लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

May, 2025

  • 11 May

    प्रेरणादायी रणरागिणी

    ‘ऑपरेशन सिंदुर’ची माहिती देशाला देताना भारतीय लष्करातील दोन रणरागिणींचे दर्शन घडले. यापैकी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या. सोफिया कुरेशी या गुजरात येथे राहणार्‍या आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केलं आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. तर त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय …

    Read More »
  • 11 May

    ऑपरेशन सिंदूरचे वैशिष्ट्य

    ‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती मांडली. हे तिघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत …

    Read More »
  • 11 May

    ‘झुकानेवाला’ आहेच!

    झुकेगा नही…’ असं म्हणणार्‍या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही. ‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल …

    Read More »
  • 11 May

    भारताने घेतला पहलगामचा बदला

    पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये …

    Read More »
  • 11 May

    अघोषित युध्दातील वज्राघात

    भारताच्या एअरस्ट्राईकनंतर जनतेमधील प्रतिमा टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला भारताविरुद्ध कारवाई करणे अपरिहार्य होते. पण या कारवाईला भारताच्या अत्याधुनिक शस्रसामग्रीने आणि लष्कराच्या अचूक नियोजनामुळे पूर्णतः निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानची क्षेपणास्रे, ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आली. एक विमान पाडण्यात आले. यावरुन पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलेला असावा. काही अभ्यासकांच्या मते, ही लढाई खूप दीर्घकाळ चालणारी आहे. पण मागील तीन युद्धांप्रमाणेच याही वेळी भारत …

    Read More »
  • 11 May

    वैशिष्ट्ये ऐतिहासिक कारवाईची

    पहलगाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्याला भारत प्रत्युत्तर कधी देणार, या प्रश्नाचे उत्तर मॉकड्रीलसाठी निवडलेल्या ७ मे रोजी पहाटे सबंध देशाला मिळाले. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून सुमारे १०० हून अधिक दहशतवादी यामध्ये मारले गेले आहेत. ‘ऑपरेशन सिंदुर’ असे अत्यंत मार्मिक नाव देऊन आखण्यात आलेले हे मिशन अत्यंत नियोजनबद्धरित्या यशस्वी करण्यात आले. हा भारताने केलेला हल्ला नसून …

    Read More »
  • 4 May

    अभिनेत्री ते आयएएस

    कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत …

    Read More »
  • 4 May

    तंत्रज्ञानाने बॉलिवूडचा कायापालट!

    अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. …

    Read More »
  • 4 May

    पहिल्याच प्रयत्नात बनला आयएएस

    राजगड तालुक्यातील पानशेत रोडवरील रुळे गावचा शिवांश सुभाष जागडे याने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळवित देशात 26 वे स्थान मिळविले. राजगड ( वेल्हे ) तालुक्यातील पानशेत रस्त्यावरील रुळे हे त्याचे मूळ गाव सध्या तो आई-वडिलांसह वडगाव बुद्रुक मध्ये वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील शेती करतात तर आई शिवणकाम करते आणि बहीण वकील आहे. या …

    Read More »
  • 4 May

    जीमेलमध्ये नवे फीचर

    गुगलने जीमेल वापरणार्‍यांसाठी ‘मॅनेज सबस्क्रिप्शन’ नावाचे एक अतिशय उपयुक्त फिचर सुरू केलं आहे. या फिचरच्या माध्यमातून वापरकर्तेआता एका क्लिकमध्ये कोणत्याही इमेल सबस्क्रिप्शनमधून सहजपणे बाहेर पडू शकतात. एवढंच नव्हे, तर एखाद्या ईमेल आयडीकडून आतापर्यंत तुम्हाला किती इमेल आले आहेत, याचीही माहिती यामध्ये मिळेल.सध्या हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहे. लवकरच हे फिचर आयओएष आणि वेब वापरकर्त्यांसाठीही लागू …

    Read More »