रतिक्षा संपली!
2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर लाँच झालेल्या ’पाताल लोक’ या सीरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती. आता 4 वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन 2 चा प्रोमो समोर आला होता. आता पाताल लोक 2 च्या रिलीजची अधिकृत तारीख समोर आली …
Read More »चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी …
Read More »छप्परफाड कमाई
‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत त्याने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. सुमारे 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत आपल्या बजेटपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. एवढेच नाही तर 500 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात जलद प्रवेश करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे. यानंतर …
Read More »लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवले. यामध्ये शोमन राज कपूर यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा आणि दूरदृष्टीचा, संवेदनशीलतेचा ठसा उमटवणार्या राज यांच्या चित्रपटांनी रसिकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर त्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. आपल्या विलक्षण अभिनयक्षमतेनं आणि उत्कट …
Read More »मलायका पुन्हा प्रेमात?
अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडेच मलायकाने पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तिच्यासोबत राहुल विजयनेही या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती स्टेजवर थिरकताना दिसली. स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील …
Read More »बालपटांची उपेक्षा
बॉलिवूडच्या आजवरच्या प्रवासामध्ये बालचित्रपटांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. चित्रपटातील नायकांचे बालपण प्रभावीपणे रेखाटले जाते, मात्र एकप्रकारे नायकाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लहान मुलांच्या पात्रांचा उपयोग केला जातो. कृष्णधवलपासून ते आतापर्यंतच्या काळात असंख्य बालचित्रपट येऊन गेले. किंबहुना मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या बाल चित्रपटांनी काहीवेळा यशही मिळवले, परंतु ते मर्यादित राहिले. काहींची गाणी गाजली तर काहींवेळा व्यक्तिरेखा. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र