लेख-समिक्षण

चिंतन – प्रबोधन

आकांक्षा पुढती जिथे…

मेहनत करण्याची तयारी, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर आर्थिक परिस्थिती, शारिरिक व्यंग किंवा कोणतीही अडचण तुमच्या यशाच्या आड येत नाही. भव्य धर्मेश पालेजाच्या कहाणीतून आपल्याला हीच शिकवण मिळते. भव्य स्वत:च्या पायांवर उभा राहू शकत नाही. तरी देखील तो आपल्या कर्तृत्वाने लाखो तरुणांना प्रेरणा देतोय.दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या भव्य धर्मेश पालेजाने पहिल्याच टप्प्यात सनदी लेखापाल (सीए) ही परीक्षा उत्तीर्ण केली …

Read More »

यशाचा राजमार्ग

प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे… हे सुवचन आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. ध्येयवेड्या तरुणांना आदर्श आणि प्रेरणा देणारी आयएएस विजय वर्धन यांची ही यशोगाथा आहे. 35 वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते ’आयपीएस’ आणि मग ’आयएएस’ झाले. विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे …

Read More »

आईकडून दहा हजार घेवून व्यवसायाची सुरुवात आज देशात सहाशे दुकाने

रवी मोदी हे कोलकात्याच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेले रवी मोदी गणितात चांगले होते. त्यांचे वडील कोलकाता येथील एका मार्केटमध्ये किरकोळ दुकान चालवायचे. जिथे मोदी शिकत असताना त्यांच्या वडिलांना मदत करायचे. रवी मोदी इयत्ता दुसरीमध्ये असताना त्यांना गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले होते. रवी मोदी यांच्या वडिलांचे कोलकात्यात कपड्यांचे …

Read More »

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश मिळते; तर काहींना खूप मेहनत घ्यावी लागते. भवताली मेहनतीतून यशाची शिखरे गाठणार्‍या अनेक व्यक्ती दिसतात. त्यातून आपण प्रेरणा घ्यायची असते. अशीच एक प्रेरक गाथा आहे यंदाच्या चार्टर्ड अकौंटंट अर्थात सनदी लेखापाल या कठीण परीक्षेत यश मिळवणार्‍या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची…. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बेलौन या …

Read More »

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश दूर नसते, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मुलीने विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवालवाडी हे गाव. या गावात अर्जुन चिखले आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्यांकडे फक्त 30 …

Read More »

समर्पितपणाची यशोगाथा

भारताचा निष्णात फिरकीपटू आर. अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे अश्विनने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी करायचा. आर अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईच्या दक्षिणेस असलेल्या मैलापूर शहरात झाला. त्याचे वडील रविचंद्रन हे क्लब क्रिकेटर होते …

Read More »

यशोगाथा जगज्जेत्याची

डी. गुकेश या तरुण, तडफदार बुद्धीबळपटूने जागतिक अजिंक्यपद मिळवण्याचा महाविक्रम नुकताच नोंदवला. यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही जगज्जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली आणि 11 वर्षांनंतर …

Read More »

आदर्श महान उद्योजकाचा

भारतरत्न जेआरडी टाटा यांच्याविषयी आपण बरंच वाचलेलं असतं. त्यांनी एअर इंडियासाठी घेतलेले परिश्रमच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होते. 1932 मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे 1946 मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले. टाटांनी एअर इंडियात विमानांकडे केवळ एक मशीन म्हणून पाहिले नव्हते. तर, त्यांना आपल्या …

Read More »

उद्देश महत्वाचा

कोणत्याही कार्यामागील, कर्मामागील कार्यकारणभाव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये वैयक्तिक हिताचा उद्देश असेल तर त्याला स्वार्थ म्हणतात आणि लोककल्याणाचा उद्देश असेल तर त्याला परोपकार म्हणतात. बहुतेकांचा जीवनातील जास्तीत जास्त काळ हा स्वार्थासाठीच व्यतीत होतो. त्यातून आनंद मिळत असेलही; पण त्यापेक्षाही आंतरीक आनंद हा परोपकारातून मिळतो. स्वामी विवेकानंदांची ही कहाणी यासाठी उद्बोधक आहे. एकदा स्वामी विवेकानंद प्रवासात अलवरला पोहोचले. अल्वरचे महाराज स्वामीजींच्या …

Read More »

संघर्ष हीच यशाची हमी

ही यशोगाथा आहे सीड नायडू या असामान्य तरुणाची. अगदीच सामान्य असलेला सीड आज कोट्याधीश आहे. पण कधीकाळी या तरुणाने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटपाचं काम केलं. आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्यासाठी तो परिस्थितीसी झुंजला. त्याने स्वतःचा रस्ता जोखला. त्यावर तो टिकला आणि आज तो कोट्यवधी कंपनीचा मालक आहे. कधीकाळी संघर्षाच्या गर्तेत अडकलेल्या सीड नायडूला आज ओळखीची गरज नाही. सीड प्रोडक्शन या …

Read More »